वरणगाव : प्रतिनिधी काळबांडे वाड्यातील रहिवासी ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या मुलीचे लग्न निश्चीत झाले. दोन्ही घरात आनंदाचे वातावरण असताना लग्नाच्या दिवशीच दि. १ मे रोजी सकाळी मुलीचे काका सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (५२) यांचे हृदयविकाराने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून गव्हाणकर परिवारात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. आपल्या पुतणीच्या लग्नासाठी सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (५२) हे हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सदाशिव हे लवकर झोपी गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठलेच नाहीत. झोपेत हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. लग्न मंडपातील आनंदाचे वातावरण पूर्णपणे विरून गेले. लग्नाचाच दिवस असल्याने आधी मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न लावण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन नंदुरबार जिल्ह्यातील २६ वर्षीय तरुणीवर जळगावातील भागवत गोविंदा चव्हाण (रा. वाघ नगर) याने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तरुणीने विरोध केला असता, तिला जबर मारहाण करून तिचा मोबाइल व कागदपत्रे लांबवली. ही घटना १० एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी नंदुरबार येथे गुन्हा दाखल होऊन तो जळगाव तालुका पोलिस ठाण्यात ३० एप्रिल रोजी वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील एक २६ वर्षीय तरुणी खासगी नोकरीसाठी जळगावात राहते. तिची भागवत चव्हाण याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत १० एप्रिल रोजी रात्री त्याने सदर तरुणीला खोटे नगर परिसरातील निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्यावर…
आजचे राशिभविष्य दि.३ मे २०२६ मेष राशी ज्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, त्यांना नक्कीच यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. आज तुम्ही उत्साही आणि निरोगी राहाल. तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत जेवायला किंवा फिरायला बाहेर गेल्याने तुम्हाला मनःशांती आणि आनंदी मनःस्थिती मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि समाजाकडून विशेष सन्मानही मिळू शकतो. वृषभ राशी दीर्घकाळच्या समस्येचे आज निराकरण होऊ शकते. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्ही जुन्या मित्रांना भेटण्याचा प्रयत्न कराल. आज जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल, तेव्हा तुम्ही कधीही कल्पना न केलेली व्यक्ती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेतून सुमारे 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांच्या खात्यात येणारी मासिक आर्थिक मदत थांबण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून लाखो महिलांना याचा थेट लाभ झाला होता. मात्र, कालांतराने काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची प्रकरणे उघडकीस…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे संकेत देणारे विधान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार असल्याचे सांगताना त्यांनी 2029 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकतात, असे स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे सत्ताधारी युतीच्या भवितव्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, राजकारणात कोणतेही कायमस्वरूपी बंधन किंवा करार नसतो. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. त्यामुळे 2029 ला भाजप किंवा शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. यामध्ये काहीही गैर नसून, प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते पुढे म्हणाले की, भूतकाळात…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा निकाल सर्वात कमी असल्याने राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. निकालात घट झाली असली तरी कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व कायम राखले आहे. कोकण – 94.14% पुणे – 91.25% अमरावती – 90.92% नाशिक – 90.72% मुंबई – 90.08% कोल्हापूर – 89.97% छत्रपती संभाजीनगर – 88.68% नागपूर – 88.67% लातूर – 84.14% (राज्यात शेवटचा) राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील लाखो मोबाईल वापरकर्त्यांना शनिवारी सकाळी ११:४५ वाजता अचानक सायरनचा मोठा आवाज ऐकू आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मोबाईल स्क्रीनवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत एक संदेश दिसत होता, तर सायरन थांबल्यानंतर तोच संदेश मोबाईलद्वारे मोठ्याने वाचूनही दाखवण्यात आला. या अनपेक्षित अलर्टमुळे अनेक नागरिक घाबरले, तर काहीजण संभ्रमात पडले. मात्र, हा कोणताही धोका नसून ही केवळ आपत्कालीन संदेश प्रणालीची चाचणी असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. ही चाचणी National Disaster Management Authority (NDMA) यांच्या वतीने करण्यात आली होती. NDMA ने २ मे रोजी देशभरात ‘सेल ब्रॉडकास्ट’ (Cell Broadcast – CB) तंत्रज्ञानावर आधारित आपत्कालीन अलर्ट प्रणालीची चाचणी केली. या…
मुंबई | प्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो, असे संजय राऊत म्हणतात; कदाचित ते काही अंशी खरेही असू शकते. कारण सध्याची राजकीय परिस्थिती जात, धर्म आणि पैशांकडे झुकली आहे,” असे म्हणत त्यांनी राजकारणातील बदलत्या प्रवाहावर भाष्य केले. बच्चू कडू पुढे म्हणाले की, “मी शिवसेनेत प्रवेश हा मजबुरीमुळे केलेला नाही, तर बदललेल्या परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय आहे. गेली 25 वर्षे मी जनतेलाच माझा नेता मानत आलो. मात्र, निवडणुकीत आमच्या ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध पक्षांकडे वळण घेतले. काही भाजपमध्ये गेले, काही…
मुंबई | प्रतिनिधी राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या प्रवासात वाढ होणार असून, तिकीटावर प्रति प्रवास 2 रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’ आकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ व दर्जेदार सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या कायापालटाचा आराखडा जाहीर केला. गेल्या काही वर्षांत बसस्थानकांवरील अस्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने स्वच्छता सुधारण्यासाठी हा अधिभार लागू करण्यात येणार आहे. या माध्यमातून जमा होणारा निधी थेट स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार असून, त्यासाठी व्यावसायिक कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत 1 जूनपासून सर्व एसटी स्थानकांवरील शौचालये प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध केली जाणार आहेत.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृ्त्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने आपल्या अहवालात या कुटुंबाने खाल्लेल्या टरबुजात कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा दावा केला आहे. परिणामी, टरबूज खाल्ल्यामुळे या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उजेडात आली होती. या मृत्यूंमुळे राज्यासह देशात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया व जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी व त्यानंतर कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला होता.…

