छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था एपीआय कॉर्नरजवळ सोमवारी सकाळी कौटुंबिक वादातून डॉक्टर पत्नीने थेट घरच पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गोविंद सुभाषराव वैजवाडे (४०) हे एका रुग्णालयात कार्यरत आहेत. तर पत्नी डॉ. विनिता (दोघेही रा. नालंदा कॉम्प्लेक्स) या नक्षत्रवाडीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, विनिता सातत्याने पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालत होत्या. रविवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरडाओरड सुरू झाल्याने त्यांचे शेजारी मनोज मर्दा यांनी दोघांची समजूत घातली, परंतु, वाद सुरूच असल्याने त्यांनी विनिता यांना रुग्णालयात नेऊन सोडले. सकाळी ६…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी आपले शहर,गाव, तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असते, मात्र पोलीस प्रशासनाला अपेक्षित असणाऱ्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार मिळाला तर काय बदल होऊ शकतो याचे एक चांगले उदाहरण चाळीसगाव शहरात घडले आहे. जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव शहर हे दळणवळणाचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या सुरक्षा पाहणाऱ्या पोलिसांची जबाबदारी देखील वाढते. मात्र चाळीसगाव शहरात पोलिसांना गस्तीसाठी व नागरिकांना तात्काळ मदतीसाठी असणाऱ्या नागद चौफुली व रेल्वे स्टेशन जवळील पोलीस चौक्या मोडकळीस आल्याने काही वर्षांपासून बंद होत्या. त्यामुळे पोलिसांसह…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच मध्यप्रदेशातून अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरुन या आत्महत्येचे धक्कादायक कारणही समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र झा हे मजुरीचे काम करतात. जितेंद्र यांची पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल झा त्यांच्यासोबत राहते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे बंद होते. रविवारी (२८, जानेवारी) शेजारी राहणाऱ्या लोकांना…
अमरावती : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापूर्वी राज्यात गरम तव्यावर बसण्याचा दावा करणारा गुरुदास बाबा ऊर्फ सुनील कावलकर मोठ्या चर्चेत आले होते पण सध्या ते अडचणीत आले आहे. एका महिलेच्या असह्यतेचा त्याने फायदा घेतल्याचं समोर आलं आहे. महिलेला आश्रमात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा या बाबावर आरोप आहे. या बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर तवावाला बाबा गायब झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकरणाने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील महिला भाविकेचे शोषण करून व्हिडिओ…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी २८ जानेवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांचा रोष पाहताच…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात २५ वर्षीय महिलेचा एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एका विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात २५ वर्षीय महिला वास्तव्यास असून सप्टेबर २०२३ मध्ये महिलेच्या आईला रुग्णालयात दाखल केले असतांना संशयित आरोपीने महिलेला भुसावळ येथील त्याच्या मालकीच्या घरी नेत तुला मी घर खर्चासाठी, कपडे घेण्यासाठी, मुलाला चांगले शाळेत शिकविण्याचे आमिष देत वेळोवेळी २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केला, याप्रकरणी महिलेने दि.२८ जानेवारी २०२४ रोजी भुसावळ बाजार पेठ पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास…
पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील पिंपरी येथे प्रियकराने अभियंता प्रेयसीला लॉजवर नेऊन गोळ्या झाडल्या. यात तरुणीचा मृत्यू झाला. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंट ओयो टाउन हाउसमध्ये रविवारी (दि. २८) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वंदना के. द्विवेदी (२६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ऋषभ निगम आणि वंदना यांचे घर लखनौ येथे एकाच परिसरात आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख असून, काही वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. सॉफ्टवेअर अभियंता असलेली वंदना ही २०२२ मध्ये…
पुणे : वृत्तसंस्था राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीने अभिनेत्री तरुणीवर बलात्कार करून तिच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात विराज रविकांत पाटील (३५, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्यावर बलात्कारासह आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेने (३२) शुक्रवारी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील रिसॉर्टमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज पाटील हा राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आहे. तर पीडिता अभिनेत्री आहे. आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख सोशल मीडियावर झाली. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आपण कुठल्याही हॉटेलमध्ये कुटुंबासह, मित्रासोबत जेवण्यासाठी जातो, तेव्हा जेवण झाल्यानंतर प्रथम वेटरकडे बिल मागतो. समजा तुमचे बिल २३६० रुपये झाले, तर तुम्ही वेटरला २५०० रुपये देता आणि तो कांऊटरवरून १४० रुपये परत आणून देतो. त्यानंतर वेटरला ती शिल्लक राहिलेली रक्कम टीप म्हणून देतात. तुम्हाला वेटरची सर्व्हिस चांगली वाटली याची ती पोच पावती असते आणि तुमच्याकडून ती वेटरला टीप म्हणून दिली जाते. टीप देण्याची एक मर्यादा असते, मात्र कोणी जर २० लाख रुपये टीप म्हणून दिले तर… ऐकायला विचित्र किंवा अविश्वसनीय वाटत असले तरी ही सत्य घटना आहे. दुबईच्या साल्ट बे हॉटेलमध्ये हा किस्सा घडला आहे. तेथे…
भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या करंजी गावात दहशत निर्माण करण्याच्या ईराद्याने अवैध लोखंडी तलवार बाळगणाऱ्या सरपंचासह एकास अटक केल्याची घटना शनिवार रोजी दुपारी घडल्याने वरणगाव पोलिसात भारतीय हत्यार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील करंजी गावी गणेश सुरेश पाटील (वय २६) व सरपंच नंदुलाल पंढरी पाटील (वय २५) यांनी तलवार कुंटीमध्ये लपवून ठेवल्याची गोपणीय माहीती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस निरिक्षक भरत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक परशुराम दळवी, पोहे कॉ प्रशात ठाकूर, प्रमोद कंखरे आदी पोलिसांनी करंजी गावी जाऊन गणेश पाटील यांचे जणावरांच्या वाडयात पोलिसांनी पाहणी केली असता. लोखंडी तलवार मिळून…

