Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात राम मंदिराचा उद्घाटन उत्साह सुरु असतांना दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरण होईल, अशी सर्वांनाच आशा होती. परंतु आता ग्राहकांच्या या आशेची निराशा झाली आहे. कारण मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये कोणतीही घसरण झालेली नाही.मात्र दुसऱ्या बाजूला चांदीचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याऐवजी चांदी खरेदीवर जास्त भर द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासा. Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,050 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील ऑफिसचे काम संपवून सिल्लोडला निघालेल्या शासकीय वाहनाचा झालेल्या अपघातात तहसील कार्यालयातील तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली. या घटनेतील जखमी झालेल्या लोकांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर सिल्लोड मार्गावर केरळा फाटा जवळील पेट्रोल पंप समोर हा अपघात झाला. तहसील कार्यालयाचे वाहन एका उभ्या असलेल्या वाहतुकीच्या वाहनास धडकले यामध्ये तिघेही जण जखमी झाले आहे. या तिघांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वाहन चालक कयूम देशमुख, कोतवाल राजीव…

Read More

सावदा : प्रतिनिधी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीत सर्व रामभक्त व्यस्त असतांना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत शहरातील स्वामीनारायण नगरात तीन ठिकाणी मध्यरात्री घरफोड्या केल्या. शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्यामुळे नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोळंबे गुरुजी (हल्ली मुक्काम पुणे) यांच्या घराचे कुलूप कापून सुमारे 18 हजार रुपये तसेच चांदीचे शिक्के लांबवण्यात आली तर त्यांच्या शेजारील भांडे व्यापारी अजय भागवत कासार (34, स्वामी नारायण नगर, पाण्याच्या टाकीजवळ) यांच्या घराची मागची खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. गोदरेजचे कपाटाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरसाळा येथून दर्शन घेवून पतरणाऱ्या तरुणाची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात नेहाल राजेश माचरे (वय १८, रा. कंजरवाडा) या तरुण जागीच ठार झाला. अक्षय राजेश माचरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाट्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल राजेश माचरे हा तरुण आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्यास आहे. त्याचे वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. तर नेहाला शिक्षण घेत असतांना एका फोटो स्टुडीओमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावित…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील बहुचर्चित आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या ३९ आमदारांना नोटीस जारी केली. शिंदेंनी दोन आठवड्यांत सविस्तर उत्तर देण्याचे न्यायालयाने बजावले. ठाकरे गट उच्च न्यायालयात का जात नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला; पण उच्च न्यायालयात बराच वेळ जाईल. त्यामुळे आम्ही तिथे धाव घेणे टाळले, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असून शिवसेनेच्या दोन्ही गटांतील आमदार अपात्र नाहीत, असा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच दिला. त्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सुनील…

Read More

रावेर : प्रतिनिधी अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त शहरातून निघालेल्या शोभयात्रेवर भोई वाड्याजवळ समाजकंटकांकडून दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी रात्रभर अटकेची मोहीम राबवित २२ संशयितांना जेरबंद केले होते. चौकशीअंती १४ संशयितांना पोलिसांनी अटक करीत त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरात तणावपुर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातून निघणाऱ्या शोभायात्रेवर अचानक दगडफेकीची घटना घडली. पोलिस यंत्रणा अधिक सर्तक असल्यामुळे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या सहकाऱ्यांनी काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या दगडफेकीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक आशिष पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी व लहान…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील कन्हेरे येथील २२ वर्षीय तरुण काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. सोमवारी कन्हेरे शिवारातील एका विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल मधुकर पाटील हा दि. १३ जानेवारी रोजी घरी कोणालाच काही न सांगता निघून गेला होता. याआधीही तो दोन ते तीन वेळेस असाच घरातून बेपत्ता झाला होता. परंतु, तो प्रत्येकवेळी घरी परतत असे. मात्र, यावेळेस तो घरी आलाच नाही. सोमवारी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास गावातील नामदेव महारू पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्याने गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. याबाबत मनोज पाटील यांनी पोलिसात खबर दिली.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अयोध्या येथे प्रभू राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह देशभर पाहायला मिळतोय. या सोहळ्यावरुन राजकीय वातावरण राज्यात चांगलेच तापल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनीही यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. संजय राऊत यांच्या या आरोपांना आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. “अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा दर्शनाला येत्या काही दिवसात जाणार आहे. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहेत. तिकडे आरती चालली म्हणून…

Read More

अयोध्या : वृत्तसंस्था देशातील अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निश्चित वेळेवर झाली असून यावेळी दिग्गज उद्योगपती, बॉलिवूड आणि दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी आणि संत उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुकेश अंबानी आणि पत्नी नीता, अनिल अंबानी आणि दाक्षिणात्य कलाकार चिरंजीवी-रामचरण यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. बाबा रामदेव हे बागेश्वर धामचे कथाकार पं.धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत दिसले. कतरिना कैफ, विकी कौशल, आलिया, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित हे देखील अयोध्येत आले आहेत. अनुपम खेर यांनी सोमवारी सकाळी हनुमानगढीला भेट दिली. म्हणाले, “प्रभू रामाकडे जाण्यापूर्वी हनुमानजींचे दर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.” विवेक ओबेरॉय म्हणाले, “मी पहिल्यांदाच अयोध्येत आलो आहे आणि इथे मला प्रत्येक श्वासात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे, ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिर, श्री नंदिकेश्वर मंदिर, श्री हेरंब मंदिर, सिद्धेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, श्री…

Read More