जळगाव : प्रतिनिधी गावातील भांडणाच्या कारणावरुन तरुणाशी वाद घालीत त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील चेतन ज्ञानेश्वर पाटील हा तरुण नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यांच्या गावातील जय सुपडू शेळके यांची म्हैस चेतन यांच्या खळ्यात शिरल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास चेतन पाटील हा जळगावात क्लाससाठी आला होता. क्लास आटोपून चेतन हा घरी जाण्यासाठी जिल्हा परिषदजवळ आला. यावेळी जय शेळके हा त्याच्या मागे आला. यावेळी त्याने तू गावात काय…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक लग्नकार्यांत मानापमान नाट्य रंगल्याचे आपण पाहिले आहे. अनेकदा जेवणावरूनही वादविवाद होतात; परंतु वन्हाडींना पंगतीत मटणाची नळीच वाढली नसल्यामुळे लग्न मोडल्याची अजब घटना तेलंगणाच्या हैदराबादमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगतियाल येथील मुलगा असून मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे, नोव्हेंबर महिन्यात मुलीच्या घरीच साखरपुडा झाला. वधूपक्षाकडील लोकांनी पाहुण्यांसाठी मांसाहारी बेत ठेवला होता. परंतु जेवणात मटणाची नळी नसल्याची तक्रार वर पक्षातील लोकांनी केली. साखरपुड्यापूर्वी झालेल्या बोलणीत जेवणाच्या पदार्थांमध्ये मटणाच्या नळीचा समावेश नव्हता, असा दावा मुलीकडील लोकांनी केला. परंतु इतका वाढला की अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना वाद मिटवण्याचा सल्ला दिला; परंतु ते पोलिसांनाही जुमानत नव्हते.…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील धुळे रस्त्यावर वीज मंडळ याठिकाणी दि.२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन कारला अचानक आग लागल्याने कारमध्ये झोपलेला पिता आणि मुलगा, असे दोघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयासमोर राजस्थानमधील ओटा बुंदीया जिल्ह्यातील खेळणी व संसारोपयोगी साहित्य विक्रेत्यांनी अमळनेर शहराबाहेर आपले बस्तान मांडले आहे. त्यांची वस्तू वाहणारी ओमिनी गाडी त्यांच्या झोपडीशेजारी लावलेली होती. गाडीमध्ये रात्री कर्नल बागडीया (वय ६०) हे झोपलेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन गाडीला आग लागली. या आगीत ते आणि त्यांचा तरुण मुलगा रामलाल (वय ३०) हे जखमी झाले. आग लागताच नगर परिषदेचा अग्निशमन बंब…
जळगाव : प्रतिनिधी वापी-यावल बसला सुरत-नागपूर महामार्गावरील दहिवेलनजीकच्या बोडकीखडी गावाजवळ ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दहिवेलनजीक असलेल्या बोडकीखडी गावाजवळ वापीहून यावल जाणारी एमएच २०. बीएल ३३७७ क्रमांकाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस ट्रकला धडकली. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी न थांबता ट्रक पळवून नेला. दहिवेल औट पोस्टवरील पोलिस कर्मचारी राजू जाधव, सागर चौधरी, दिनेश मावची घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसमधील २० जखमी…
मुंबई : वृत्तसंस्था शहरातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली असून खिलाफत इंडियाच्या मेलवरून आरबीआय कार्यालयासहित एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. या धमकी सत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या महितिन्सुअर, मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेलय आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक वादंग घडत असतांना आता सर्वात मोठा दावा माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. शालिनी पाटील म्हणाले कि, “अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील”, तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं पाटील म्हणाल्या. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही.…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील वंजारी वाड्यात घराचे बांधकाम सुरु असून, येथे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. स्लॅब टाकतांना वर जाणारी क्रेन अचानक तुटली. यावेळी जेवणासाठी घरी जात असलेल्या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना बोदवड येथे २४ डिसेंबरला घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड शहरात प्रकाश नारायण पालवे (वय ३७) हे कपाशीची गाडी भरण्यासाठी गेलेला होता. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तो जेवण कारण्यासाटःई घरी जात होता. यावेळी घराजवळच शेजारी बांधकाम चालू होते. स्लॅब टाकण्याचे काम क्रेन मशीनने सुरु होते. यावेळी प्रकाश हा घरी जेवणाला जात असतांना लोखंडी क्रेनचा छावडा अचानक त्याच्या अंगावर तुटून पडला. यात त्याचा…
बीड : वृत्तसंस्था ३५ वर्षीय विवाहितेला लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझा नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करिन, अशी धमकी देत एका नराधमाने तब्बल ७ वर्ष अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली आहे. प्रमोद मुंजा पराड (रा. शिक्षक कॉलनी, मंजरथ रोड) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय विवाहितेचे लग्न झालेलं असून ती बीडच्या माजलगाव तालुक्यात राहते. आरोपी आणि पीडितेने लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नानंतर पीडितेने आरोपीसोबत संबंध तोडले, मात्र आपले लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझ्या नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करिन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेला…
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच भरधाव वेगात असलेल्या कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी ट्रक अचानक कारवर कोसळला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामप्रकाश, जय देवी, रोशनी आणि गीता अशी मृतांची नावे आहेत. सुमित आणि राखी अशी गंभीर जखमी झालेल्या बहिण भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथील रहिवासी असलेले…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर नियमित अपघाताची घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी आता अहमदनगर येथून समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. बस जागीच पलटी झाल्याने यातील काही शालेय विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगरमधील संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती. वाटेतच बसचे एक्सेल तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात बस पोहचली त्यावेळी हा अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने…

