मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभा जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या सलग राजकीय भेटींमुळे उमेदवारीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भेटीनंतर पुन्हा एकदा नवनीत राणा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अशी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर रविवार मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ₹913 वरून ₹942 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा घरगुती एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात ₹60 ची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत घरगुती सिलिंडर एकूण ₹89 रुपयांनी महागला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढल्याने आणि घरगुती गॅस…
भुसावळ : प्रतिनिधी वरणगावजवळील हिरा मारोती मंदिर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाला वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ (एमएच १९ ईव्ही ५३५३) चालक सुधीर सुभाष पाटील (रा. उदळी, ता. रावेर) यांच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या या अपघातात दुचाकी (एमएच २२ बीडी ३६८१) वरील विजय शंकर काळे, त्यांच्यासोबत असलेल्या ऐश्वर्या बहादूर भोसले, विघ्नेश शंकर चव्हाण आणि मोनालिसा बहादूर भोसले यांचा मृत्यू झाला. आजारी असलेल्या मोनालिसाला उपचारासाठी वरणगाव येथे घेऊन जात…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने जात असलेल्या तरुणीला आवाज देवून थांबवून तिचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना दि. ५ जून रोजी जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित गोपाळ रविंद्र कोळी (रा. कानसवाडा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. दि. ५ जून रोजी दुपारच्या सुमारास ही तरुणी रस्त्याने जात होती. यावेळी संशयित गोपाळ कोळी याने तरुणीला आवाज देवून थांबवले. त्यानंतर तिचा हात पकडून विनयभंग केला. घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित गोपाळ रविंद्र कोळी (रा. कानसवाडा, ता.…
जळगाव : प्रतिनिधी गावठी कट्टुयाासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या आकाश कैलास दामोधर (वय २४, रा. न्यू फेडरेशन बिल्डींग, पिंप्राळा हुडको) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील प्रल्हाद नगरच्या कंपाऊंटमध्ये संशयित आकाश दामोधर हा गावठी कट्टा घेवून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ५ जून रोजी सायंकाळी पथकाने सापळा रचून संशयित आकाश दामोधर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गावठी कट्टयासह दोन जीवंत काडतूस काढून दिले पोलिसांनी ते जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल रगडे यांनी…
जळगाव : प्रतिनिधी पाळधीसह परिसरातील ३० हजार विद्यार्थ्यांना शुक्रवारी वह्या पुस्तकांचे वाटप तर दिव्यांगाना तीनचाकी सायकलींचे वितरण करण्यात आले. वाढते तापमान लक्षात घेता पाळधी परिसरात ऑक्सिजन पार्कची निमिर्ती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या वाढदिवसानिमित्ताने हे विविध उपक्रम राबवण्यात आले. जीपीएस कॅम्पस हायस्कूलच्या मैदानावर हे उपक्रम घेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समाज सेवेच्या विचारांनुसार शुभेच्छुकांनी ३० हजारांहून अधिक वह्या, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तू भेट देऊन वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शुभेच्छुकाला एक झाड देण्यात आले. ‘एक झाड… भावी पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्यात येणार आहेत. शासनाच्या या नव्या धोरणांतर्गत, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो होतकरू विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेताना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण 8 योजना नेमक्या कोणत्या आहेत, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. ओबीसींप्रमाणेच मराठा समाजाला मिळणाऱ्या प्रमुख…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरालगतच्या डेराबर्डी परिसरातील समर्थ पाव बेकरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणावर जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ३ जून रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डेराबडी येथील जखमी अजय शिवाजी चव्हाण (वय २४) हा समर्थ पाव बेकरीमध्ये कारागीर म्हणून काम करतो. अजयच्या फिर्यादीनुसार, त्याची बहिण आणि संशयित ममराज हरीलाल जाधव यांच्यात पूर्वी ओळख असल्यामुळे काही वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. हा वाद समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही ममराज जाधव हा जुन्या वादाची कुरापत काढून वारंवार भांडण करत असल्याचा आरोप करण्यात…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीप्रकरणी कृषी विभागाच्या कारवाईत १ हजार १६ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने दि. ३ जून रोजी पाठविलेल्या डमी ग्राहकास १ हजार संशयास्पद कापूस बियाणे पाकिटांची प्रत्येकी १२०० दराने विक्री करण्याचा व्यवहार पिंप्री.ता. धरणगाव येथे गुलाब आधार पाटील, भूषण पाटील व दीपक राजकमल चौधरी यांनी ठरविला होता. मात्र व्यवहार अंतिम टप्प्यात असताना पोलीस पाळत ठेवत असल्याचा संशय आल्याने संबंधितांनी बियाण्यांची विक्री न करता तेथून पलायन केले. त्यानंतर कृषी विभागाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या मदतीने तांत्रिक तपास करून संबंधितांचा शोध घेतला. चौकशी दरम्यान…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रातील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सावखेडा मंडळाच्या मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडा येथील तापी नदीपात्रात नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करण्यात आल्याचे अलीकडेच उघड झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत लाखो रुपयांचा वाळूसाठा जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून वाळू, यंत्रसामग्री आणि…

