Author: editor desk

मुंबई  : वृत्तसंस्था देशातील बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील 24 तासात राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या राज्यात कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मात्र आता राज्यात पावसाची शक्यता असल्याने उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 25 आणि 26 फेब्रुवारीच्या जवळपास बंगालच्या उपसागरातून आग्नेय वारे महाराष्ट्रात आर्द्रता घेऊन येणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसणार आहे. विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान विदर्भात पावसाचा…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील हिवरा नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सारोळा रस्त्यावरील हिवरा नदी पात्रातून दुर्गंधी येत असल्याचे नदी पात्राशेजारील नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयातील तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे पथक व रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूला सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर शहर पोलिसांच्या पथकाने बुधवार दि. २१ रोजी कारवाई केली. याठिकाणाहून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्टेनशनच्या मागील बाजूला उड्डाणपुलाजवळ सार्वजनिक ठिकाणी काही तरुण आमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याठिकाणी गेले असता, पथकाला याठिकाणी काही तरुण गांजा सारखे आमली पदार्थांचे सेवन करतांना दिसून आले. पथकाने त्यांच्यावर छापा टाकीत कारवाई…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी पोलिस दलास हादरा देणाऱ्या चाळीसगाव येथील रहिवासी व मुंबई पोलिस दलातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कोळी याने जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर २१ रोजी न्यायमूर्ती मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज चालले. यात आगोणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आला. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून पंढरीनाथ पवार यांनी बाजू मांडली, आरोपींकडून प्रकाश पाटील यांनी तर फिर्यादी पक्षाकडून कैलास आगोणे यांनी बाजू मांडली.

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आई-वडिलांसोबत तीर्थस्थळी जाण्याची शक्यता आहे. जे लोक टूर आणि ट्रॅव्हलिंग व्यवसाय करत आहेत त्यांना आज अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. नवीन वाहन खरेदीसाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊ शकता. मुलांनी आज आपल्या कामात सावध राहण्याची गरज आहे. आज खरेदीसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी वस्तूंची यादी तयार करा. आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल. आज तुमचे काम काळजीपूर्वक करा. वृषभ आजचा दिवस खूप छान असणार आहे. जे शिक्षक आहेत ते आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकवतील. घरात दूरचे नातेवाईक येण्याची शक्यता आहे. आजची संध्याकाळ कुटुंबासोबत घालवली जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मिठाईचा…

Read More

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी बुधवारी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक त्वेषाने लढले जाईल. त्यात 24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल, असे ते म्हणाले. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मनोज जरांगे यांनी सरकारकडे सगेसोयरे अधिसूचनेच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे आज (दि.२१) निधन झाले. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येते, ते म्हणजे विहिघर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके. १९८६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी कायम ठेवली होती. आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेल्या बैलावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर कितीही किंमत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी-पोकलेन मशीन घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीकडे रवाना होत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या राज्यांच्या सीमा सील केल्या असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अशातच हरियाणातील शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली आहे. घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीमार देखील केला. यावेळी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पीटीआयने आपल्या अधिकृत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकारी नोकर भरतीच्या जाहिराती निघाल्या ही त्याच्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये असते. मात्र सध्या उत्तर प्रदेश पोलीस भरतीच्या परीक्षेला चक्क सनी लियोनी बसल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली आहे. त्यामागचे कारण सुद्धा खास आहे. उत्तर प्रदेश पोलीस भर्तीमध्ये एका व्यक्तीच्या परिक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लिओनीचा फोटो छापण्यात आला. काल हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस चौकशीसाठी उमेदवाराच्या घरी पोहोचले. धर्मेंद्र कुमार असे प्रवेशपत्र असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील रगौलिया बुजुर्ग गावचा रहिवासी आहे. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक चौकशीसाठी त्याच्या गावी पोहोचले. चौकशीदरम्यान धर्मेंद्र कुमारने सांगितले…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भाविकांचे मंगळवारी उपवास होते. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल –रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलीस आणि इतर ग्रामस्थांना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात नेले आहे. तर काही रुग्णांना मेहेकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर दिसून आले आहेत. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले. रात्री उशिरा हा धक्कादायक…

Read More