धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एकलग्न येथील अशोक रतन पाटील (वय ७२) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एकलग्न येथील अशोक पाटील हे ५ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. या वेळी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, मयत अशोक पाटील हे शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मात निधनामुळे एकलग्न गावात शोककळा पसरली आहे. तर अशोक पाटील यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ शुक्रवारी दुपारी भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेसह दोन बालके आणि एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील फासे पारधी समाजातील काही कुटुंबीय वरणगाव परिसरातील कपीलनगर येथे पत्र्याच्या घरात वास्तव्यास होते. ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत होते. शुक्रवारी दुपारी जय शंकर काळे (वय १९) हा आपल्या मामी ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा…
मुंबई : वृत्तसंस्था रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याचा दावा केला आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बाळ माने यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या जागेवर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अंतर्गत…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत हे दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून महायुतीने आतापर्यंत ६ जागांवर विजय मिळविला आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये बंडखोरीमुळे काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. महायुतीतच अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडी…
जळगाव : प्रतिनिधी शासनाच्या योजनेतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच घेण्यासाठी गेलेल्या तक्रादाराला संच वाटप केंद्रावरील खासगी व्यक्ती असलेल्या भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. जळगाव) या तरुणीला शंभर रुपयांची लाच घेतांना गुरुवारी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तरुणीजवळ असलेल्या डब्ब्यातून लाचेपोटी स्विकारलेली २६ हजार ७७० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. तक्रादार यांनी ३ जून रोजी अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्याकरीता नोंदणी केली होती. ४ जून रोजी संच घेण्याकरीता जळगाव तालुक्यातील वावडदा येथे संच वाटप केंद्रावर गेले होते. या केंद्रावर असलेल्या भाग्यश्री पाटील यांनी तक्रादार यांना तुमची केवायसी करीता दोन फॉर्म विकत घ्यावे लागतील त्याकरीता शंभर रुपयांच्या…
जळगाव : प्रतिनिधी निवडणूक विषयक कामकाजात जाणीवपूर्वक दिरंगाई आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरातील १३ बीएलओ कर्मचाऱ्यांवर जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार (वय ५४) यांनी ३ जून रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जळगाव शहरात ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती. भुसावळ सत्र न्यायालयात हा खटला चालला. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर केले. गुरुवारी न्यायालयाने अंतिम निकाल देताना स्पष्ट केले की, ‘हा गुन्हा अत्यंत गंभीर, क्रूर आणि दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचा…
जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतात चार निष्पाप भावंडांच्या निघृण हत्याकांडप्रकरणी न्यायालयाने आरोपी महेंद्र सीताराम बारेला (२६, रा. केहऱ्हाळे, ता. रावेर) याला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष जलद न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. यादव यांनी गुरुवारी हा निकाल दिला. हे हत्याकांड १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडले होते. बोरखेडा गावाजवळ एका शेतात एक दाम्पत्य आपल्या पाच मुलांसह सालदार म्हणून वास्तव्यास होते. १५ ऑक्टोबर २०२० रोजी हे दाम्पत्य काही आपल्या मूळ गावी (मध्य प्रदेश) गेले होते. याचा गैरफायदा घेत महेंद्र बारेला याने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला; तसेच पीडितेच्या तीन निष्पाप भावंडांवरही कुन्हाडीने सपासप वार केले. १६ ऑक्टोबरच्या सकाळी…
आजचे राशिभविष्य दि.५ जून २०२६ मेष राशी आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल, नशिबाची साथ मिळेल. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईलय. तुम्ही एखाद्या मनोरंजनाच्या किंवा विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असाल. तुमच्या वडीलधाऱ्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल. तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांचा आनंद घ्याल. तुमचे मूल त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडेल, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. वृषभ राशी तुम्हाला एका शुभ किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल, ज्यामुळे आनंद होईल. आज तुमच्या बोलण्यामुळे आई नाराज होऊ शकते, म्हणून तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर…
जळगाव : प्रतिनिधी चार वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधातून १९ वर्षीय तरुणीच्या घरात शिरुन संशयित तरुणाने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीच्या चावीने तरुणीच्या पाठीवर मारुन तिला जखमी केले. तसेच तरुणी कोणासोबत बोलते हे तीने सांगितले नाही तर संशयिताने तरुणीच्या घरातच फाशी घेवून तरुणीला मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि. २ जून रोजी दुपारच्या सुमारास शहरातील एका परिससरात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती एका केक शॉपमध्ये काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करते. गेल्या काही वर्षांपासून ती तरुणी संशयित प्रसाद उर्फ प्रेम कमलाकर पाटील याला ओळखत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाघ नगर भागात १ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २० वर्षीय तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. यातील जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणावर सुरुवातीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर संबंधित तरुणाला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी हर्षल संतोष घुगे (वय २०, रा. समता नगर, जळगाव) याने तक्रार दिली. फिर्यादीतील माहितीनुसार, १ जून रोजी तो आणि त्याचे मित्र राहुल…

