Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, महाविकास आघाडीतून आता ठाकरेंनाच पुन्हा संधी देण्याची जोरदार मागणी पुढे येत आहे. आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने आधीच या जागेसाठी अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडूनही ठाकरेंनाच पाठिंबा देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार सुप्रिया सुले यांनी सोशल मीडियावर ट्विट करत ठाकरेंनीच ही निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे. सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील विधानपरिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धवजी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात तब्बल २२ किलोहून अधिक चांदीची तफावत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातील या प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये ४०६ किलो चांदीचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तब्बल २२ किलो ४९० ग्रॅम चांदीचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. २५ मार्च २०२६ रोजी प्राप्त झालेल्या या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या संवेदनशीलतेवरून राज्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशकाला फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माहितीनुसार, दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी सुमारे ३७ वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आणि पानसरे कोण होते, असा सवाल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जून्या घरगुती वादातून सागर सुपडू पाटील (वय २६, रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्यावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील शिरसोली येथे राहणारे सागर पाटील यांना दि. १९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जून्या घरगुती वादातून गोविंदा पाटील व त्यांच्या साडूची मुलगी निकीता पाटील आणि मुलगा प्रशांत गोविंदा पाटील यांनी मारहाण केली. या मारहाणीत गोविंदा पाटील याने कुऱ्हाडीने सागरच्या डोक्यावर तर निकीता पाटील हीने विळ्याने वार करीत गंभीर जखमी केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना फसवणूक करणाऱ्या बेकायदेशीर बियाणे विक्रीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा आहे. शहर पोलीस स्टेशन चोपडा यांना दि. २० एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नंदलाल चौधरी हा व्यक्ती छुप्या पद्धतीने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याचा संशय होता. यावर कृषी विभागाने तपासणी केली असता तब्बल ४५० पॅकेट बियाणे सापडले. कारवाईदरम्यान ‘रिसर्च हायब्रीड कॉटन सीड सुपर किंग’ व ‘चॅलेंजर’ या नावाची प्रतिबंधित बियाण्यांची ९ पोती जप्त करण्यात आली. त्यांची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजाररुपये आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तुमचा शनि काढून देतो’ असे सांगत गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७, रा. जिल्हा बँक कॉलनी) या वृद्धाची सोन्याची अंगठी व रोख ९०० रुपये अज्ञाताने त्यानंतर हा अज्ञात भोंदू त्याच्या साथीदारासह पसार झाला. हा प्रकार दि. २० एप्रिल रोजी नवीन बसस्थानकात घडला. या प्रकरणी लांबविले. २१ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्हा बँक कॉलनीतील रहिवासी गजानन सर्जेराव हे त्यांच्या मुलीकडे घरभरणीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. त्यांच्याजवळ एक जण आला व त्याने शेगावच्या बसविषयी विचारणा केली. त्यावर वृद्धाने माहिती नसल्याचे सांगितले. त्यावेळी समोरील व्यक्तीने वृद्धाच्या शेजारी बसलेल्या इसमाला एक…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२३ एप्रिल २०२६ मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साह आणि ऊर्जेने भरलेला असेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत काही मजेदार उपक्रमांचे नियोजन करू शकता. जुन्या मित्राला भेटल्याने तुमचा मूड सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात तुम्हाला यश मिळेल. संवाद महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. आर्थिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे कुटुंबासह भेट दिली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दौऱ्याची देशभरात चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्थेतील उच्च पद भूषवलेल्या व्यक्तीच्या या भेटीमुळे विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील बागेश्वर धाम सध्या धार्मिक कार्यक्रम, दरबार आणि प्रवचनांमुळे चर्चेत आहे. भक्तांच्या समस्यांवर आध्यात्मिक उपाय सुचवण्याच्या त्यांच्या दाव्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविक येथे आकर्षित होत असले तरी, त्यांच्या कथित चमत्कारांवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर समाजात सातत्याने चर्चा रंगताना दिसते. बागेश्वर…

Read More

मुंबईतील वरळी परिसरात महायुतीच्या आक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका सामान्य महिलेने भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारल्याची घटना चर्चेत आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विरोधकांनी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित महिला अत्यंत संतप्त अवस्थेत होत्या आणि त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती. त्या वेळी त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे अपेक्षित होते, असेही महाजन यांनी नमूद केले. महाजन यांच्या म्हणण्यानुसार, हा मोर्चा महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून खरातची सखोल चौकशी सुरू आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात त्याला पोलिस कोठडीत घेऊन दररोज अनेक तास कसून चौकशी केली जात आहे. मात्र मंगळवारी चौकशीदरम्यान त्याला अचानक छातीत वेदना, तीव्र डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी तातडीने वैद्यकीय मदत बोलावली. खरातला ऑक्सिजन…

Read More