जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून नजीक असलेल्या कुसुंबा या गावी शुल्लक कारणावरुन भाऊ आणि बहिण अशा दोघांवर चॉपरचा वापर करुन प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. कुसुंबा गावातील गणपती नगरात राहणारे करण चंद्रशेखर पाटील आणि चेतन वसंत माळी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसुंबा गावी असलेल्या हॉटेल शिवशाहीच्या मागे अजय सुरेश सोनवणे यांच्या राहत्या घरासमोर करण आणि चेतन हे दोघे विनाकारण आरडाओरड करत होते. त्यावेळी अजय सोनवणे यांनी त्यांना आरडाओरड करु नका असे म्हटले. अजयच्या बोलण्याचा राग आल्याने करण आणि चेतन…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काही महामार्गावर अपघाताची संख्या वाढत चालली असून नुकतेच वर्ष अखेरीच्या दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेशात एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. या प्रवाशांना रुग्णालयात नेताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळाजाचा थरकार उडवणारा हा भीषण अपघात आहे. 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या लोकांनी बचावकार्यात मदत केली. घटनास्थळी पोलीस असून फायर ब्रिगेडकडून जोरात बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील गुना येथे हा भीषण अपघात झाला. गुनाचे…
जळगाव : प्रतिनिधी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेलेल्या प्रशांत प्रभाकर गोपनारायण (वय ३५, रा. श्रीरत्न कॉलनी) या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना असोदा रेल्वेगेटजवळ मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीरत्न कॉलनीमध्ये प्रशांत प्रभाकर गोपनारायण हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. काही वेळानंतर ते ईश्वर कॉलनीत राहणाऱ्या त्यांच्या मावसभावाकडे गेले, परंतू ते घरी मिळून आले नाहीत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रशांत गोपनारायण यांनी असोदा रेल्वेगेट जवळील खांबा क्रमांक ४२८/ २२ ते २४…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजी नगरातील हुडको, धनाजी काळे नगर व मकरा अपार्टमेंट परिसरात जुन्या वादाची खून्नस काढण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळक्याने तीन जणांच्या घरावर तलवारींनी हल्ला केला. ही घटना घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. परंतू पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन गटात वाद झाले. परंतू पोलिसांनी या घटनेची दखल न घेतल्यामुळे त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास शिवाजी नगरात पुन्हा हे दोन्ही गट एकमेकांच्या घरी जावून भिडले. त्यानंतर एका गटातील सुमारे दहा ते पंधरा जणांचे टोळके दुचाकीने हातात तलवारी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात दोन गुन्हेगार धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवीज असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी धाव घेत एकाला अटक केली. दुसरा फरार झाला आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरात धारधार चॉपर घेऊन दोन जण दहशत माजवीत असल्याची माहिती माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. निरीक्षण जयपाल हिरे यांच्या पथकातील ललित नारखेडे व इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत तांबापुरा गाठले. रईस शेख रशीद (वय ३२, रा.तांबापुरा) व शोएब शेख सलीम (रा. जुम्मा शाहा वखारजवळ मेहरुण) असे दोघेही पोलिसांना पाहून पळू लागले. त्यापैकी रईस शेख रशीद हा पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याचा साथीदार…
मुंबई : वृत्तसंस्था अनेक परिवारात छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत असतात, पण ते वाद काही वेळाने मिटत असतात, पण एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. कौटुंबिक वादातून विवाहितेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जवळपास ९० टक्के भाजली आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडूपच्या सोनापूरमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून महिलेला आज (२७ डिसेंबर) सासरच्या मंडळींनी जिवंत जाळलं आहे. दीर, नणंद दोघांनी केरोसीन ओतून महिलेला जिवंत जाळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना दीर आणि नणंद दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. महिलेला आधी फोर्टिस रुग्णालयात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरातील एका टेलर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील अंदाजे पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची थरारक घटना मध्यरात्री घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरात प्रमोद सोनवणे यांच्या मालकीची कापडाची दुकान असून मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. दुकानातील विक्रीसाठी असलेले कपडे आणि शिलाई मशीन आदी जळून नष्ट झाले. तब्बल ५ ते ६ लाखांचा नुकसान यावेळी झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सदर घटना घडताच अग्निशमन विभागातील जवान वाहनचालक देविदास सुरवाडे फायरमन रोहिदास चौधरी, भगवान…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असतांना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि. संभाजीनगर येथील मनोज ज्ञानेश्वर निकम (२६) या युवकाचा मृतदेह २४ डिसेंबर रविवार रोजी तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा औट पोस्टला दिली असता तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील, मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील जागेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या घटना सुरु असतांना नुकतेच सोमवारी रात्री ११.३० एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने २ जण जागीच ठार झालेत. तर एक जण किरकोळ जखमी आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नगर महामार्गावर सोमवारी रात्री ११.३० वाजता बकोरी फाट्याजवळ हा अपघात झाला. रावसाहेब सिदाजी माने ( वय 21, रा. रामनगर, लोणीकंद ) व राहुल मोहन डुकले ( वय 19, रा. गोरे वस्ती, वाघोली ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. रावसाहेब हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या पिलिभित जिल्ह्यातील एका गावात रात्रीच्या वेळी घुसलेल्या वाघिणीला जवळपास १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले. वाघीण घुसल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुद्ध करत पकडले यावेळी या परिसरात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वाघिणीला पकडतानाचा व्हिडीओ बनवून अनेकांनी तो सोशल माध्यमावर टाकला. व्याघ्र संरक्षित क्षेत्र माला रेंजपासून चार किमी दूर अंतरावर स्थित अटकोना गावात वाघिणीने घुसखोरी केली होती. गावातील शेतकरी सुखविंदर सिंग आपल्या कुटुंबासोबत सोमवारी रात्री झोपलेले होते. रात्री १२ च्या सुमारास घराजवळील वाहनावर वाघिणीने उडी मारत मोठी डरकाळी फोडल्यानंतर संपूर्ण…

