चोपडा : प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी रामपुरा भागात गोरक्षक आणि पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी सकल हिंदू समाजातर्फे शहरात मोर्चा काढण्यात आला. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. ‘गोमाता वाचवा’ आणि ‘दोषींवर कारवाई करा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. गांधी चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेत रूपांतरित झाला, ज्यात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संजय शर्मा म्हणाले, संविधानाला न मानणाऱ्या आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पीआय साळवे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. कत्तलखाने चालवणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांना आता हिंदू समाज सोडणार नाही,’ असा इशारा त्यांनी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील जळके,वसंतवाडी,सुभाषवाडी,वराड,विटनेर परिसरातील भारत गॅस ग्राहकांना जळगाव महाबळ येथील भुषण गॅस एजन्सी कडून गॅस सिलिंडर बुक करुन देखील सिलेंडर लवकर दिले जात नसल्याने भुषण गॅस एजन्सीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील भारत गॅस ग्राहकांनी मागील महिन्यात १७,१८,१९मार्चला आपले सिलिंडर बुक केले असुन त्या ग्राहकांना ३,४ एप्रिल ला सिलिंडर डिलिव्हरी मेसेज प्राप्त झाले असून ग्राहकांना सिलिंडर मिळाले नाहीत तसेच ग्राहकांनी दुरध्वनी वरून विचारणा केल्यावर आज येणार उद्या येणार असेच सांगितले जाते. या संदर्भात भुषण गॅस एजन्सीचे संचालक भुषण चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजब उत्तर दिले की ग्रामीण भागात पुरवठा करणे शक्य होत…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वंजारी खपाट येथे महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे उभे मका पीक पूर्णपणे जळून खाक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून प्रशासनाकडे तातडीने पंचनामा व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुरुषोत्तम शंकर चौधरी (रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत अचानक शॉर्ट सर्किट झाले. यामुळे ठिणग्या उडून शेतात आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण मका पीक जळून गेले. या आगीत चौधरी यांचे उभे पीक पूर्णतः…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि सुरक्षित मानला जाणाऱ्या जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात बुधवारी (१५ एप्रिल) सायंकाळी साखळीचोरांनी धाडसी हात साफ करत सेवानिवृत्त महिलेच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रिंगरोड परिसरात राहणाऱ्या नीलिमा विश्वासराव पाटील (वय ६६) या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी सायंकाळी फिरण्यासाठी भाऊंच्या उद्यानात गेल्या होत्या. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता त्या पायी घरी परतत असताना, पाठीमागून एका दुचाकीवरून दोन अज्ञात इसम वेगाने त्यांच्या जवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने क्षणात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पकडून जोरात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका महिला ग्राफिक डिझायनरची अघोरी विद्या आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांत फसवणूक झाल्याच्या प्रकाराला चार वर्षे उलटून गेले असले तरी, या गुन्ह्यातील दांपत्याला पोलिस पकडू शकलेले नाहीत. यातील, मुख्य संशयिताची पत्नी स्वतः पोलिस कर्मचारी असल्याने या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत संतप्त पीडितेने १६ एप्रिलला अखेर पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. पीडित महिला आणि संशयित पोलिस कर्मचारी महिमा पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. पीडितेच्या घरातील वादाचा गैरफायदा घेत महिमाने तिचा पती ललित पाटील याच्याकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचे सांगितले. घरातील संकटे दूर करण्याचे आश्वासन देत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिला अघोरी विद्येच्या…
जळगाव : प्रतिनिधी विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या c अज्ञात चोरट्यांनी १० लाख रुपयांच्या रोकडसह सुमारे १२ लाख १३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा खुर्द (विमानतळ जवळ) भागातील तारा बिझनेस पार्कमध्ये मोईज अब्बास बोहरा (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर ‘रुबी पेंट’ नावाची रंगाची फॅक्टरी असून वरच्या मजल्यावर ते वास्तव्यास आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरात रंगाचे आणि फर्निचरचे काम सुरू आहे. १० एप्रिल रोजी मोईज बोहरा हे एकटेच दर्शनासाठी बऱ्हाणपूर येथील हकीमी दर्गा येथे…
आजचे राशिभविष्य दि. १७ एप्रिल २०२६ मेष राशी तुमचा आनंदी स्वभाव इतरांना आनंद देईल. आज तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीचे नियोजन कराल. मुले खेळण्यात व्यस्त राहतील. एका अनुभवी व्यक्तीला भेटल्याने तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांवर उपाय शोधण्यात मदत होईल. तुमचा जोडीदार तुमच्याकडे विशेष लक्ष देईल आणि तुमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वृषभ राशी आज जुन्या बाबींमध्ये अडकू नका. व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या व्यावसायिकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला समाजसेवेत अधिक रस वाटेल. तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी लढणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवत एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मजल मारली आहे. १३ एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर Mount Everest च्या बेस कॅम्पवर पोहोचत ५,३६४ मीटर (१७,५९४ फूट) उंची गाठली आणि आपल्या जिद्द व चिकाटीचा ठसा उमटवला. हा ट्रेक अत्यंत खडतर मानला जातो. सलग आठ दिवस दररोज १२ ते १४ किलोमीटर पायी चालत, उंच डोंगर-दऱ्यांतून प्रवास करत ही मोहीम पूर्ण करावी लागते. उंची वाढत गेल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. बेस कॅम्पवर केवळ सुमारे ४५ टक्के ऑक्सिजन उपलब्ध असतो, त्यामुळे श्वसन करणेही आव्हानात्मक…
जळगाव : प्रतिनिधी समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपत माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी पाळधी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला केंद्रस्थानी ठेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या सामाजिक उपक्रमात प्रतापराव पाटील मित्र परिवार, GPS मित्र परिवार, विवेकी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार दि.१५ एप्रिल रोजी शहरातील कोंबडी बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या ‘बहिणाबाई मार्ट’ ला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोंबडी बाजार येथील अल्प बचत भवनामध्ये ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यात आले आहे. या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्टमधील विविध स्टॉल्सना भेट देऊन तेथे विक्रीस ठेवण्यात आलेल्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच, उत्पादनांच्या पॅकेजिंग, ब्रँडिंग व विपणनावर…

