Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक रामभक्तांची गेल्या पाच शतकांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. बहुप्रतीक्षित राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेली अनेक दशके तंबूत राहाव्या लागलेल्या रामलल्लांची सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्यदिव्य मंदिरात प्रतिष्ठापना करतील, या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नव्या नवरीसारखी सजली असून संपूर्ण देश राममय झाला आहे. सुमारे ८ हजार विशेष आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्याचे भारतासह परदेशातदेखील बेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवारपासून सुरू झाले. पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी दुपारी प्रतिष्ठापनेचा मुख्य विधी पार पडेल. नरेंद्र मोदी सकाळी साडेदहाच्या सुमारास अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या (दि.२३ जानेवारी) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या पुरूष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. यात सुमारे ऐंशी हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणूकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्यात शहरी भागात १०६९ व ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात कारण…

Read More

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच सांगली जिल्ह्यात देखील अशीच एक थरारक घटना घडली आहे. मित्राचे प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून चक्क मित्राचाच खून करण्याचा प्रकार कडेगाव तालुक्यातील वांगी या ठिकाणी घडला. या प्रकरणी संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. नामदेव प्रल्हाद शिंगे (वय ३० रा. बेघर वसाहत, नरसिंहपूर ता. वाळवा) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत नामदेव शिंगे आणि संशयित अक्षय विष्णु शिंदे यांची मैत्री असून अक्षय याला नामदेवचे प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यातून बुधवारी रात्री वांगी येथे राहत असलेल्या खोलीत कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलक मनोज जरांगे पाटील दि.२० रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. २५ जानेवारी रोजी मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलक मराठा बांधवांचे २५ जानेवारी रोजी दुपारचे जेवण पनवेल येथे होईल. पनवेलमध्ये तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेतल्या जात आहेत. १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलाव याची व्यवस्था केली जाणार आहे. घराघरांतून भाकऱ्या तयार केल्या जाणार आहेत. स्वयंसेवकांमार्फत जेवण…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा ‘कारसेवकांनी’ बाबरीची ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, यावरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर संशय व्यक्त करत टीका केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा पुराचा आता सादर केला आहे. नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. नागपुरातील एका वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे फोटो प्रकाशित झाला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्राचे देखील आभार मानले आहेत. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1748909338260128242?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1748909338260128242%7Ctwgr%5Edee77f8232324b9f669cebde1d80d0987dfd24a6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmaharashtra%2Fdevendra-fadnavis-share-photo-present-as-karsevak-in-nagpur-political-news-pvw88 देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘जुनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मोबाईल व इतर मदत करणाऱ्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या किरणकुमार बकाले याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला कारागृहात नेण्यापूर्वी मोबाईल, इअर बर्ड देऊन बोलण्याची सोय करून दिली होती. या प्रकरणी मराठा समाजाने आक्षेप घेत चौकशी व संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी ईश्वर खवले आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना नियंत्रण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ धार्मिक स्थळ अभियाना अंतर्गत आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी पेठ येथील बालाजी मंदिर येथे स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. त्यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे, महानगर प्रमुख उज्वलाताई बेंडाळे, स्वच्छ धार्मिक स्थळ संयोजक डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, माजी महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर, सुनील भाऊ खडके, माजी महापौर भारतीताई सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी नगरसेवक पिंटू काळे, माजी नगरसेवक विरेण खडके, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, चित्राताई मालपाणी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे दौरा असतांना पिंपरीत परिसरात पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात त्यांनी एक मोठा वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, एक किंवा दोन अपत्यावर थांबा. मी खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आले तरी घरे बांधून देऊ शकणार नाही, मी लवकर आल्याने काहींची अडचण झाली. सकाळी-सकाळी लवकर सुरुवात केली ते कामांसाठी बरे पडते. पण त्यामुळे काहींची अडचण झाल्याचे दिसत आहे. अजित पवार म्हणाले की, बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, एक किंवा दोन आपत्यावर थांबा. मी इथला खासदार असताना असलेली लोकसंख्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पारोळ्याजवळ शनिवारी गॅस सिलिंडरच्या टँकरला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व पोलीस घटनास्थळी आहेत. दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझवण्यात आली आहे. या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे पारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने गॅस सिलेंडरने भरलेल्या टँकरला भीषण आग झाले लागल्याची घटना शनिवारी २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारोळा येथील तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक रामभक्तांना अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची ओढ लागली असतांना राम भक्तांना श्रीरामाच्या भेटीची आतुरता लागली आहे .याच भक्तीचा फायदा कल्याणमध्ये तिघांनी घेतल्याचं उघड झालं आहे .आम्ही तुम्हाला श्रीरामाचं दर्शन घडवून आणतो, असं आमिष दाखवून एका 58 वर्षीय महिलेचे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे . पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी चालली होती. यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही रामभक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. यासाठी…

Read More