भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री सेकम, फुलगावच्या जवळ शेत रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने दि. १ रोजी रात्री अडवले. या वाहनाच्या चालकाला वाहन तहसील कार्यालयात नेण्याची सूचना केली. मात्र वाहन चालक ऐकण्यास तयार नव्हता. त्याचवेळी तेथे २५ ते ३० जणांचा जमाव आला. आणि कारवाईला विरोध करत होता. महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांची मदत घेतली. पोलिस घटनास्थळी आल्यावर जमाव पांगला आणि वाहन तहसील कार्यालयात नेण्यात आले. तापी पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या पथकाने किरण संतोष सूर्यवंशी रा. रामपेठ, वरणगाव याच्या मालकीचे ट्रॅक्टर पकडले. दरम्यान मदतीसाठी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहायक पोलिस…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी बँकेमध्ये गेल्यानंतर विवाहितेची एका जणाशी ओळख झाली, त्याने जवळीक साधत मैत्री केली व नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यानंतर नोंदणी विवाह केला खरा; पण महिलेला घरी नांदण्यास न नेता तिच्यावर वेळोवेळी जळगावसह पुणे येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अत्याचार करणाऱ्या ईश्वर गोविंद व्यास (रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका २९ वर्षीय विवाहितेची शहरातील एका खासगी बँकेत ईश्वर व्यास याच्याशी ओळख झाली त्यावेळी त्याने विवाहितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मी विवाहित असल्याचे महिलेने…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी कृष्णा महादेव गोरे (वय २५) रा. कुसुंबा, ता. जळगाव याला जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी गोरे याने त्याचा मित्र अनुप मांडवे याच्या मदतीने दि. १० जून, २०२१ रोजी पीडितेला पळवून नेल्याचा आरोप होता. त्यानंतर, अत्याचारातून ती गर्भवती राहिली होती. या प्रकरणात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. यात भुसावळ येथील विशेष जिल्हा न्यायधीश व्ही.सी. बर्डे यांनी कृष्णा गोरे याला १० वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे, तर अनुप जितेंद्र मांडवे (वय…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. प्रताप हायस्कूलमध्ये सानेगुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक…
पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी ४८९० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सात उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे. जून २०२५ पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमळनेर तालुक्यातील पाडळसे निम्न तापी प्रकल्प धरणाची आज पाहणी केली. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी…
सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : प्रतिनिधी शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री…
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा योजनेंतर्गत क्रीडा संकुलांचे बांधकाम करणाऱ्या विजय तुळशीराम भील, बापूजी नवल पाटील, विनोद जयराम धनगर, लखन उखा भिल, राजेंद्र भानुदास साळी पाच मजुरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केली केले. अमळनेर तालुका क्रीडा संकुल ४ हेक्टर २० आर मध्ये साकार…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय विवाहितेच्या पतीने गावात करारवर शेती केलेली होती, फारसे उत्पादन न आल्याने कर्जाचा डोंगर चढला. या विवचतेनून जागृती अरुण कोळी (वय ३२) यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे घडली असून या महिलेवर उपचार सुरु असतांना त्यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे जागृती कोळी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. त्यांचे पती अरुण कोळी हे स्वतःजवळील शेतीसोबतच गावातील इतरांची शेती करारवर घेऊन करत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्यामुळे अरुण कोळी यांना उत्पन्न कमी झाले. त्यात…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर कसबेतील रहिवासी रामदास बिंबाजी जाधव हे सकाळी साडेआठच्या दरम्यान शेतात दुचाकीने जात असताना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाच्या बाजूला असलेल्या नामलीला जिनिंगजवळ चार युवकांनी दुचाकी अडवली. गळ्यातील एक तोळा व बोटातील तीन ग्रॅम वजनाची अंगठी हिसकावून पोबारा केला आहे. दिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता रामदास बिंबाजी जाधव हे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पेट्रोल पंपावरून दुचाकीत पेट्रोल भरून जळगाव महामार्गावर असलेल्या नामलिला जिनिंगजवळ असलेल्या शेताजवळ पोहोचले. यादरम्यान जळगावकडून एका दुचाकीवर दोन युवक व पहूरकडून एका दुचाकीवरून दोन युवक अशा चौघांनी जाधव यांना अडविले. त्यांच्यावर पांढरी पावडर टाकण्याचा प्रयत्न केला. गळ्यातील सोनसाखळी व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात घरात कोणीच नसतांना भूषण प्रभाकर माळी (वय २८) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही. रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेश नगरात भूषण माळी हा तरुण कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीत काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. गुरुवारी सकाळी घरात कोणीही नसतांना भूषण याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबीयांनी भूषणला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिनी असा…

