नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणूक सुरु असतांना गेल्या काही दिवसांपासून बेपत्ताअसलेले आसामधील माजी पंचायत सदस्य आणि भाजप नेते अब्दुल सत्तार यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी परिसरातून पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक राजकारणी अब्दुल सत्तार २३ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती. सत्तार यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे शंका आहे. करीमगंज जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पार्थ प्रतिमा दास यांनीही हत्येचा संशय व्यक्त केलाय. तसेच सत्तार यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. अब्दुल सत्तारच्या हत्येत स्थानिक काँग्रेस नेता सुरमन अली आणि…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेसह तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि. २७ रोजी पहाटे चार वाजता संशयित इम्रान शहा याने अनधिकृतपणे महिलेच्या घरात प्रवेश करीत तिला व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. फिर्यादीच्या पतीने सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यास हातावर चावा घेत शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यतील अनेक ग्रामीण भागात सध्या निवडणुकीचे वेध लागले आहे तर धरणगाव शहर परिसरात असलेल्या डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायतीमध्ये देखील निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. २ मध्ये चांगलीच रस्सीखेच असतांना येथील चंदन दिलीपराव पाटील यांना उमेदवार मोहित प्रकाश पवार यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणुकीचे आता चित्र बदलू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहर परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून माघारीच्या दिवशी वेळ संपल्याने प्रभाग क्र. २ मधील उमेदवार मोहित प्रकाश यांनी चंदन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पाठींबा दिला. यावेळी भीमराज पाटील,अॅड.शरद माळी, भूपेंद्र…
मुंबई : वृत्तसंस्था जगभरातील अनेक मुल मुली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. अशाच सोशल मिडीयावर अवघ्या दोन आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर सुहाना नावाच्या मुलीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट मिळाली. ती पॉलिसी विकणाऱ्या कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरने एक्सेप्ट केली. त्यानंतर ती भेटायलाही आली आणि बोलण्यात गुंतवत त्याचा मोबाईल घेऊन पसार झाली. हा प्रकार मालाड पश्चिम परिसरात घडला असून बांगुर नगर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार अब्दुल ( नावात बदल) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो २५ ऑक्टोबर रोजी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला सुहाना या नावाचा आयडीवरून मालाड पश्चिम च्या इन्फिनिटी मॉलमध्ये भेटण्यासाठी मेसेज आला होता. त्याच्या दोन आठवड्यापूर्वी याच आयडीवरून आलेली रिक्वेस्ट…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक घटना सोशल मिडीयावर जलद गतीने व्हायरल होत असतात. असाच एक अनुभव नुकताच आला ज्यामुळे पोलिसांची नुसती धावपळ उडाली. असं काय होतं त्या ट्विटमध्ये ? जयपूर बांद्रा एक्सप्रेस मध्ये 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेषात असल्याचे ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली. एका इसमाने रेल्वे हेल्पलाइन वर ट्विट हे केलं होते. ही ट्रेन लवकरच पालघर स्टेशनवर पोहोचणार होती, हे कळताच पालघर रेल्वे स्टेशनला अक्षरश: छावणीचं स्वरूप आलं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वे हेल्पलाइनला टॅग करत एक फोटो पोस्ट केला होता. जयपूर बांद्रा एक्सप्रेसमध्ये…
मुंबई : वृत्तसंस्था सध्या राज्यभरात अनेक चोरीच्या घटना घडत असतांना आता या चोरीपासून अभिनेते सुद्धा दूर जावू शकले नाही. मराठी चित्रपटसृष्टील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री याला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेने १० लाखो रुपयांहून अधिक किमतीचे दागिने चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या घरातील लाखभर रुपयाची रोख रक्कम आणि फॉरेन करन्सी देखील (परदेशी चलन) चोरीला गेली आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर पुष्कर श्रोत्री याने पोलिसांत धाव घेत उषा घांगुर्डे आणि भानुदास घांगुर्डे या दोघांविरोधात फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पण पुष्कर श्रोत्री यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली…
जळगाव : प्रतिनिधी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त केला आहे. अकोला ते भुसावळ दरम्यान ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या शौचालयात दोन बेवारस गोण्या आढळून आल्या होत्या. त्याची तपासणी केली असता त्यात २ लाख ६२ हजारांचा गांजा आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी दि.२७ रोजी आचेगाव रेल्वेस्थानकादरम्यान करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे शुक्रवारी (त. २७) श्र्वानपथकासह गांधीधाम एक्स्प्रेस (२०८०३) मध्ये ड्यूटीवर असताना आचेगाव स्थानकावरून गाडी सुटताच श्र्वानाला (वीरू) उग्र वासामुळे कोच क्रमांक एस ९ च्या पुढच्या बाजूला वॉशरूममध्ये दोन बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आल्या. ही माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी केंद्रातील औषधाचे दुकान फोडून त्यातील रोकड आणि इतर साहित्य चोरून नेले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चिंतामणी मोरया परिसरात श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री केंद्रातील श्री स्वामी समर्थ मुद्रण आणि आयुर्वेदिक औषधीचे दुकान फोडून रोकड आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे अडीच हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी केंद्रातील दानपेटी ही लांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही दानपेटी फोडण्यात अपयश आल्यामुळे चोरट्यांनी दानपेटी तेथेच सोडून पळ काढला. सकाळी नेहमी प्रमाणे भाविक केंद्रात आल्यावर चोरीचा प्रकार…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका २३ वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन तरुणीला खोटे नाव सांगून ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी तरुणी एका नामांकीत महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. सध्या ती एका महाविद्यालयात अभियांत्रिकीची शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीमध्ये असतानाच तिच्याशी अप्पू याने खोटे नाव सांगून ओळख निर्माण केली. त्यांच्यात संवाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. नंतर ते…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बिलखेडा या गावाची रचना झाली तेव्हा पासून या गावात मूलभूत सुविधांसह रस्ते नव्हते. आज या गावात जि प सदस्य प्रताप पाटील यांनी महिनाभर आपली दिलेले आश्वासन पाळत गावातील रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. महिनाभरापूर्वी जि प सदस्य प्रतापराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधान सभा मतदार संघात प्रत्येक गणांत बैठका घेऊन गावातील समस्या जाणून घेत आहे. यादरम्यान धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावात गण बैठक मध्ये त्यांना या गावातील विकास कामाबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. यात काही विकासाच्या समस्या होत्या त्या जाणून विविध किकास कामे सुचवण्यात आले होते. गण बैठकीत दिलेले आश्वासन महिन्याभरातच हे पूर्ण करण्याचे काम…

