जळगाव : प्रतिनिधी दिनांक 22 रोजी निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाला प्रलंबित असलेले तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह म्हणून देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्या नंतर शरदचंद्रजी पवार साहेबाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले होते तसेच काल दिनांक 22 रोजी निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला देण्यात आले. दिनांक 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्याललंय आकाशवाणी चौक येथे नवीन पक्ष मिळाल्या बद्दल तुतारी चे औक्षण करून व तुतारी वाजउण , पेढे वाटप करून व फटाके फोडून…
Author: editor desk
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना नुकतेच पैठण शहरातील एका ३२ वर्षीय तरूणाचा तोंडावर आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस असे मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. त्यामुळे लक्ष्मीनगर येथे तो एकटाच राहत होता. त्याला त्याचे वडील जेवणाचा डबा रोज पोहचवून देत होते. दरम्यान मंगळवारी दुपारी चार वाजता वडिलांनी त्याला डबा दिला. यानंतर ते निघून गेले…
लखनौ : वृत्तसंस्था येथील आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी एका मौलवीला अटक केली असून त्याच्या भावाचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपायुक्त (पश्चिम) विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, एका व्यक्तीने मलिहाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यात त्याच्या आठ वर्षांच्या मुलीवर मदरशात शिकवणाऱ्या दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दोन आरोपींची ओळख मोहम्मद अबेदिन आणि त्याचा भाऊ मोहम्मद अर्शद अशी आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘३७६ ड’ (सामूहिक बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, पोलिसांनी बुधवारी अबेदिन आणि पीडितेच्या आईला अटक केली. आमचे पथक दुसरा फरारी आरोपी अर्शदला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी हे चिन्ह पक्षाला बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष’ हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दि.२३ रोजी शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भडगाव पेठ ते वाकदरम्यान दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. यात एक जण जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले. जखमींवर धुळे येथे उपचार केले जात आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप मोतीलाल परदेशी (४७ वडजी) हे बुधवारी दुपारी आपल्या दुचाकीने भडगावहून घरी वडजीला जात असताना शिंदी (भडगाव) येथील संजय हरी वाघ (३२), पत्नी शीतल वाघ (२७) व मुलगा धीरज वाघ (५) हे भडगावकडे येत होते. भडगाव पेठ ते वाकदरम्यान रस्त्यावरील वळणावर या दोन दुचाकींचा अपघात झाला, या अपघातात प्रताप परदेशी हे जागीच ठार झाले, संजय वाघ व मुलगा धीरज…
रावेर : प्रतिनिधी रसलपूर रस्त्यावरील विनायक महाजन यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोकड, मोबाइल, दुचाकी असा एकूण ५ लाख ८१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूरच्या सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सुनील पाटील, पोहेकों गणेश मनुरे, पोकों सुमीत बाविस्कर, हसन अली यांच्या पथकाने ही कारवाई केली. रसलपूर रस्त्यावर विनायक सुनील महाजन (रा. बक्षीपूर, ता. रावेर) याच्या घरात जुगार खेळला जात होता. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने धाड टाकली. त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, १७ हजार ९० रुपयांची रोकड, ५४ हजार…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांचे जोरदार उपोषण सुरु असतांना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे हे मारुतीचे शेपूट आहे. ते शांत बसणार नाहीत. त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे. यात वृद्धांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर थेट जरांगेंना जबाबदार धरले जावे, असे आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला…
धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजनेअंतर्गत धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी शासनाकडून एक कोटी 34 लाख रुपयांचा निधी आज मंजूर केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुरावामुळे हा निधी मंजूर झालेला आहे. धरणगाव शहरातील नगर परिषदेच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी चौथार्याच्या कामासाठी 94 लाख 36 हजार रुपये हे मंजूर झालेले आहे. तर धरणगाव शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीमधील रेल्वे उड्डाणपूल लगत नगरपालिकेच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शासनाकडून चाळीस लाख तेहतीस हजार निधी मंजूर आज केला आहे. त्यामुळे धरणगाव शहरातील सौंदर्यकरणात भर पडणार असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोएडातील बरौला गावात शिव मंदिराजवळ राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलींना चौथ्या मजल्यावरून फेकून दिले. यानंतर महिलेने स्वत:ही उडी मारून आत्महत्या केली. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर महिला सरिता आणि तिची एक मुलगी गंभीर जखमी झाली. या दोघांवर प्रयाग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आता या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सविस्तर वृत्त असे कि, बरौला गावात तीन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहणारी 32 वर्षीय सरिता ही महिला तिचा नवरा मनोज प्रयाग हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. सकाळी साडेनऊच्या सुमारास मनोज घरातून जेवण करून कॅन्टीनमध्ये गेला. अवघ्या 10 ते 20 मिनिटांनी शेजाऱ्यांनी मनोजला…

