Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शत्रूत्व सर्वश्रूत आहे. पण आता ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनात कोणतीही आढी न ठेवता थेट मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानलेत. यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे लवकरच शिंदेंच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यातच ठाकरेंनी शिंदेंचे आभार मानले आहेत हे विशेष. मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राहीली असुन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम देखील बिनविरोध निवडून आले आहे. दूध संघाप्रमाणेच राज्य मार्केटिंग फेडरेशनवर दोन्ही मित्र निवडून आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीची आज माघारीचा शेवटचा दिवस होता. गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. ही घटना दि. १८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. ही मुलगी घरात एकटीच असतांना तीला दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी दि. १९ रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता मेहरुण गावात १६ रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी १५ दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र तसे न करता मेहरुण गाव शिवारात १६ फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. हा प्रकार लक्षात आल्याने जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी गणेश भांडारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आयोजक वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असून आज मराठा आरक्षण विधेयक राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच हाताला लावलेली सलाइन काढली. आंदोलनाची पुढील दिशा उद्या ठरणार असल्याचं सांगितलं. उद्या आंदोलनासंदर्भात घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. याच मराठा बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १०-१० आरक्षणाला मंजुरी देण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारनं राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं होतं. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं. आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने आज, मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची तरतूद असणारे…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धरणगाव येथील मातोश्रीनगर येथे सावित्रीबाई फुले या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना चांगले आरोग्य व मन: शांतीसाठी हे उद्यान उपयोगी पडेल तसेच या उद्यानामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडली असून सर्वांनी याचा काळजी पूर्वक वापर करावा. मातोश्री नगर मध्ये होत असलेल्या सर्वसमावेशक कार्याचे कौतुक केले. आयुष्यात जीवन सुकर होण्यासाठी अशीच एकजूट कायम ठेवां. माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांनी हमालवाडा परिसरात कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चाने येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या पाण्याची व्यवस्था या उपक्रमाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. या भागातील उद्यान सुशोभीकरण व काँक्रीटीकारणासाठी ३० लाखाचा निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. धरणगाव येथील मातोश्री…

Read More

जळगाव : प्रतिनिधी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचे नुसते नाव विचारले तरी स्फुलिंग जागृत होते. त्यांचा इतिहास आपल्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श प्रत्येकाने कृतीत उतरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळके येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवप्रेमी सोबत आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. बसस्थानक परिसरात भगवे झेंडे, कमानी व बॅनर मुळे वातावरण…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लडाखमध्ये असलेल्या कारगिलमध्ये रात्री ९.३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जीवित व वित्तहानी झाल्याचे अद्याप कोणतेच वृत्त नाही. परंतु भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. शुक्रवारी श्रीनगर आणि गुलमर्गमध्ये ३.९ तीव्रतेचे धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या काळात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ मोजण्यात आली होती. भूकंपाची खोली ५ किमी होती. या भूकंपामुळे कोणतेच नुकसान झाले नाही. भूकंपाच्या दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीर अत्यंत संवेदनशील मानले जाते, अशी माहिती सिस्मोलॉजी डिपार्टमेंटने दिलीय.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्य सरकारचं विशेष आज पार पडत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावर आज विधीमंडळात त्यावर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय घेतला जाणार आहे. त्याआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे मुद्दा महत्त्वाचा आहे. सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा. विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांबाबत चर्चा झाली नाहीतर पुढे भयंकर असे मराठा आंदोलन उभं राहील. आंदोलन पाहून पश्चाताप काय असतो हे सरकारले कळेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. ज्या मराठ्यांच्या…

Read More