जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात काही समाजकंटकांकडून बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, उमर्टी गावाकडून कृष्णापूर–मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन इसम मोटारसायकलवरून विनापरवाना पिस्तूल घेऊन येत आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत उमर्टीहून येणारी…
Author: editor desk
मुंबई : प्रतिनिधी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर महिलाविरोधी मानसिकतेचा आरोप केला. संसदेत या विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळू न दिल्याने विरोधकांनी देशातील सुमारे 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी केली. फडणवीस म्हणाले की, 17 एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात निर्णायक ठरेल अशी अपेक्षा होती. त्या दिवशी महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, अशी सर्वसाधारण भावना होती. मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष यांसह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला आवश्यक पाठिंबा न दिल्याचा आरोप त्यांनी केला. “विरोधकांनी केवळ विधेयक रोखले…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मन मंदिराच्या समोर दुचाकीद्वारे यावलकडे येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला क्रुझर वरील चालकाने भरधाव वेगात मागून धडक दिली. यामध्ये ३८ वर्षीय पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव (ता. यावल) येथून यावल येणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मन मंदिराच्या समोरून दि. ९ रोजी रात्री भरत विठ्ठल कोळी (वय ३८) हा यावल येथील पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोटरसायकल (एमएच. १९ सीजी २८१३) द्वारे यावल येथुन किनगाव मार्गे विदगाव जात होता. दरम्यान भरधाव वेगात मागून कुझर चारचाकी वाहन (एम. एच. २९ बी.सी. ५४८७)…
जळगाव : प्रतिनिधी दुचाकीवरुन जात असलेल्या प्रेम गोपाल धनगर (वय १९, रा. बोरणार, ता. जळगाव) या तरुणाला अडवित जून्या वादातून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बोरणार गावाजवळ घडली. यापक्ररणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेला गावातील अवैध धंद्याची किनार असून त्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोरणार येथील प्रेम धनगर हा तरुण दि. १७ रोजी रात्री दुचाकीने म्हसावद येथून घरी जात होता. गावापासून एक कि मी अंतरावर असलेल्या हॉटेल स्वराज्यजवळ संशयित राकेश पाटील व गजा कोळी यांनी त्याला अडविले. त्याला दुचाकीवरुन खाली उतरवून जून्या वादातून…
वरणगाव : प्रतिनिधी येथील भोईवाडा परिसरातील रहिवासी रितेश रवींद्र सोनवणे (३०) यांचा अक्षय तृतीयेच्या दिवशी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. लग्नास अवघे आठ दिवस शिल्लक असताना घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितेश यांचा विवाह दि. २८ एप्रिल रोजी देवधाबा (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथील पांडुरंग बोरसे यांच्या मुलीसोबत निश्चित झाला होता. घरात लग्नाची तयारी, खरेदी व आनंदाचे वातावरण सुरू असतानाच ही घटना घडली. अक्षय तृतीयेच्या पूजनाची तयारी सुरू असताना अचानक रितेश यांना झटका आल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. दोन दिवसांपूर्वीच मित्रपरिवाराने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. या घटनेमुळे वरणगाव शहरात…
वरणगाव : प्रतिनिधी शहरातील भवानी नगर परिसरात घरासमोर उभी केलेली चारचाकी गाडी हटविण्यास सांगितल्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप हरी चौधरी (रा. भवानी नगर) यांनी फिर्याद दिली. शनिवारी रात्री सुमारे सव्वादहा वाजेच्या सुमारास नाजीमअली गोबा याने चौधरी यांच्या घरासमोर चारचाकी उभी केली होती. पाणी भरण्यास अडचण होत असल्याने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत दिलीप चौधरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, पत्नी सरला चौधरी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. झटापटीत त्यांच्या गळ्यातील सुमारे…
आजचे राशिभविष्य दि.२० एप्रिल २०२६ मेष राशी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल आणि तुम्ही हा आनंद तुमच्या मित्रांसोबत वाटून घ्याल. थोड्याशा मेहनतीने तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. तुमचे मित्र तुमच्यासाठी एक सरप्राईज पार्टी आयोजित करून एक मजेदार वातावरण निर्माण करतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल आणि तुम्ही एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घ्याल वृषभ राशी आज तुम्हाला एका शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. तुमचे वडील तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करतील, ज्यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळेल. आज महिला घरकामात व्यस्त राहतील आणि संपूर्ण कुटुंबाला आवडतील असे नवीन पदार्थ बनवतील. तुम्ही काहीतरी नवीन करण्याकडे आकर्षित…
मुंबई : वृत्तसंस्था अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असताना, बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यस्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले. राज्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी वधू-वरांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे. तालुका आणि ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करण्यात येणार असून, देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर…
नागपूर : वृत्तसंस्था नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असताना, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले असल्याचा दावा करत त्यांनी तपास प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला आहे. प्रा. मानव यांनी म्हटले की, “हे प्रकरण आज घराघरात पोहोचण्यामागे राजकीय संबंध हेच मुख्य कारण आहे. जर या बाबाचा संबंध सत्ताधाऱ्यांशी नसता, तर कदाचित पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकले असते.” त्यांनी पुढे असा आरोप केला की, काही राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेली अॅपे रिक्षा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोधून काढत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सिव्हील हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ३ जवळील पार्किंगमधून MH19 BJ 4025 क्रमांकाची काळ्या-पिवळ्या रंगाची तीन चाकी अॅपे रिक्षा चोरीस गेली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे दि. १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना प्रभारी अधिकारी यांनी विशेष पथकाची स्थापना केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कल्पेश ज्ञानेश्वर…

