धरणगाव : प्रतिनिधी येथील धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या नावाने म. धर्मादाय उपायुक्त जळगाव येथे मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काजी हा संस्थेचा सर्वसाधारण सभासद देखील नसताना त्याने संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करून बनावट व खोटे फेरफार अर्ज क्र. 102/2015 दाखल केले होते. म. धर्मादाय उपायुक्त जळगाव यांनी दि. 08/04/2026 रोजी सदर बनावट व खोटे फेरफार अर्ज नामंजूर केले आहे. धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी तर्फे तत्कालीन उपाध्यक्ष श्री. शफी अहमद भाईमिया काजी यांनी हरकत घेतली होती. यांच्या तर्फे ॲड. डी. ओ.पाटील यांनी बाजू मांडली. खोटे शिक्के बनवल्या प्रकरणी मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काजी व ईतर…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.१ मे २०२६ मेष राशी उत्पन्नाचे मोठे पर्याय उघडतील आणि नवीन संधी निर्माण होतील. आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचार आणि आपल्या बुद्धीवर अवलंबून रहा. आज वाईट संगत तुमच्या कामात अडथळा आणू शकते. तुमची नोकरीतील स्थिती मजबूत राहील, व्यावसायिक व्यवहार तेजीत राहतील आणि कौटुंबिक संबंध सुखकर राहतील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये सावधगिरी बाळगा. मनोबल उंचावण्यासाठी, भगवान शिवाचे ध्यान करून आपल्या दिवसाची सुरुवात करा. वृषभ राशी आज तुमच्या मेहनतीला आणि धैर्याला यश मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल. आज लोकांशी सहजतेने वागा. कामासाठी हा अनुकूल काळ आहे आणि व्यवसायही फायदेशीर…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. युवा हे मानव संसाधन विकासाचे मुख्य स्त्रोत मानले जातात. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. समाजातील युवांची संख्या पाहता त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास करून युवकांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात जोडण्यासाठी प्रतिवर्षी 1 मे रोजी जिल्हा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी केलेल्या जळगाव जिल्ह्यातील युवकांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने मागविण्यात आले होते. या प्रस्तावांची छाननी करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सन 2025-26…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले. शिंदे म्हणाले की, “लढायची वेळ आली की काहीजण स्वतः पुढे न येता इतरांना पुढे करतात,” असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार न देण्यामागे ‘अंतरआत्म्याचा आवाज’ असल्याचे सांगितल्यावर शिंदेंनी त्यावरही उपरोधिक टीका केली. “आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरआत्म्यातून आवाज येतो का? २०१९ ला तो आत्मा कुठे होता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, विधानपरिषदेच्या १० जागांसाठी केवळ १०च अर्ज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी आवश्यक असलेली शासकीय जमीन आता विनामूल्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात केंद्रीय विद्यालयांच्या उभारणीला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देत, शासकीय जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने आणि पूर्णतः महसूलमुक्त स्वरूपात केंद्रीय विद्यालय संघटनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी २ हेक्टर ५० गुंठे जमीन निश्चित करण्यात आली आहे.…
जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून ‘प्रहार’ संघटनेचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा राजकीय निर्णय घेण्यात आला. या प्रवेशासोबतच शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारीही जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाची अधिकृत सुरुवात झाली आहे. प्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेचा स्पष्ट उच्चार केला. “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ शेतकऱ्यांना अर्पण केली होती. त्याच विचाराने आम्ही आज शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू करत आहोत. शेतकरी आणि दिव्यांगांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी निश्चितीची लगबग पूर्ण झाली आहे. विविध पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर करताच निवडणुकीचा रंग अधिक चढला आहे. महायुतीकडून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपने सहा उमेदवारांची फळी जाहीर करत ताकद दाखवली आहे. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक) यांचा समावेश आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील जवाहर हौसिंग सोसायटीमधील आनंद नथ्थू भोई (वय ३४) या तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २९ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली. शहरात यंदा उन्हाळ्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नथ्थू भोई हे दररोज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी भाजी विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे आजही ते आपल्या दुकानावर भाजी विक्रीसाठी आले होते. मात्र, सकाळी १० वाजेनंतर अचानक त्यांना चक्कर आली अन् ते दुकानावर असतानाच कोसळले. ही बाब परिसरातील दुकानदारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत आनंद भोई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित…
एरंडोल : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यानजीक आज सकाळी भरधाव वेगातील एसटी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात बसमधील एकूण १८ जण जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याहून भुसावळकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस (एमएच-२०, बीएल-३४१२) आज सकाळच्या सुमारास भालगाव फाट्याजवळून जात असताना हा अपघात घडला. बस भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि बस थेट रस्त्यालगतच्या दुभाजकावर आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक आणि राज्य परिवहन महामंडळाचा एक कर्मचारी असे एकूण १८ जण प्रवास करत होते.…
जळगाव : प्रतिनिधी कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ९ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २८ एप्रिल रोजी समोर आली असून शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले संतोष श्यामलाल आटवाल (वय ४०, रा. गुरुनानक नगर) यांच्या मामेभावाचे लग्न मालेगाव येथे असल्याने आटवाल कुटुंब २६ एप्रिल रोजी घर बंद करून लग्नासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाला लावलेले कुलूप तोडून…

