Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बारावी निकालात घसरण; राज्याचा टक्का खाली, कोकण पुन्हा अव्वल!
    क्राईम

    बारावी निकालात घसरण; राज्याचा टक्का खाली, कोकण पुन्हा अव्वल!

    editor deskBy editor deskMay 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा निकाल सर्वात कमी असल्याने राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. निकालात घट झाली असली तरी कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

    • कोकण – 94.14%
    • पुणे – 91.25%
    • अमरावती – 90.92%
    • नाशिक – 90.72%
    • मुंबई – 90.08%
    • कोल्हापूर – 89.97%
    • छत्रपती संभाजीनगर – 88.68%
    • नागपूर – 88.67%
    • लातूर – 84.14% (राज्यात शेवटचा)

    राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआयसाठी 14,44,713 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विद्यार्थी परीक्षेस बसले आणि 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 37,559 खाजगी विद्यार्थ्यांपैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णता 80.21% इतकी आहे. 50,876 पुनर्परीक्षार्थ्यांपैकी केवळ 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णता 36.44% इतकी राहिली. 8,446 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 7,579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णता 90.58% इतकी आहे. मुलींची उत्तीर्णता 93.15% असून मुलांची 86.80% आहे. म्हणजेच मुली 6.35% ने आघाडीवर आहेत. एकूण 153 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100% लागला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    देशभरात एकाच वेळी मोबाईलवर सायरन; नागरिकांमध्ये खळबळ!

    May 2, 2026

    परिस्थितीमुळे शिवसेनेत प्रवेश”; बच्चू कडूंचा खुलासा, टीकाकारांना ठणकावले उत्तर

    May 2, 2026

    एसटीचा प्रवास महागणार; स्वच्छता अधिभार लागू

    May 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.