नवी दिल्ली : वृत्तसंस्था गरबा आणि परंपरिक खळांची धूममध्ये देशभरात नवरात्रीचा उत्साहात साजरा झाला. गरबा खेळताना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची दुर्घटनाही यंदा चर्चेत ठरली. आता, हरयाणातील फरिदाबाद येथे गरबा नृत्य खेळताना घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरीदाबाद सेक्टर ८६ येथील बीपीटीपी प्रिंसेज पार्क सोसायटीमध्ये सोमवारी रात्री गरबा खेळताना तीन तरुण अचानक तरुणीसोबत नृत्य करु लागले. यावेळी, विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. बीपीटीपी सोसायटी निवासी प्रेम मेहता (५३) हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत. प्रेम मेहता यांची कन्या कनिकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, दांडिया नाइटमध्ये लक्की व अन्य युवक तिच्यासोबत डान्स करण्यासाठी सरसावले…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात शेतीच्या वादातून असो वा रस्त्याच्या वादातून असो छोटे मोठे भांडण सुरु असतांना पण सध्या राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बयाना गावात रस्त्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. आरोपीने ट्रॅक्टरचे चाक तरुणाच्या अंगावर 8 वेळा घातले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर गटामध्ये रस्त्याच्या संदर्भात बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. हाणामारीत दोन्ही बाजूंच्या महिलांचाही सहभाग होता. लढत असताना…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील फेकरी टाक्यानजीक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक व कंटेनरची समोरा-समोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच ठार झाला तर कंटेनरमधील दोघे गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराकडे येत असलेला भरधाव ट्रक (जी.जे.12 बी.एच.5252) व भुसावळकडून नागपूरकडे निघालेला कंटेनर (डब्ल्यू.बी. 11 ई.5686) यांच्यात समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की दोन्ही वाहनांच्या समोरून भाग पूर्णपणे चेपला जावून वाहनांचे मोठे नुकसान झाले तर एका वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला तर दुसर्या वाहनावरील चालकासह क्लीनरल जखमी झाला. स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढण्यात मदत केली…
नाशिक : वृत्तसंस्था ऑनलाइन काम शोधणे दोन महिलांना चांगलेच महागात पडले आहे. टास्क पूर्ण करण्याच्या नादात या गृहिणी असलेल्या महिलांना तब्बल साडेपाच लाख रुपये गमवावे लागले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक – आडगाव शिवारात राहणारी महिला गेल्या सप्टेंबर महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असताना तिच्याशी ९०२६३११९८७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून व वेगवेगळ्या टेलिग्राम सोशल साइटवरून संपर्क साधण्यात आला होता. घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळे टास्क देण्यात आले. यापोटी तिला अवघ्या चार ते पाच दिवसांत टेलिग्राम आयडी, तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँक खात्यात ३ लाख १५ हजारांची रक्कम…
मनमाड : वृत्तसंस्था रेल्वेने जळगाव ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी संशयावरून पकडल्यानंतर त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे लाखोंचे घबाड सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोठी रक्कम असल्याने सदर संशयितास पुढील कारवाईसाठी आयकर विभागाकडे देण्यात आल्याची माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीपकुमार देसवाल यांनी दिली. हावडा – मुंबई मेल व्हाया नागपूर या गाडीने रेल्वे सुरक्षा बलाचे गस्तीपथक कर्तव्य बजावत असताना मनमाडजवळ त्यांनी एका व्यक्तीला संशयास्पद सामानासह पकडले. चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत काहीही माहिती उघड केली नाही. शिवाय जवळील रोकड आणि सामानाबाबत काहीही…
जळगाव : प्रतिनिधी घरी बोलवत मला सर्व मिटवायचे आहे, तू घरी ये असे सांगून जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवाहितेला घरी बोलवून तिचा विनयभंग करण्यात आला. विनयभंग करण्याऱ्या डिगंबर ऊर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा. निवृत्तीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेशी डिगंबर चौधरी याने २३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. मला सर्व मिटवायचे असून, तू घरी ये असे सांगून दुपारच्या वेळेस घरी बोलविले. ही महिला त्याच्या घरी गेली असता काही समजण्यापूर्वीच त्याने महिलेच्या तोंडावर मारले व तिचा विनयभंग केला. तू मला हवी आहेस असा तो ओरडू लागल्याने चौधरी याची…
भुसावळ : प्रतिनिधी गेल्या काही महिन्याआधी भुसावळात एकाच दिवसात तीन खून झाल्याची घटना ताजी असतांना आज दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण करीत खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर भुसावळात एकच खळबळ उडाली होती. गेल्या आठ दिवसापासून पोलीस प्रशासन नवरात्रोसत्वाच्या बंदोबस्ताला होती तर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ दि.२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्यांनी प्राणघातक हल्ला केल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच बंदोबस्तावर असतांना रात्री झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी त्या तरुणाला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील सोनवद शिवारातील झुरखेडा ते सोनवद रोडवरिल विरफाट्याच्या पुढे पद्माकर नारायण पाटील याचे शेताजवळील रोडवरील निंबाच्या झाडाजवळ संदिप झेडु भोई (वय ३६) हे दि.२३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमरास जळगाव येथे कपडे घेण्यासाठी गेलो होतो जळगाव येथून दुपारी ३ वाजता सोनवद येथे घरी येत असताना त्यांना झाडाखाली खाली एक अनोळखी पुरुष वय 38 वर्ष. अंदाजे नाव गाव माहीत नाही हा पडलेला होता…
अलिबाग : वृत्तसंस्था राज्यभरातील अनेक परिवारात वाद सुरु असतात पण हेच वाद काही वेळाने थांबत असतात तर काही वाद अखेरच्या टोकाला देखील जात असता अशीच एक धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भावाने अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी सूप मध्ये दोन सख्या बहिणींना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केली असल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे गावात १६ ऑक्टोबर रोजी जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (३४) व स्नेहल मोहिते (३०) या दोन बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान सोनालीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर दुसरी बहिण स्नेहल हीचा…
जळगाव : प्रतिनिधी तणावातून घरात एकट्या राहणाऱ्या संतोष वामन भावसार (वय ४२) या प्रौढाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास रेणुका नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रेणुका नगरात संतोष भावसार हे एकटेच वास्तव्यास असून ते प्लल्बिंगचे काम करुन ते आपला स्वतःचा उदनिर्वाह करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सोमवारी दिवसभर संतोष भावसार हे घराबाहेर दिसून न आल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी संतोष भावसार यांच्या घरात जावून पाहिले असता, त्यांना संतोष हे गळफास…

