जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन विजयी झाले. या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे शरद शामराव यांना १७ मते, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते तर रेश्मा कुंदन काळे यांना १ मत मिळाले. याशिवाय ५ मते अवैध ठरली. मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर श्री. महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली. मतमोजणीनंतर मा. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा…
Author: editor desk
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, महायुतीने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत महायुतीने तब्बल १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. तर महाविकास आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. १८ जून रोजी झालेल्या मतदानानंतर रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मात्र, या निवडणुकीत मतदानापूर्वीच १७ पैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष लढत केवळ ११ जागांसाठी झाली. या ११ पैकी १० जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकावला. मात्र, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना मागच्या दरवाजाने घरात घुसून दीपक प्रकाश निकम (वय ३५) याने या मुलीवर अत्याचार केला. ही घटना दि. ७एप्रिल रोजी तालुक्यातील एका गावात घडली. काही दिवसांच्या अंतराने त्याने पुन्हा हे कृत्य केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. २० जून रोजी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय तरुणी घरात एकटीच असताना दीपक निकम हा घराच्या मागच्या दरवाजाने घरात घुसला. मुलगी स्वयंपाक खोलीत काम करत असताना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला तो दुसऱ्या खोलीत घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतरही त्याने…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा तब्बल ५७७ मतांच्या फरकाने पराभव केला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्यातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणीसाठी प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती. दरम्यान, मतमोजणी सुरू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था शहरातील पुंडलिकनगर परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. महारुद्र हनुमान मंदिराजवळील एका दुमजली इमारतीत झालेल्या या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे इमारतीत अडकलेल्या अन्य नऊ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर परिसरातील संबंधित दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर दुकाने असून वरच्या मजल्यावर निवासी घरे आहेत. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावरील एका दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानाच्या पाठीमागील खोलीत ठेवलेल्या चार गॅस सिलिंडरपैकी एका सिलिंडरचा गळतीमुळे भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की त्याचे हादरे…
कोल्हापूर : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकास प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वाची माहिती देताना शिवसेनेतील फुटीच्या राजकारणावरही भाष्य केले. “आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना,” असे विधान करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ‘शिंदे गट’ म्हणून संबोधले जात होते. मात्र आता तो कोणताही गट राहिलेला नसून तीच खरी शिवसेना असल्याचे जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकच शिवसेना असून ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…
परभणी : वृत्तसंस्था परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ ते १० भाविक गंभीर जखमी झाले असून, ३० ते ४० भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यशवाडी देवस्थान हे परभणी जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून दर शनिवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. शनिवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. मंदिरासमोरील सभागृहात कीर्तन, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन…
जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या गंभीर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुक्ताईनगर तालुक्यातील कुप्रसिद्ध गावांवर मोठी धडक कारवाई करत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ राबविले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल २०० पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईत विविध गुन्ह्यांतील ८ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालमोटा, हलवेडा, मथापुरी, जोहेलखेडा आणि चारठाणा ही गावे गेल्या काही वर्षांपासून विविध फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तू, खजिना, जुन्या नाण्यांचा व्यापार, काळी हळद, नागमणी, रेड…
मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील विविध घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना (उबाठा), संजय राऊत, तृणमूल काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या भवितव्यावर रोखठोक प्रतिक्रिया दिल्या. वृत्तसंस्था एएनआयशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या राजकीय निर्णयावर टीका करताना त्यालाच शिवसेनेच्या आजच्या स्थितीचे मूळ कारण असल्याचे म्हटले. आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महायुतीची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शिवसेनेच्या मूळ विचारधारेच्या विरोधात होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेल्यामुळेच आज अनेक जुने शिवसैनिक आणि नेते पक्षापासून दूर जात आहेत. सुरुवातीपासून एनडीएसोबत युती कायम…
मुंबई : प्रतिनिधी माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) वापरावर नवे निर्बंध आणणारी महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ ही नवी नियमावली राज्य सरकारने १२ जूनपासून लागू केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, अर्ज शुल्क, अपील शुल्क, शब्दमर्यादा, ओळखपत्राची सक्ती आणि माहिती मागवण्याचे कारण स्पष्ट करण्याची अट अशा अनेक महत्त्वाच्या बदलांचा त्यात समावेश आहे. या नव्या नियमांमुळे माहितीचा अधिकार अधिक जाचक होणार असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विशेषतः माहिती मागवण्याचे कारण विचारण्याची अट ही माहिती अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशालाच छेद देणारी असल्याची टीका होत आहे. माहिती अधिकार…

