लातूर : वृत्तसंस्था राज्यातील लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून खरोसा येथे एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. या भीषण आणि खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, खरोसा येथील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे कौटुंबिक वादातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय 25) या विवाहित महिलेने पतीसोबत झालेल्या टोकाच्या वादातून आपली दोन लहान मुले, शिवानी आणि शिवांश यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता जळगाव जिल्ह्याची कमान श्रीकांत धिवरे सांभाळणार आहेत. डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. रेड्डी यांनी जळगाव पोलीस दलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील गुन्हेगारीवर मोठा अंकुश मिळवण्यात पोलिसांना यश आले होते. विशेषतः जिल्ह्यातील क्लिष्ट खून प्रकरणे आणि गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथून यावल रस्त्यावरील हॉटेल मन मंदिरसमोर दुचाकीद्वारे यावलकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुझरने भरधाव वेगाने मागाहून धडक दिली होती. या अपघातात ३८ वर्षीय पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. तर, उपचारादरम्यान त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सोमवारी पहाटेपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर विदगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत शासकिय इतमामात अंतसंस्कार करण्यात आलेत. या अपघातप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार भरत विठ्ठल कोळी (वय ३८) हे ९ एप्रिलला विदगाव येथून किनगाव मार्गे दुचाकी (एमएच १९, सीजी- २८१३) ने येत होते. दरम्यान, अंकलेश्वर ते ब-हाणपूर महामार्गावरील किनगाव जवळील हॉटेल मनमंदिर समोर…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ सोमवारी सकाळी 45 वर्षीय व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृताचा गळा कापून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृताच्या खिशात मिळालेल्या एका लग्नपत्रिकेवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, सदर मृतदेह तारामती नगर येथील रहिवासी प्रदीप राजू माळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, सोमवारी सकाळी शहरातील धरणगाव नाक्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची बातमी पोलिसांना मिळाली. या नंतर क्षणाचाही विलंब ना करता पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले, तर मृताच्या गळ्यावर वार केल्याचे दिसून आले. सुरुवातीला…
जळगाव : प्रतिनिधी मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेख इस्माईल शेख असगर (२५, रा. अक्सानगर) या तरुणाच्या कपाळावर तलवारीने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. अन्य दोन जणांनी मारहाण केली. ही घटना १८ एप्रिल रोजी अक्सानगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. १९ रोजी, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत. अक्सानगरातील रहिवासी शेख ईस्माईल यांच्या मित्राशी काही जणांचे भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी शेख ईस्माईल गेले असता शहाबाज ऊर्फ नगिना याने त्यांच्या कपाळावर तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तौसिफ पाशा ऊर्फ बिहारी व उजेर पिरजादा या दोघांनी मारहाण केली व…
भुसावळ : प्रतिनिधी सोशल मीडियावरील बनावट ओळख, परदेशातून पार्सल व डॉलरची लालूच, तसेच एफबीआय, अमेरिकन सैन्य आणि भारतीय कस्टम विभागाची भीती दाखवत भुसावळ एमआयडीसीतील एका कामगाराकडून तब्बल ३ लाख ४७ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एका कंपनी मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले चंदन मुन्ना मौर्य (वय ३४) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. दि. ८ जून २०२४ रोजी टेलर नावाच्या फेसबुक पेजवरून मौर्य यांच्याशी संपर्क साधण्यात आला. काही दिवस संवाद साधून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मियामी (अमेरिका) येथून पार्सल पाठवले आहे. असे सांगून डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली पैसे…
आजचे राशिभविष्य दि. २१ एप्रिल २०२६ मेष राशी आज तुमची अडकलेली कामं नक्की पूर्ण होतील आणि तुम्हाला आराम वाटेल. आजचा दिवस या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभ असेल; तुम्ही लवकरच तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. हा दिवस विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत नातेवाईकांच्या घरी भेट देऊ शकता. कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळाल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेष राशी आज तुमची अडकलेली कामं नक्की पूर्ण होतील आणि तुम्हाला आराम वाटेल. आजचा दिवस या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभ असेल; तुम्ही लवकरच तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. हा दिवस विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत नातेवाईकांच्या…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून, आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील एका गावात सावत्र आई आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला दोन मुले व दोन मुली असून दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. कौटुंबिक वादामुळे त्याची पहिली पत्नी मागील १५ वर्षांपासून माहेरी राहत आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी त्या व्यक्तीने एका परित्यक्त्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना कालांतराने या महिलेचे आपल्या सावत्र मुलाशी अनैतिक संबंध जुळल्याचे समोर…
अहमदनगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुरीत गेल्या काही वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक येत्या २३ तारखेला होत असून वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर सुजात आंबेडकर यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेत सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत मतदारांना आवाहन केले. सुजात आंबेडकर म्हणाले की, “राहुरीत गेल्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली. या कारवाईत आरोपीकडून बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, नशिराबाद बसस्टॅण्ड परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. वरची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) हा सराईत आरोपी गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करीत फिरत आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर नारखेडे यांनी आपल्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून सायंकाळी सुमारे…

