• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जरांगे हे मारुतीचे शेपूट ; मंत्री भुजबळ यांचा हल्लाबोल

editor desk by editor desk
February 22, 2024
in राजकारण, राज्य
0
जरांगे हे मारुतीचे शेपूट ; मंत्री भुजबळ यांचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांचे जोरदार उपोषण सुरु असतांना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे हे मारुतीचे शेपूट आहे. ते शांत बसणार नाहीत. त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे. यात वृद्धांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर थेट जरांगेंना जबाबदार धरले जावे, असे आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केले आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. या मुद्यावरून दोघांमध्ये गत अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. जरांगे यांनी बुधवारी आपले आंदोलन अधिक उग्र करत यापुढील उपोषणांत मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाही उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच 24 तारखेपासून गावोगावी रास्ता रोको करण्याचाही इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा छगन भुजबळ यांनी गुरुवारी चांगलाच समाचार घेतला.

मनोज जरांगे यांना काही कळत नाही. आता त्यांनी विनाकारण गाव बंद करण्याचा इशारा दिला आहे. कहर म्हणजे ते वयस्कर लोकांनाही उपोषणाला बसवत आहेत. या नागरिकांच्या जिवाला काही झाले तर काय करायचे? सरकार सर्वच गोष्टींवर सकारात्मक विचार करत आहे. पण ते उगीचच गैरसमज निर्माण करत आहेत. ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काहीही बरळत आहेत. त्यांनी 10 तारखेच्या उपोषणासाठी समाजातील लोकांनाही विश्वासात घेतले नव्हते. श्रेय घेण्यासाठी ते स्वतःच उपोषणा जाऊन बसले, असे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी यावेळी पोलिसांना उपोषणात ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला काही झाले तर जरांगे यांना जबाबदारा धरण्याचेही आवाहन केले. आंदोलनात वयस्कर लोकांना काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना जबाबदार धरावे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातच हे रस्ते बंद करत आहेत. त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. ते प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत आहेत. ते 10 तारखेला उपोषणाला बसले. त्यावेळी त्यांनी समाजाला विश्वासात घेतले होते का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Previous Post

धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या उभारणीसाठी सव्वा कोटीचा निधी मंजूर..!

Next Post

जळगाव ग्रामीण मधून ठाकरे गटाचे महाजन यांनी ठोकला शड्डू

Next Post

जळगाव ग्रामीण मधून ठाकरे गटाचे महाजन यांनी ठोकला शड्डू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group