Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था नेहमीच प्रेमीयुगुलांचा वावर अनेक हॉटेलसह लॉज परिसरात मोठ्या संख्यने असतो. असेच एक प्रेमीयुगुल देखील पुणे शहरातील वाघोली परिसरातील लॉजवर गेले असता त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील चंदननगरातील रहिवासी २० वर्षीय तरुणी कोमल सुनील बर्के व सचिन गोकुळ शिंदे (वय-२१) हे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाघोली परिसरातील एका लॉजवर गेले होते. तिथे गेल्यानंतर दोघांनी एक रुम बुक केली. आम्ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत लॉजमध्ये थांबणार त्यानंतर चेक आऊट करणार…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील शेरी लोंद्री रस्त्यावरील वळण रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भजनी मंडळाच्या कारला भीषण अपघात झाला यात एक जागीच ठार झाले तर अन्य दोन जण जखमी असून, एक गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपळगाव गिरणा थडी येथील भजनी मंडळ कारने (एमएच १९, सीवाय ४५०८) भजनासाठी कासली (ता. जामनेर) येथे लोंद्री मार्गाने जात असताना शेरी-लोंद्री रस्त्यावरील योगेश पाटील यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार झाडावर आदळली. कारमध्ये एकूण पाच जण बसलेले होते. यातील दिलीप रमेश पाटील जागीच ठार झाले तर हेमंत सुभाष पाटील (३२) हे गंभीर जखमी असून, सतीश साहेबराव पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील ३४ वर्षीय तरुण रस्त्याने जात असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला अन् रस्त्यावर कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अयोध्या नगरातील विशाल विठ्ठल वाणी (वय ३४) हा तरुण सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान दुपारी रस्त्याने जात असताना अचानक अजिंठा चौफुलीनजीक आयोध्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला व तो खाली कोसळला. त्या वेळी एका जणाने तरुणाच्या खिशातील पाकीटामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्या वेळी तरुणाचे नातेवाईक व एमआयडीसी पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाण्याच्या मार्गावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना तीन जणांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तीन जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाण्याच्या मार्गावर पोहेकॉ उमेश पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्तव्यावर होते. त्या वेळी तेथे तीन जणांनी त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच जमावबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन केले. या प्रकरणी पोहेकॉ उमेश पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतीनिधी जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरातील एकाला मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असतांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन यशवंत नामदेव पाटील (४७) फिरत असल्याची माहिती २९ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोहेकॉ उमेश भांडारकर पोकों तेजस मराठे, योगेश इंधाटे, अमोल ठाकूर हे तेथे पोहचले असता. त्या ठिकाणी यशवंत पाटील हा मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन जिवंत काडतूस देखील सापडले. कट्टा व…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली असून यात महिला अत्याचार, खंडणी तसेच लुटमारीच्या घटना सर्वाधिक घडत आहे. अशातच रिक्षातून कॉलेजला निघालेल्या एका तरुणीचा दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र, आरोपीने पोलिसांवर हल्ला चढवला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये आरोपीचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझीयाबाद शहरात ही घटना घडली. कीर्ती सिंग असं मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे. तर जितेंद्र उर्फ ​​जीतू असं एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात रेल्वेच्या धडकेत नियमित अनेकांचा मृत्यू होत असतांना एक धक्कादायक अपघात समोर आला आहे. एक परिवार रेल्वेचे फाटक ओलांडत असतांना बापाच्या समोर आई व दोन मुली चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंकरखेडा विभागातील कासमपूर रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. दिल्लीहून सहारनपूरकडे वंदे भारत एक्स्प्रेस जात होती. कासमपूर फाटकावर नरेश हा आपल्या कुटुंबासह रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना धडक लागली. यात महिलेसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मोना असं मृत महिलेचे नाव आहे. तर चारू आणि इशिका अशी मुलींची नावे आहेत.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच वाशीलगतच्या कोपरी गावात राहणाऱ्या एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रूपचाँद रहेमान शेख (वय २१) असे आरोपीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी गावातील गावदेवी मंदिराच्या जवळच्या सागर भोईर इमारतीमध्ये महिलेचे नाव सलमा ऊर्फ जहानारा खातून रहेमान शेख (वय ४३) असे असून ती मुलगा रूपचाँद शेख याच्यासोबत राहत होती. कोपरी गावातच दुसऱ्या इमारतीत सलमाची विवाहित मुलगी जास्मीन राहण्यास आहे. सलमा ही घरकाम करून कुटुंब चालवत होती. मात्र तिचा मुलगा रूपचाँद हा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणबाबत उपोषण सुरु असतांना आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार सरकार तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे. सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील थोड्याच वेळात पत्रकार परिषद…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका ठिकाणी लोकवर्गणीतून लावण्यात आलेले सीसीटीव्ही मध्यरात्री अनोळखी इसमाने चोरून नेल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशनच्या गेटसमोर लोकवर्गणीतून लोकहितासाठी तब्बल १६ हजारांचे सीसीटीव्ही बसविलेले होते. दि.२८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने हे चोरून नेत १६ हजारांचे नुकसान केल्या प्रकरणी पोकॉ.निलेश मोरे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोहेकॉ.घनश्याम पवार हे करीत आहेत.

Read More