Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात इमारतीला रंगकाम (पेटिंग) करत असताना पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने अजय राजकुमार यादव (२४, मूळ रा. प्रतापगड उत्तर प्रदेश, ह.मु. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ३१ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या महितिन्सुअर, अजय यादव हा तरुण अन्य दोन मित्रांसह गेल्या सहा महिन्यांपासून रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होता. तीनही मित्र इमारतीला रंगकाम करायचे बुधवार रोजी रोजी वाटिकाश्रम परिसरात एका इमारतीचे रंगकाम करण्यासाठी अजय यादव हा भिंतीवर उभा होता. पहिल्या मजल्यावरून त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली पडला व त्याच्या डोक्याला जबर मार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी व रेल्वे इंजिनिअरिंग विभागातील कर्मचारी धनराज भरत पवार (३६) यांचा मंगळवारी रात्री भुसावळ ते भादली दरम्यान अप रेल्वे लाईनवर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सुरुवातीस बराच वेळेपर्यंत ओळख पटली नव्हती मात्र नशिराबाद पोलिसांनी तपास केला असता बुधवारी ओळख पटली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी नशिराबाद पोलिस ठाण्याचे रामेश्वर मोताळे यांनी भेट दिली होती. धनराज पवार हे रेल्वे कर्मचारी सोबतच क्रिकेट खेळाडू सुद्धा होते दोस्ती क्रिकेट क्लबचे ते कर्णधार होते त्यांच्या निधनाने साकेगावात शोककळा पसरली. बुधवारी ३१ रोजी दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. धनराज यांच्या पश्चात आई-वडील मुलगा, मुलगी, सैन्य दलात असलेल भाऊ तसेच वहिनी असा…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नाशिक जिल्हा देखील गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. पत्नीने संपत्तीसाठी आपल्या पतीलाच जीवे मारण्याचा कट रचलाय. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या बोरगड परिसरात अर्धांगिनीच आपल्या पतीच्या जीवावर उठली. संपत्ती हडपण्यासाठी पत्नीने आपल्या दोन साथीदारांची मदत घेतली. यावेळी तिने सुरूवातीला पतीला मारण्याचा प्लान आखला. ठरलेल्या प्लान प्रमाणे तिने दोन साथिदारांना घराजवळ बोलावले. त्यानंर तिने आपल्या पतीला भरपूर बियर पाजली. पतीला नशा चढल्यानंतर पत्नीने पतीचा गळा आवळला. गळा आवळून पतीचा मृत्यू होत नसल्याने पत्नीने क्रूरतेने पतीच्या अंगावर साप सोडला आणि पतीला सर्पदंशही दिला. सुदैवानं पतीचा जीव या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच आता सर्वच पक्षाच्या वतीने हालचाली देखील वाढल्या आहेत. महायुतीने तशा दृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे. तर 5 जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठीचा निर्धार महायुतीने केला आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील बस स्थानकाच्या आगारात दि.२९ जानेवारी रोजी बसची तपासणी करण्यात यावी या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद होऊन एका जणाने दोन चालकांच्या डोक्यात दगड मारला. या प्रकरणी शुभम संजय सूर्यवंशी या चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाहेर गावाहून बस आल्यानंतर तिची तपासणी करण्यासाठी ती आगारात नेण्यात येते. त्यानुसार सोमवार दि. २९ रोजी देखील काही बस तपासणीसाठी आगारात नेण्यात आल्या होत्या. त्या वेळी आपल्या बसची अगोदर तपासणी होऊन ‘रिमार्क’ मिळावा, यावरून चालक योगेश धर्मराज माळी (वय ४३, रा. पाळधी) व शुभम सूर्यवंशी यांच्यात वाद झाला. त्या वेळी तेथे योगेश माळी यांचे भाऊ…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच सर्वच पक्षांनी तयारी केली असून कॉंग्रेसने देखील भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. यात बुधवारी 31 जानेवारी रोजी बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. मालदा दौऱ्यावर असताना राहुल यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, काही अज्ञात लोकांनी राहुल यांच्या कारवर दगडफेक केली, त्यामुळे कारची मागील काच फुटली. अधीर रंजन म्हणाले की, असे हल्ले आम्ही मान्य करणार नाही. या हल्ल्यात राहुल यांना कोणतीही दुखापत झाली नाही. आज ही यात्रा पुन्हा एकदा बिहार सोडून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेचा हा 16 वा दिवस आहे. 29 आणि 30…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे त आमदार होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले होते. तसेच बाबर यांना पाणीदार आमदार असेही म्हटले जात होते. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनिल बाबर हे 40 आमदरांसह गुवाहटीला गेले. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदार संघाचे विधानसभत प्रतिनिधित्व करत होते.. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हेही राजकीय जीवनात सक्रिय आहेत. सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जुन्या भांडणातून पुन्हा वाद घालत तीन ते चार जणांनी घरात घुसून कैलास उखा पवार (३२, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्यासह त्याची १० वर्षांची मुलगी तेजस्विनी कैलास पवार हिच्यावर चॉपरने हल्ला केला. यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीत घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिम कॉलनीतील कैलास उखा पवार हे मजुरीचे काम करतात. मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणारे तीन ते चार जणांनी पवार यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला यावेळी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी रुचीलक्ष्मी काबरा (४५, रा. अभियंता कॉलनी) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व मणी, मंगळसूत्र असलेली पोत चोरून नेली. ही घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी रात्री हनुमान कॉलनीत घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अभियंता कॉलनीमधील रहिवासी असलेल्या रुचीलक्ष्मी काबरा या सोमवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घराकडे जात होत्या, त्यावेळी दुचाकीवरून दोनजण आले व या महिलेच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची साडेचार ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ४७ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका दुकानामध्ये आल्यानंतर तेथून साडी घेतली नाही म्हणून दुकानदार अमित दिलीपकुमार प्रथ्यानी (४५, रा. मोहाडी रोड) यांनी महिलेसह तिच्या आई व भावाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. ही घटना सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी संध्याकाळी फुले मार्केटमधील दुकानात घडली. याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाघनगर परिसरातील रहिवासी असलेल्या संगीता बिस्मिल्ला तडवी (३०) या त्यांच्या आई व भावासह फुले मार्केटमधील अमर क्लॉथ सेंटर या साडीच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथून त्यांनी साडी खरेदी केली नाही यावरून दुकानदार अमित प्रथ्यानी यांनी या तिघांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच ‘तुमको क्या करने…

Read More