जळगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या बदल्या झाल्या नाही, त्या रद्द करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस 7 अधिकाऱ्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यामध्ये तीन पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक व सात पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची धुळे येथे, ज्ञानेश्वर जाधव यांची नाशिक ग्रामीण व शिल्पा पाटील यांचीही नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये योगिता नारखेडे यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये जळगावातील गोपाल देशमुख,…
Author: editor desk
मेष : गर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये माघ पोर्णिमेनिमित्त देवाला निघालेल्या भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात पलटी झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ महिला आणि काही लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळी डीएम, एसपी…
जळगाव : प्रतिनिधी शहरामध्ये शनिवार दि. २४ रोजी सकाळी एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास केला. गणेश कॉलनी जवळ बजरंग बोगद्यापाशी एका तरुणाला तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसासह् स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. संशयित आरोपी किशोर रामदास कोळी (वय ३० रा. काचन नगर, जळगाव) याच्या ताब्यातून मोटारसायकलच्या शिटखाली…
हिंगोली : वृत्तसंस्था हिंगोली – वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम गावचे रहिवासी आहेत. आज २४, फेब्रुवारी शनिवारचा दिवस असल्याने हे भाविक सिरसम येथून माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र या भीषण अपघातात पाच जणांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वावडदा येथील मारूती मंदीराच्या बांधकामाच्या ठिकाणाहून आणि जळगाव शहरातील पुरूषोत्तम नगर शिरसोली नाका या दोन ठिकाणावरून सेटींग प्लेटा व साहित्य चोरून नेणाऱ्या एकुण चार संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजीसकाळी १० वाजता वावडदा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरून नेलेले साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वावडदा गावातील मारुती मंदिर आणि शिवस्मारक परिसरात जवळ बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान ३ हजार रुपये किमतीचा लोखंडी सेंटिंग प्लेटा चोरून नेले होते.…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमर्टी ते सत्रासेन रस्त्यावर २३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातून थेट पुणे येथे ३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतूस घेवून जातांना ३ संशयित आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उमर्टी येथून ३ गावटी कट्टे आणि काही जिवंत काडतूस घेवून सत्रासेन मार्गे चोपडा व्हाया पुणे येथे काही जण जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी बुधगाव फाट्याजवळ सापळा लावला. या वेळी राखाडी रंगाची ऑर्टिगा (एमएच १२, आरएफ – १४९६) अडवून झडती घेतली असता त्यात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात क्रिकेट खेळताना वाद होऊन वेदांत नरेश बागडे (वय १८) या तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून दुखापत केली. या वेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील मारहाण करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सोनी नगरात घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनी नगरातील मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळण्यावरून वाद उद्भवला व दोन जणांनी वेदांत बागडे याला मारहाण करत त्याच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. त्यावेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी वेदांतने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या…
भुसावळ : प्रतिनिधी प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये घेऊन प्लॉटची खरेदी करून न दिल्याचा प्रकार शहरात घडला. या प्रकरणी सागर शिवदास वानखडे (६३, रा. इंद्रप्रस्थनगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून महेंद्र उर्फ विकी प्रकाश संसारे (साकरी फाटा, वरणगाव रोड, भुसावळ) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वानखडे यांनी फसवणुकीनंतर दिलेल्या तक्रारीनुसार माहिती अशी की, सव्र्व्हे क्रमांक १८८/१/१९०/२/अ मधील प्लॉट क्रमांक ७९ हा तक्रारदारांना विक्री करण्याच्या बहाण्याने विकी संसारे याने १८ लाख रुपये स्वीकारले. मात्र, प्लॉटची खरेदी करून दिली नाही. आरोपी महेंद्र संसारे याने मीच तुम्हाला ३० लाख रुपये दिले आहेत, असा…
जळगाव : प्रतिनिधी वाळू बांधकामासाठी लागणारी अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार घडत. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते म्हणून राज्य सरकारने १६ फेफ्रुवारी २०२४ ला नवे धोरण जाहीर केले. त्याप्रमाणे आता वाळू ६०० रुपये प्रती ब्रास मिळणार आहे. आता जिल्हा प्रशासनाने घरकुलासाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा खानिकर्म अधिकारी रविंद्र उगले, प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार सातपुते,…

