जालना : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकास्थान फडणवीसांचं आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचाबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या काळात दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी कारवाई करत बेकायदेशीर वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत ५ डंपर, ५ ट्रॅक्टर, २ जेसीबी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १० जणांविरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी व भडगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या ठिकाणावर मध्यरात्री छापा टाकला. याप्रकरणी संदीप मुरलीधर पाटील (४१, वडगाव सतीचे, ता. भडगाव), अक्षय देवीदास मालचे (२०), प्रवीण विजय मोरे (२०), मच्छिंद्र गिरधर ठाकरे (२१), ललित रामा…
जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे पंकज राजेंद्र मराठे (३४, रा. कानळदा, ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. या अपघातात गोपाल वसंत पाटील (२९, रा. कानळदा, ता. जळगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव ते कानळदा रस्त्यावरील वळणावर झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कानळदा येथील पंकज मराठे हा तरुण जळगावातील एका गादी कारखान्यात कामाला होता. शनिवारी रात्री तो व त्याचा मित्र गोपाल पाटील दुचाकीने जळगाव येथून कानळदा येथे घरी जात होते. आव्हाणे गावाच्या पुढे गेल्यानंतर एका…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू गोड सुपारीचा साठा केलेल्या गोदामावर कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने १४ लाख एक हजार ६१२ रुपयांचा साठा जप्त केला, ही कारवाई औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या दोन गोदामांमध्ये करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गोदाम मालक हिरालाल उत्तम पाटील (३८, रा. पिंप्राळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील गोदामात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागाचे नाशिकचे सहायक आयुक्त एम. एम. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, अमित रासकर, गोपाल कासार, उमेश सूर्यवंशी…
धुळे : प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील एका निवासी शाळेमध्ये शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना २१ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १०, १३ आणि १४ वर्ष वयाच्या या मुली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात निवासी शाळा असून, त्यातील शिक्षकाने मध्यरात्रीच्या सुमारास तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणी एका विद्यार्थिनीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिस स्टेशनला २४ फेब्रुवारी रोजी संबंधित शिक्षकाविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), (१) (आय), लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ८, अ.जा,…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. आज तुम्ही आई-वडिलांसोबत मंदिरात दर्शनासाठी जाल. काही लोक आज तुमच्या वागण्याने खूप प्रभावित होऊ शकतात. काही शुभ कार्यात नवीन लोकांची मदत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वासाच्या मदतीने संबंध अधिक दृढ होतील. तुमची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. कार्यालयातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने तुमचा उत्साह वाढेल. मुलांशी संबंधित काही महत्त्वाची कामे आज पूर्ण होऊ शकतात. लव्हमेट्स आज कुठेतरी बाहेर जातील आणि रात्रीच्या जेवणाची योजना देखील करतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. आज तुम्हाला कामात यश मिळेल. आज तुम्हाला काही काम पूर्ण करण्यासाठी नवीन कल्पना येईल.…
जळगाव : प्रतिनिधी शेतात जात असताना अंगावर घेतलेली शाल बैलगाडीच्या चाकात अडकून गळफास लागल्याने जानुबाई भायला बारेला (वय ३२, रा. गोंट्या पांचाळ, ता. भगवानपुरा जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. भादली, ता. जळगाव) या शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली येथे राहणाऱ्या जानुबाई बारेला या शनिवारी बैलगाडीने शेतात जात होत्या. त्यावेळी अंगावरील शाल बैलगाडीच्या चाकात अडकली. यात त्यांच्या मानेला गळफास बसला व गळ्यात असलेल्या दागिन्यांमुळे जबर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ाशिराबाद पोलिस घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
जळगाव : प्रतिनिधी घरकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मनीषा श्यामकांत बाविस्कर (३०, रा. श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना श्रीरत्न कॉलनीत शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी.वर्कशॉपमध्ये नोकरीला असलेल्या मनीषा बाविस्कर या शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी घरी काम करत असताना सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यासंदर्भात रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झाल्याने विश्वास संपादन करीत जळगावातील वेळोवेळी अत्याचार महिलेवर करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेने विरोध केल्यानंतरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या दिनेश पांडुरंग चौधरी (रा. सानपाडा) या रेल्वे पोलिसाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला रेल्वेने मुंबईला जात असताना तिची दिनेश चौधरी याच्याशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने संपर्क वाढवला व महिलेचा विश्वास संपादन शारीरिक संबंध केले. १ एप्रिल २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान तो वेळोवळी जळगावला आला व त्याने महिलेच्या घरी केला. जाऊन तिच्यावर…
भुसावळ : प्रतिनिधी सार्वजनिक जागी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा असतानाही गांजा ओढणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिरा हॉलच्या बाजूला गांजा ओढणाऱ्या सलमान शेख सलीम शेख (२०, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात हे.कॉ. भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, खडका रोडवरील ईदगाहनजीक युनूस हमीद शेख (४८, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हा गांजा ओढत असताना कॉन्स्टेबल अमर अढाळे यांनी कारवाई केली तर करीम नूर मोहम्मद शेख (५६, उस्मानिया मशिदीजवळ, भुसावळ) यास गांजा ओढताना हे.कॉ. जावेद हकीम शाह यांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

