Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेत विविध संवेदनशील प्रकरणांच्या तपासाबाबत पोलिसांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण, आयटी धर्मांतर प्रकरण, तसेच गोरेगाव ड्रग्ज आणि परतवाडा प्रकरणांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीस पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. या वेळी “कोणताही आरोपी असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे” असा ठाम संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “पीडितांना पूर्ण विश्वास द्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी तपासात कोणतीही कसूर ठेवू…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत असून उष्णतेचा प्रचंड कहर आणि अवकाळी पावसाचा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे झेपावत आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागांत अचानक पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. विदर्भात उष्णतेने विक्रमी पातळी गाठली असून अकोला येथे ४४.१ अंश, वर्धा ४४.४, नागपूर ४४, गडचिरोली ४४ आणि अमरावतीतही ४४ अंशांच्या आसपास तापमान नोंदवले गेले आहे. चंद्रपूरमध्ये ४३.६, यवतमाळ ४२.८, गोंदिया ४२.९ आणि भंडारा ४२ अंशांवर पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा धोका वाढला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मास्टर कॉलनी परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी, १६ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. शेख नयुम शेख मसुरोद्दीन असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार,  शेख नयुम हा तरुण हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या घरातील एका खोलीत झोपलेला होता. सकाळी ११:५५ वाजेच्या सुमारास तो बराच वेळ बाहेर न आल्याने, त्याचा भाऊ त्याला उठवण्यासाठी खोलीत गेला. यावेळी नयुमने छताला गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयांनी तातडीने नयुमला खाली उतरवून उपचारासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील बिबानगर परिसरात एका युवकाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत युवकाला समज देण्यास गेलेल्या मुलीच्या पालकांनाच त्याने जीवे मारण्याची धमकी दिली असून, १६ एप्रिल रोजी थेट युवतीच्या घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवक पीडित विद्यार्थीनी शाळेतून घरी जात असताना सतत तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. याच त्रासातून त्याने तिला आपल्या प्रेमात ओढले. काही दिवसांपूर्वी तो युवतीला दुचाकीवर बाहेर फिरायला घेऊन गेला, तिथे त्याने तिची छेड काढत बळजबरीने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मुंबईतील एका प्रौढ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून तब्बल ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात मुंबई सायबर क्राईम शाखेने मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम जाधव यांच्या पथकाने नशिराबाद येथे येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश काळे (वय २६, रा. तरसोद, जि. जळगाव) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार संकेत सोपान महाजन (वय २८, रा. मेहरुण, जळगाव) आणि यशवंत शालिक धांडे (वय २९, रा. मेहरुण, जळगाव) यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या राहत्या…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  तालुक्यातील खडके बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आदिवासी मजूर कुटुंबाला त्यांच्या लहान मुलांसह ऊसतोडणी आणि शेतीची कामे करण्यास भाग पाडले, तसेच डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी ठेकेदार आणि त्याच्या मुलावर एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार रंजीत पवार आणि त्याचा मुलगा राजेश पवार (दोन्ही रा. खडके बु, ता. एरंडोल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  नेपानगर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी गोरेलाल रामसिंग बारेला (३०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२५ पासून संशयितांनी बारेला कुटुंब आणि इतर मजुरांना कामासाठी आणले होते. या दरम्यान त्यांना खडके बुद्रुक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वरणगाव आणि दर्यापूर शिवार परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात श्याम विक्रम ठाकूर (वय ४५), शोभा विक्रम ठाकूर (वय ६०) आणि अवघ्या ५ वर्षीय शिवन्या श्याम ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन पूर्ण करून…

Read More

मुंबई :  वृत्तसंस्था अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत असून, या गुन्ह्याच्या मागील मानसिकता आणि कार्यपद्धती उघड झाली आहे. चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर आपण “प्लेबॉय” बनल्याचे सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार कोणत्याही मानसिक आजारातून नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीतून आणि विकृत विचारसरणीतून घडलेला आहे. तपासात असे उघड झाले आहे की, अयान अहमद सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रिय होता. त्याचे तब्बल १८ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तो…

Read More

जिल्ह्यात आजपर्यंत एकही “टँकर” र सुरु नाही – केवळ १४ विहिरी अधिग्रहित – नागरिकांना दिलासा जळगाव : प्रतिनिधी पाणीपुरवठा व वीज ही मुलभूत व अत्यावश्यक सेवा असून, उन्हाळ्याच्या काळात कोणत्याही परिस्थितीत पाणी व वीजपुरवठा खंडित होऊ नये. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना अखंडितपणे सेवा द्यावी,” असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील पाणीटंचाई व महावितरण कडील विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील एकरुखी शिवारात १५ एप्रिल रोजी दुपारी १च्या सुमारास महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या शार्ट सर्कीट मुळे सुमारे सहा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे व गट नंबर पुढील प्रमाणे १)भीमसिंग पन्ना जाधव यांच्या शेतात मका पिक होते क्षेत्र 0.89 आर गट. नं. ११६/३ब  २)हिम्मत पन्ना जाधव यांच्या शेतात बाजरी पिक होते क्षेत्र 0.89 आर गट नं. ११६/३ब ३)दिपक बळवंत जाधव यांच्या शेतात मका क्षेत्र १.७८ आर गट नं.११६/३ब ४)कादरका मेवाती यांच्या शेतात मका क्षेत्र १.२० आर गट नं.११७ ५) कदरखा मेवाती यांच्या शेतात मका क्षेत्र १.२०आर गट नं.११७  ६) शकीलखा मेवाती…

Read More