नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरासह महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींनी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले असून, सोशल मीडियावरदेखील शिवरायांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही पोस्टद्वारे छत्रपती शिवरायांच्या शौर्याला नमन केले आहे. पण, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी X वर पोस्ट करताना मोठी घोडचूक केली आहे. त्यामध्ये X (ट्विटर) वर अभिवादन करताना, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी चक्क श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील X वरुन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. मात्र, त्यांच्या पोस्टमध्ये मोठी घोडचूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीचा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव, चोपडा आणि जळगाव या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकर-भोकर पूल उभारणीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने २० कोटी निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. पुलाच्या पूर्णत्वानंतर परिसरातील नागरिकांना मोठी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील विकासाला वेग मिळणार आहे. १५० कोटींच्या पुलासाठी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर ८८४ मीटर लांब, १० मीटर रुंद आणि २७ मीटर उंच असलेल्या या पुलाच्या उभारणीसाठी १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम…
चाळीसगाव : प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी 1275 कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून दिनांक १४ फेब्रुवारी रोजी तांदुळवाडी येथे झालेल्या वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आमदार चव्हाण यांनी संपूर्ण प्रकल्प १०० टक्के कार्यान्वित होण्यासाठी वरखेडे धरणाला १२७५ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता येत्या आठवड्यात देण्याचा शब्द जलसंपदामंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी आपल्याला दिला असल्याची माहिती दिली होती आणि अवघ्या चारच दिवसात या कामाला कॅबिनेट ची मान्यता मिळाल्याने नामदार गिरीषभाऊ महाजन यांनी…
जळगाव : प्रतिनिधी ओव्हर ब्रिजवरुन जात असलेल्या मयूर विलास पाटील (वय २०, रा. दोनगाव, ता. धरणगाव) यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ८ रोजी खोटेनगरजवळील ओव्हर ब्रिजवर घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील दोनगावात मयूर विलास पाटील हा तरुण वास्तवयास आहे. दि. ८ रोजी तो (एमएच १९, ईएम ५२२२) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव शहराकडे येत होता. यावेळी खोटेनगरजवळील ओव्हर ब्रिजवर जैन मंदिारसमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीडबल्यू २२६२) क्रमांकाच्या मालवाहून रिक्षाने जोरदार धडक दिली. या…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोठली येथील भूमिपुत्र व सीआरपीएफच्या १३७बटालियनचे जवान प्रवीण अभिमन्यू पाटील यांना उधमपूर येथे देशसेवा बजावताना वीर मरण आल्याची माहिती १८ फेब्रुवारीलला दुपारी ३ वाजता हाती आली आहे. कोठली येथील भूमिपूत्र व सीआरपीएफच्या १३७बटालियनचा जवान प्रवीण पाटील हा उधमपूर येथे कार्यरत असताना गोळी लागल्याने त्यांना विरमरण आले आहे. सुमारे १२ वर्षांपासून ते देशसेवेत कार्यरत होते. गत आठवड्यात कोठली येथे आई, वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच नातेवाईक व मित्र परिवाराला भेटून ते कर्तव्यावर परतले होते. त्यातच अशी अचानक दुःखद वार्ता गावात आल्याने सर्वत्र शोकाकळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ, वहिनी असा…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक शासकीय विभागात लाच खोरीचे प्रमाण वाढले असतांना आता नगरभूमापन अधिकारी कार्यालयाशी संबंधित एका खासगी व्यक्तीला लाच घेताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी ४ वाजता रंगेहाथ पकडले. पंटरने प्लॉटवरील वारस नोंदणी व इतर कामांसाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस नोंदणी, हक्कसोड प्रक्रिया आणि कर्जाच्या नोंदीसाठी संबंधित नगरभूमापन अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याकडून काम करून देण्याच्या मोबदल्यात संशयित आरोपी अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९, रा. नगरभूमापन अधिकारी कार्यालय) यांनी लाचेची मागणी केली होती.…
चाळीसगाव : प्रतिनिधी धुळेरोडवरील विराम लॉन्समध्ये १० लाख ४१ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवीची चोरी झाल्याची घटना १७ रोजी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात १४ वर्षीय मुलाने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून त्या दिशेने तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनिल निंबा पाटील यांच्या मुलीचा विवाह १७ रोजी दुपारी विराम लॉन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. ९ वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची कापडी पिशवी नवरदेवाची आई अंजली पाटील यांच्याकडे होती. जेवण करताना दागिन्यांची कापडी पिशवी खुर्चीखाली ठेवली. जेवण करीत असताना चोरट्याने संधीचा फायदा घेऊन दागिन्यांची पिशवी लंपास केली. १४ वर्षीय मुलगा ही चोरी…
जळगाव : प्रतिनिधी महिनाभराची सुट्टी घेऊन आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आईला मिसळ आणण्यास सांगितले. आई मुलासाठी मिसळ घेऊन आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच समोर गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचा मृतदेह दिसला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ८:३० वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडली. दीपक अशोक निकम (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, आई मिसळ घ्यायला गेल्यानंतर घरी कोणीही नव्हते. तेव्हा मधल्या घरात जाऊन दीपकने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर आई मिसळ घेऊन घरी परतली असता दरवाजा लावलेला दिसला. दरवाजा उघडताच समोर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. आईने हंबरडा फोडल्यानंतर शेजारी व दीपकचे नातेवाईक घरात…
मेष राशी आज तुम्ही खोट्या खटल्यातून निर्दोष मुक्त व्हाल. तुम्हाला आजी-आजोबांकडून पैसे आणि भेटवस्तू मिळतील. आजचा दिवस बहुतांशी आनंदी आणि लाभदायक असेल. कठोर परिश्रम केल्यास अनुकूल परिणाम मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत कराल. चांगल्या मित्रांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे उशिरा मिळतील. जमीन खरेदीत लाभ होईल. ग्रह बांधणी आणि मंगल उत्सवावर अधिक खर्च होईल. काही वादही संभवतात. लाभाचा नवा मार्ग मोकळा होईल. वाईट संगतीपासून दूर राहा. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मिथुन राशी आज एखादा मित्र राजकारणात खास सहयोगी सिद्ध होईल. ज्यामुळे तुम्ही खूप भावूक होऊ शकता. प्रेमसंबंधात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अनेक मंत्री आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी नवीन वॉर रूम सुरू केली, असे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी तर मंत्रालयात अंडरवर्ल्ड सुरू आहे. राजकीय अराजकता निर्माण झाली, असा आरोप केला. या सर्व विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये कोणतेही कोल्ड वॉर सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर सुरू असल्याची टीका विरोधकांवर केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वॉर रूमबाबत विचारले असता, राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा…

