जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद येथील १७ वर्षीय मुलीने गुरुवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तंजीला बी. शेख अन्सार (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तंजीला आपल्या आई, वडील व लहान बहिणीसोबत नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात राहत होती. वडील शेख अन्सार शेख शकील हे हातमजुरीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. गुरुवारी दुपारी वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले. होते. तर आई दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बहिणीला घेऊन, गावातच राहत असलेल्या भावाकडे (मुलीच्या मामाकडे) गेली होती. घरात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी सुरत रेल्वे गेटपुढील मालधक्क्यावर माल उतरविल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर राहिलेली चप्पल घेण्यासाठी गेलेल्या हमालाचा हाय व्होल्टेज तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ३:३० वाजता ही दुर्घटना घडली. रेल्वे पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२:३० वाजता रेल्वेच्या मालधक्क्यावर संतोष रामू कुमार (वय ४५) हा मजूर खतांचा माल उतरविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर चप्पल राहिल्याचे लक्षात आल्याने संतोष कुमार बोगीवर चढले. मात्र, उतरत असताना त्यांचा रेल्वेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श होऊन जागेवरच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
जळगाव : प्रतिनिधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात दि.१ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्रात सर्व सामान्य नागरिकांचे हिताचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष आमदार श्री जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते आमदार रोहित दादा पवार हे सतत लढत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून झोपेचे सोंग घेण्याच्या केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य हे ईडी कार्यवाही व धाक दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण करून या विरोधात आकाशवाणी चौक येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून रस्ता रोको करण्यात आला यावेळेस सरकार हमसे…
जळगाव : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर विश्वास ठेवू नका, यापासून सावध रहा, असे आवाहन आरबीआयने केले आहे. प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, कर्जमाफी संदर्भात काही संस्था समाजमाध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब चॅनल आणि बनावट वेबसाइट) यावर अनेक मोहिमांचे सक्रियपणे प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा संस्थांना कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत असल्याच्या बातम्या आहेत. ज्यामुळे बँकांना आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता तारणावर त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी बँकांच्या कामकाजात अडथळा येतो. बँकांसह इतर वित्तीय संस्थांची थकबाकी भरण्याची गरज नाही, असा चुकीचा…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील शरद पवार गटाचे आ.रोहित पवार यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ईडीची चौकशी सुरु असल्याने राज्यातील राष्ट्रवादीतर्फे या घटनेचा निषेध म्हणून राज्यभर आंदोलन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून धरणगाव शहरात देखील तहसीलदार यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला. हे निवेदन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे कि, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आ.रोहीत पवार हे सतत अन्यायाविरूध्द लढत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून नागरीकांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवून झोपेचे सोंग घेणा-या केंद्रसरकार व महाराष्ट्र राज्य हे ई. डी. ची कार्यवाही व धाक दाखवून विरोधी पक्ष नेत्यांचे खच्चीकरण करीत आहेत. असे करणे त्वरीत थांबवावे. तसेच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा केली आहे. नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदी सरकार सुरुच ठेवणार आहे. येत्या पाच वर्षात आणखी २ कोटी घरे निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत म्हटलं की, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. सरकारचे लक्ष्य पारदर्शक कारभारावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील. सोबतच 300 युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांगीण विकासावर आमचा भर…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा येथून जवळच असलेल्या चिचाटी – गौरखेडा शिवारात सुकी नदीपात्रात चिंचाटी येथील रसूल रशीद तडवी (वय ३७) या तरुणाचा मृतदेह २८ रोजी आढळून आला आहे. मयताचे वडील रशीद तुकडू तडवी यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयताचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत. मयत रसूल रशीद तडवी हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत रसूल तडवी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुली, मुलगा, भाऊ असा…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जालना रोडवर सिडको एन 3 भागात एक गॅसचा टँकर दुभाजकाला धडकला. त्यानंतर टँकरमधून गॅसगळती होत आहे. याचा फटका वाहतूकीवर झालेला दिसतोय. जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच, सिडको परिसरातील नागरिकांना घरातील गॅस न पेटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक कॉलेजसमोर गुरुवारी पहाटे एचपी गॅसचा टँकर उलटून गॅस गळती होत असल्याची घटना घडली. घटनास्थळी सहा पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचेही टँकर दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आ.रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरु होती ती चौकशी आज पुन्हा होणार आहे. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. चौकशीचा निषेध म्हणून आज प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते तसेच पदाधिकारी उपोषण करणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांबाहेर घंटानाद आंदोलन करणार आहे. रोहित पवारांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांतर्फे ‘वारसा विचारांचा, मार्ग संघर्षाचा’, लडेंगे और जितेंगे अशा आशयाचे बॅनर लावत रोहित पवारांना बळ देण्यात येत आहे.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात लाच लुचपत विभागाकडून अनेक लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर धडाकेबाज कारवाई करीत आहे,दि.३१ रोजी चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय.३९) याला ५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांची पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.त्याप्रमाणे यातील आलोसे ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार (वय-३३) यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला /बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे ७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली.आज दि.३१/०१/२०२४ रोजी पंचा…

