धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील नेहमीच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीत अग्रेसर असलेले जीपीएस मित्रपरिवार यांचा वतीने आयोध्या येथील श्रीराम लल्ला यांचा प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा पार्श्वभूमीवर पाळधी सह परिसरातील गावांमध्ये श्रीराम ध्वजाचे वाटप करण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीत श्रीराम लल्लांचे प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचप्रमाणे पाळधी येथील जीपीएस मित्रपरिवार यांनी देखील सुंदर असा उपक्रम हाती घेत प्रत्येक घरावर श्रीरामांचा ध्वज असावा या प्रामाणिक धार्मिक हेतूने ध्वजाचे वाटप केले आहे. सदर उपक्रम हा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून आत्महत्या होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच जळगाव शहरातील एका परिसरात ३३ वर्षीय तरुणाने चक्क कामासाठी गेलेल्या आईला मोबाइलवरून मी आत्महत्या करत आहे, असे सांगत गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात निकेतन समाधान पाटील (वय ३३) या तरुणाने गुरुवार, १८ रोजी अपार्टमेंटमध्ये सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी निकेतन पाटीलची आई गावात कामाला गेलेल्या होत्या. त्यामुळे निकेतन हा घरी एकटाच होता. त्याने आईला मोबाइल करून आत्महत्या करत असल्याचे सांगून…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथील एका २४ वर्षीय महिलेला मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे सासरच्यांनी छळ केल्याच्या कारणावरून महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील वर्षा गणेश सूर्यवंशी (२४) हिचे ३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला मूलबाळ होत नसल्याने घरात वाद होत होते. यात १८ तारखेलाही पती-पत्नी आणि सासू यांच्यात वाद झाला. या जाचाला कंटाळून वर्षाने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. सुनील मांगू पाटील (४७) यांच्या फिर्यादीवरून पती गणेश उर्फ परेश संजय सूर्यवंशी (२९), सासरे संजय आत्माराम सूर्यवंशी (५३), सासू रेखाबाई संजय सूर्यवंशी (४८,…
मालेगाव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला बसने पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार तर बस मधील ७ ते ८ प्रवाशी जखमी झाले आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडल्यानंतर आरोपींना कारागृहात पाठविण्यात येत असते पण या आरोपीचा माज कारागृहात सुद्धा उघड होत आहे. नुकतेच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कारागृह अधीक्षकांना भेटू दे म्हणत कैद्याने कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कैद्यावर वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वर्धा शहर पाेलिस तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनूसार वर्धा कारागृह अधीक्षकांना भेटण्याचा तगादा लावत न्यायदीन बंदीवानाने थेट कर्तव्यावर असलेल्या हवालदाराशी धक्काबुक्की केली. त्यास मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. न्यायदीन बंदीवानाचे नाव रेहमत खान हबीब खान पठाण (रा. हिंगणघाट) असे आहे. ताे जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. कारागृहातील हवालदार बॅरेक…
परभणी : वृत्तसंस्था जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. घटनेनंतर जयश्री हिचा पती रोहित गायकवाड हा बोरी पोलिस ठाण्यात हजर झाला, वारंवार सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्यासोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड ( वय २२) याच्याशी दोन वर्षापूर्वी जयश्री वाव्हळ प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघे छत्रपती संभाजीनगर येथे काही दिवस सोबत राहिले. जयश्री ही गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना पती रोहित याने धारदार…
वडोदरा : वृत्तसंस्था गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हरणी सरोवरात एक नौका उलटल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात सुमारे १६ जणांना जलसमाधी मिळाली आहे. मृतांमध्ये १४ बालके व २ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांनी जीवरक्षक जॅकेट परिधान केले नव्हते. त्यामुळे सरोवरात पर्यटन भ्रमंती करणे त्यांच्या जीवावर बेतले. या दुर्घटनेतून ९ बालके व २ शिक्षकांचे प्राण वाचवण्यात मोठे यश आले आहे. या सर्वांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या महितीनुसार, वडोदऱ्यातील न्यू सनराइज शाळेतील २३ विद्यार्थी सुट्ट्या असल्यामुळे हरणी सरोवरात पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या सोबत सुमारे चार शिक्षक होते. यापैकी कोणीही जीवरक्षक जॅकेट परिधान केले नव्हते. याचदरम्यान अचानक नौका 1 उलटली.…
जामनेर : प्रतिनिधी विटांनी भरलेले मालवाहू वाहन गटारीच्या ढाप्यावरून जात असताना तो ढापाच तुटला. त्यामुळे हे वाहन उलटले. यात विटांखाली दबला गेल्याने एक जण जागीच ठार झाला. तर, एक जण गंभीर जखमी आणि दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावदवरून नेरी मार्गे अजिंठाकडे जाणारी एम.एच. ०४ डी.डी. ७७०९ ही विटांनी भरलेली गाडी नेरी दिगर येथील विकास सोसायटीजवळ समोर उभ्या असलेल्या कापसाच्या गाडीला ओव्हरटेक करत होती. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवरून गाडी गेल्यामुळे गटारीचा ढापा तुटला आणि गाडी उलटी होऊन एक मजूर गाडी आणि विटांमध्ये दाबला जाऊन ठार झाला. श्याम तुळशीराम पाठे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरात अमोल चंद्रकांत आराक (वय ३४) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात ललीत ऊर्फ लल्या संतोष वाघ (रा. पिंप्राळा) याने अमोल आराकच्या आईला शिवीगाळ केली होती. आईला शिवीगाळ का केली, असा जाब अमोलने विचारला. याचा राग आल्याने ललीत वाघ याने शिवीगाळ करून धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. याबाबत संशयित आरोपी ललीत…
भुसावळ : प्रतिनिधी शेतातील सामायिक ट्यूबवेलचे पाणी घेण्यावरून एका शेतकऱ्याला दोन जणांनी काठी व फावड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १७ रोजी भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात घडली. याप्रकरणी आपसातल्या दोघा नातेवाइकांविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील बहिरूंबा बाबा मंदिराजवळील रहिवासी राजेंद्र यादव बावस्कर (५२) हे या घटनेत जखमी झाले आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते वांजोळा शिवारातील त्यांच्या शेतात सामायिक ट्यूबवेलमधून पिकांना पाणी भरत होते. त्यावेळी रवींद्र यादव बावस्कर आणि पंकज रवींद्र बावस्कर (दोन्ही रा. खळवाडी, भुसावळ) यांनी राजेंद्र यांना मारहाण केली. या…

