मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, हे जाळे केवळ मुंबई आणि पुणेपुरते मर्यादित न राहता आता विदर्भातील ग्रामीण भागापर्यंत पसरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्याची परिस्थिती 10 वर्षांपूर्वीच्या पंजाबसारखी होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. वडेट्टीवार यांनी सांगितले की, अकोला, अमरावती ते नागपूरच्या ग्रामीण भागापर्यंत ड्रग्जचे जाळे पसरले आहे. याशिवाय नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही अंमली पदार्थांच्या घटना वाढताना दिसत आहेत. यामुळे राज्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणावर या विळख्यात अडकत असल्याचे त्यांनी नमूद केले. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ताज्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी गृहविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शनिपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विनोद अहिरे याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलावर कारवाई न करण्यासाठी विनोद अहिरे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने त्याला सापळा रचून रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वीही अशा प्रकारे लाच स्वीकारली आहे का,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण तलाव ट्रॅकवर मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या दुकीचा कारला कट लागला. त्या कारणावरुन कारमधील चौघांनी अनुजर शेख शकील (वय १९, रा. फातेमानगर) या तरुणावर चॉपरने हल्ला केला. ही घटना रविवार दि. १२ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फातेमानगरात अनुजर शेख शकिल हा रविवार सुटीचा दिवस असल्याने त्याचा मित्र समीर आरिफ मोमीन व शेहजाद सलीम खाटीक यांच्यासोबत (एमएच १९, ईटी ५९११) क्रमांकाच्या दुचाकीवर मेहरुण ट्रॅकवर फिरत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना कट मारला. त्यानंतर कारमधील चौघे जण हे खाली उतरुन त्यांनी अनुजर शेख…
अमळनेर : प्रतिनिधी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या डंपरने रस्त्याने पायी जाणाऱ्या सदरुद्दीन शेख अब्दुल (वय ६५ रा. जोशीपुरा, पिंपळे रोड, अमळनेर) यांना धडक दिली. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा दि. १३ एप्रिल रोजी दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे रस्त्यावरुन पायी जात असलेल्या सदरुद्दीन शेख अब्दुल या वृद्धाला भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच ४१, बीटी २०२१) या क्रमांकाच्या वाळूच्या डंपरने धडक दिल्याची घटना दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या अपघातात शेख यांना गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरून उचलत रिक्षात टाकून उपचारासाठी त्यांना अमळनेर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार…
जळगाव : प्रतिनिधी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तिच्या ३४ वर्षीय मावसाने वेळोवेळी अत्याचार केला. यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि त्यानंतर ही घटना समोर आली. सन २०२५ मधील दिवाळी सणाच्या १५ दिवस अगोदर ही १६ वर्षीय मुलगी घरी एकटीच असताना, तिच्या ३४ वर्षीय मावसाने तिच्यासोबत जबरदस्ती करीत अत्याचार केला. त्यानंतरही मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तेथून तालुका पोलिस ठाण्यात मााहिती देण्यात आली व पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी अत्याचार केल्याचे सांगितले. मुलीच्या फिर्यादीवरून…
जळगाव ; प्रतिनिधी पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या देविदास रामा कोळी (६१, रा. रायपूर, ता. जळगाव) यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी २ लाख ३१ हजार ३६९ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. ही घटना २६ ते ३० मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेले देविदास कोळी हे २६ मार्च रोजी राजकमल टॉकीज परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएममधून २० हजार रुपये काढले. त्यावेळी त्यांच्या मागे हेल्मेट घातलेल्या एक जणाने त्यांना थांबविले व ‘बाबा तुमचे…
आजचे राशिभविष्य दि. १५ एप्रिल २०२६ मेष राशी आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत राहील. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल. तुम्हाला उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील. तुम्ही काही सर्जनशील कामात स्वतःला गुंतवून घ्याल. अधिकारीसुद्धा तुमच्या कामावर खूश होतील. वृषभ राशी तुमचे तुमच्या पालकांशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण आणि सुसंवादी राहतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. आज, तुमची समाजकार्यातील आवड वाढेल. तुम्ही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला एखादे गुपितही कळू शकते. तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवू शकता. मिथुन राशी तुमची सर्व महत्त्वाची कामे आज…
जळगाव : प्रतिनिधी “समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, सहायक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण…
मुंबई : वृत्तसंस्था दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून ४० वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अंकुश आंबोरकर यांचा मृत्यू झाला असून, गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दादर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश आंबोरकर रविवारी रात्री दादर येथे आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी गौरव सणसने त्यांना रस्त्यात अडवले. दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. गौरवने आपल्या टोळक्यासह अंकुश यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.…
नाशिक : वृत्तसंस्था भोंदूबाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, यामध्ये पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या नव्या खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कराळे हे अशोक खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतक्या वरिष्ठ पदावरील पोलिस अधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमात का सहभागी झाले, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्यांनी त्या कार्यक्रमात भाषणही केल्याचे सांगत यामुळे सामान्य नागरिकांमध्ये…

