जळगाव : प्रतिनिधी दोन दिवसापूर्वी मुंबईत फार मोठ्या राजकीय घडामोडी म्हणता येतील अशा प्रशासकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची गोपनीय पद्धतीने कुणाच्याही कानाला खबर न लागता बदली झाली आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींना धक्काच बसला. ज्या लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीचा बैठकीत निषेधाचा ठराव केला होता ते देखील चांगलेच तोंडघशी पडले. परंतु या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकनाथ खडसे यांचे राज्य आले की काय ते सांगतील ते अधिकारी ते सांगतील तो निर्णय अशा पद्धतीने यामागे राजकारण आहे का असा प्रश्न जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पडला आहे आणि तशी चर्चा देखील रगली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील जादा दराने…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयात लाच मागण्याच्या अनेक घटना घडत असतांना आता नुकतेच धरणगाव पंचायत समितीतील येथील एका अधिकाऱ्याने वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना सहाय्यक कार्यक्रम अधिकार्याला जळगाव एसीबीने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. हा सापळा शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला. प्रवीण चौधरी असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रवीण चौधरी यांनी दिड हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता कार्यालयात प्रवीण चौधरीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे. राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नावर लेखी उत्तर देताना दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले आहे. यानुसार…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात खुनाच्या घटना घडत असतांना आता जळगाव तालुक्यात देखील एका उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं आहे. युवराज सोपान कोळी असे मयत उपसरपंचाचे नाव आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण असून कोळी यांच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून…
सोलापूर : वृत्तसंस्था सोलापुरातील पोलिस ठाण्यातच नाइंट्या नावाच्या दारुड्याने पोलिस निरीक्षकाच्या छातीवर बुक्की मारून थुंकल्याची घटना घडली. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने नाइंट्या ऊर्फ ओंकार संतोष नलावडे (रा. सुंदराबाई डागा प्रशालेच्या जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास प्रजा मटण स्टॉलच्या बाजूला, रामलाल चौक (सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी पोलिस अंमलदार दिनेश घंटे यांनी फिर्याद दिली आहे. नाइंट्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी व जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांपूर्वी तडीपार केले होते. १९ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास रामलाल चौक येथे आरोपी व इतर तीन व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी…
सातारा : वृत्तसंस्था राज्याचे ग्राम विकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सातारा शहरातील महिलेला खंडणी प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे .शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली एक कोटी रुपये खंडणी घेत असताना तिला पकडण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील एका महिलेला मानसिक त्रास दिल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार व शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले होते या प्रकरणी त्याचे वृत्तांत करणारे एका पत्रकाराला सुद्धा अटक झाली होती .सदर महिलेने जयकुमार…
जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा हुडको भागात मंगळवारी रात्री १० वाजता किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी घटना झाली. या हाणामारीत लाकडे, दगड, विटा आणि कोयत्याचा वापर करून एकमेकांना जखमी करण्यात आले. या संदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको भागातील दोन गटांमध्ये मंगळवारी रात्री १० वाजता किरकोळ वाद झाला. पहिल्या गटातील पूजा शशिकांत सावळे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राहुल निकम, अनिता निकम, सोनाबाई रणशिंगे, ज्योती निकाळजे, गणेश निकाळजे, निखिल निकाळजे, विशाल निकाळजे, मुकेश निकाळजे आणि हिराबाई निकाळजे या नऊ जणांविरूद्ध तर दुसऱ्या गटातील निखिल गणेश निकाळजे (वय १९)…
जळगाव : प्रतिनिधी शहरात नवीन रुग्णालयाचे काम सुरू करायचे असून, त्यात तुम्हाला पार्टनर बनवितो, असे आमिष दाखवीत जळगाव शहरातील एकाने हॉटेल व्यावसायिकाची तब्बल २० लाख ७३ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शोएब अब्दुल (वय ३०, रा. सदगुरू अपार्टमेंट, शाहूनगर) हे जळगाव शहरात हॉटेलचा व्यवसाय करतात. १५ जून ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान मोहसीन गुलाब पिंजारी (रा. संगम बेकरीजवळ) यांनी मोहम्मद शोएब अब्दुल यांना जळगाव शहरात एक रुग्णालय सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी काही रक्कम लागणार असल्याचे पिंजारी याने मोहम्मद अब्दुल यांना सांगितले.…
रावेर : प्रतिनिधी शहरातील एका व्यापाऱ्याकडून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत करण्याची धमकी देऊन १ लाखाची खंडणी घेताना रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडलेल्या महिलेच्या मायाजालात रिक्षावाला, बॅटरीवाला, डॉक्टर, पीडीत व्यापाऱ्याचा आप्तेष्ट व जिल्ह्यातील काही वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस व वनरक्षकांसह तब्बल ५० ते ६० जण अजून बळी पडले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी तथा या महिलेचा मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील (वय २१, रा लोणी, ता. चोपडा) यास रावेर पोलिसांनी अटक करून या महिलेसह रावेर न्यायालयात हजर केले असता दोघांना सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात विवाहबद्ध झाल्यानंतर सुखी संसारवेलीवर एक मुलगा व एक मुलगी अशी…
पाचोरा : प्रतिनिधी तब्बल १७ वर्षाच्या सहजीवनानंतर मातृत्वाच्या सरी बरसल्या. जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची आनंदवार्ता समजल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघालं… परंतु नियतीच्या मनात काही वेगळचं होतं… काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं… डोळेही न उघडलेल्या चिमुकल्यांना आईच्या ममत्वापासून पोरकं व्हावं लागलं… जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासांतच आईने जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३८) असे या दुर्दैवी आईचे नाव. उत्राण येथील सासर असलेल्या ज्योती चौधरी या परिवारासह पाचोरा येथे वास्तव्यास होत्या. बाहेरपुरा भागातील माहेर असलेल्या ज्योती यांना लग्नाच्या १७ वर्षानंतर मातृत्वाची चाहूल लागली आणि पती, आई, वडील, भाऊ यांच्यासह नातेवाइकांना आनंद झाला. बुधवारी वेदना होऊ…

