मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच खून प्रकरण चर्चेत असतांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे त्या म्हणाल्यात. आता राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः मंत्रीच घेणार का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हाणला. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक व्यक्ती एकदा तरी महामार्गावरून प्रवास करीत असतो आता त्याच लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून फास्टॅगशी संबंधित नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने फास्टॅगसंदर्भात आजपासून (17 फेब्रुवारी) नवीन नियम लागू केले आहेत. अनेकदा वाहनचालक फास्टॅग खात्यामध्ये पैसे नसतानाही टोल नाका पार करतात. मात्र, आता असे केल्यास चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. समजा, फास्टॅग ब्लॅकलिस्ट अथवा बंद असेल तर टोल नाका पार करण्याच्या 60 मिनिटं आधी रिचार्ज करावे लागेल. चालक टोल पार केल्यानंतरही 10 मिनिटात रिचार्ज करू शकतात. मात्र, या 70 मिनिटांच्या कालावधीत रिचार्ज न केल्यास चालकांकडून दुप्पट टोल घेतला जाईल. टोल…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ‘छावा’ चित्रपट मोठ्या अडचणीत आला होता त्यानंतर हा चित्रपट अनेक चित्रपटगृहात सुरु झाल्यानंतर सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने एकूण ₹ ११६.५ कोटींची कमाई केली आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘छावा’ हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट आहे ज्याला इतका अद्भुत प्रतिसाद मिळाला आहे. ‘सकनिल्क’चा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतातून ४८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, एकूण भारतीय निव्वळ संग्रह ११६.५…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजधानी असलेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये आज दि.१७ सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे अडीच तासांनंतर बिहारमध्येही बिहारमध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर एकच घबराट पसरली. लोक घराबाहेर पडले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बिहारच्या सिवान जिल्ह्यात होते. आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ५.३६ वाजता भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसाररिश्टर स्केलवर याची तीव्रता ४.० इतकी होती. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना संयम राखावा, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांपासून सावध राहावे, असे…
जळगाव : प्रतिनिधी वर्षभरापूर्वी मुंबईहून परतणारा प्रशांत प्रताप चौधरी (वय ३०, रा. जानकीनगर) हा तरुण येत असतांना तो रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला होता. वर्षभरापासून त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी सकाळच्या सुमारास अखेर त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जानकी नगरात सामान्य कुटूंबातील प्रशांत प्रताप चौधरी (वय २८) हा तरुण मिळेल ते, खासगी कामे करुन कुटूंबाला हातभार लावत होता. वर्षभरापुर्वी प्रशांत कामासाठी मुंबई गेला होता. तेथे कामधंदा करुन कुटूंबाला अधार ठरला होता. मुंबईहून जळगावी येत असतांना धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाला. वडीलांसह लहान भावाने शक्य ते उपचार…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव दुचाकीने समोरील दुचाकीला धडक दिल्यामुळे मच्छिंद्र देवजी महाजन (३६, रा. विखरण, ता. एरंडोल) हे जखमी झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या दुचाकीवरील तिघांनी जखमीला शिवीगाळ करीत मारहाणही केली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी डी-मार्ट समोर घडली. या प्रकरणी १५ फेब्रुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मच्छिंद्र महाजन हे दुचाकीने (एमएच १९ डीएल ८३९६) डी-मार्ट समोरून जात असताना त्याच्या पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच १९, एएक्स ६३४२) धडक दिली. यात महाजन हे खाली पडले व पायाला दुखापत झाली. याचा जाब विचारला असता धडक देणाऱ्या दुचाकीवरील तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण…
चोपडा : प्रतिनिधी आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण करून जमावाने हवेत गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. मारहाणीत पोलिस अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. ही थरारक घटना पार उमर्टी ता. वरला येथे शनिवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाशी झालेल्या झटापटीत सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हेकॉ. शशिकांत पारधी, किरण पारधी आणि होमगार्ड विश्वास भिल्ल हे जखमी झाले आहेत. यापैकी शशिकांत पारधी यांचे जमावाने अपहरण केले होते. त्यांची नंतर सटका करण्यात आली. रात्री उशिरा पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला (३०), राजेंद्रसिंग • प्रीतमसिंग…
मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आज समर्पित वृत्तीने काम केल्यास तुमच्या उत्पन्नात वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार सुधारतील. कोणतीही योजना आखण्यात घाई करू नका.नकारात्मकता वर्चस्व गाजवू शकते. भावनेच्या भरात घेतलेली निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. नवीन काम सुरू करण्यास वेळ चांगला आहे. जोडीदाराचा सल्ला तुमचे आत्मबल टिकवून ठेवेल. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, तुमचे पूर्ण लक्ष आर्थिक बाबींवर सक्षम करण्यावर असेल. घराच्या नुतनीकरणाच्या विचारात असाल तर वास्तुचे नियमांचे पालन करणे हितकारक ठरेल. पैसे उधार देताना काळजी घ्या. कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करा.जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी आज तुमच्या सुप्त प्रतिभेला चालना मिळेल. विश्रांतीलाही प्राधान्य द्याल. नकारात्मक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असतांना या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यानं अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडला अटक केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले, एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील नाव आले तर आपण कारवाई करणार आहोत. माझ्यावर सिंचनाच्या आरोप झाले, तेव्हा मी राजीनामा दिला होता. कारण माझ्या बुद्धीला ते…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून ठाकरे गटाला गळती लागली असतांना नुकतेच दोन ते तीन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आज भास्कर जाधव यांनी यावर मौन सोडले आहे. तर विरोधकांना प्रतिउत्तर देखील दिले आहे. पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव म्हणाले कि, कुठलेही पद मिळवण्यासाठी मी कधी काम केले नाही. गेले 43 वर्ष मी राजकारणात आहे, मी एवढी पदे उपभोगली आहेत, मी त्याकाळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही, आता का करेल? बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले.…

