नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना एक धक्कादायक बातमी जपानमधून समोर आली आहे. जपानमधील एका प्रांतात नेहमीच भूकंपाचे हादरे जाणवत असतात. आज देखील जपानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हा भूकंप तब्बल ७.४ रिश्टर स्केलचा होता. भूकंपानंतर समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरांना त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. भूकंपाच्या रिश्टर स्केलचे प्रमाण जास्त असल्याने यात नागरिकांच्या घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ठिकानचे काही व्हिडीओ देखील समोर आलेत. नोटो द्वीपकल्पात शेजारील शहरांत भूकंप झाल्यानंतर असलेल्या परिस्थितीचा व्हिडीओ तेथील स्थानीकांनी सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाल्याचे दिसत आहे. भूकंपामुळे येथील…
Author: editor desk
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहर गुन्हेगारीच्या घटनेमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना आता कोल्हापूर शहर देखील गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्या आहे. शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून उसाचा फड पेटवून दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेचा खून कऱण्यात आला आहे. या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहते. याप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने सदर महिलेला जबरदस्ती नेले. याठिकाणी त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आशाताईने विरोध केला. तो तिला…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एका ३० वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी शायदा अहमद तडवी (वय ३०) यांना दि. २९ रोजी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सायंकाळच्या सुमारास त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. नम्रता अच्छा यांनी दिलेल्या…
पुणे : वृत्तसंस्था दिलेले पैसे परत मागितल्याने भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी शनिवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (३१, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ६ डिसेंबर रोजी वाकड येथे घडला. फिर्यादी रामेश्वर आणि सुनीता…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कल्याणे होळ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्यासह मुलाला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे सरिता मनोज कापडणे (वय-३१) या महिला पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरूवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता शेजारी राहणारे भाईदास जगन कापडणे यांच्याशी वाद झाला. याच रागातून भाईदास कापडणे, छोटू जगन कापडणे, सिमाबाई, पौर्णिमा, सुनंदाबाई, मिलींद, जगन खंडू कापडणे, आणि कलाबाई (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कल्याणे होळयांनी सरिता…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर पेठ येथे रविवारी संध्याकाळी आठवडी बाजारात क्षुल्लक कारणावरून दोन विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे मारहाणीत रूपांतर झाल्याची घटना घडली. यावेळी बाजारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यादरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल होताच जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून, तणावपूर्ण शांतता आहे. यात दोन्ही बाजूंकडील सहा जण जखमी आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहूर येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. गफार खाँ पठाण व श्याम भोई यांचे दुकान शेजारी लागतात. सायंकाळी क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यादरम्यान बाजारात गोंधळ उडाला. पळापळ सुरू झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परिसरात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाप-लेकामधील भांडण सोडविणे एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसावरच मुलाने चाकूहल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण हे जखमी झाले आहेत. कौटंबिक वादानंतर मलाकडन त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधत मदतीची मागणी केली होती. यावर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार अक्षय चव्हाण हे मदतीसाठी पोहचले. संशयित मुलाला समज देत असतानाच त्याने स्वयंपाक घरातील चाकूने हल्ला चढवत अक्षय चव्हाण यांना जखमी केले. या घटनेनंतर संशयित पसार झाला. चव्हाण यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहित महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, चक्क पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. यावेळी रस्त्यात या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे, पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली. सदर घटनेनंतर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी विचारधारेच्या संघटनेवर एक मोठी कारवाई केली आहे. जम्मू कश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुरियत’ या संघटनेवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट पोस्ट करत माहिती दिली आहे. मोदी सरकारने UAPA अंतर्गत ही कारवाई केली आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनेवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. फुटीरतावादी विचार पेरण्याचे आरोप ‘तहरीक-ए-हुरियत’ या संघटनेवर होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर ‘एक्स’ अकाऊंटवरून या संघनेवर केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. मोदी सरकारने ‘तहरीक-ए-हुरियत’वर UAPA अंतर्गत कारवाई करत बेकायदेशीर संघटना घोषित…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैदानावर क्रिकेट खेळता खेळता १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मृत मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथील प्रिन्स सैनी असे या मुलाचे नाव असून आहे. राजीव सैनी यांचे कुटुंब हसनपुरनगरमधील मोहल्ला कायस्थान येथे राहते. त्यांचा मुलगा प्रिन्स श्रीमती सुखदेवी इंटर कॉलेजमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. शनिवारी (३०,डिसेंबर) दुपारी तो मित्रांसोबत शहरातील सोहरका रोडवर असलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. दुपारी खेळताना प्रिन्सला तहान लागली. मैदानावरच बॉटलमधील थंड पाणी प्यायला ज्यानंतर त्याची प्रकृती खालावली आणि तो चक्कर येऊन जमिनीवर पडला. प्रिन्सला…

