मुंबई : वृत्तसंस्था सरत्या वर्षातील आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवं वर्ष सुरू होत असल्याने राज्यातील अनेक ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. ठाण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांकडून मोठी कारवाई केली गेली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्त रित्या कारवाई करण्यात आली आहे. नव…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड येथील लक्ष्मण माणिक वाडले (वय ५०) हे दि.२९ शुक्रवारी नऊ वाजता टँकर (एम.एच. १९ सीवाय ४३८८) भरण्यासाठी मनमाड येथे गेले होते तेथून जळगावकडे जात असताना रात्री दोन वाजता वराड गावाजवळच असलेल्या पुलाच्या भिंतीला टँकर धडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आऊट साईडने आलेल्या एका गाडीने टँकरला कट मारल्यामुळे टँकर पुलाच्या भिंतीवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. वराड स्टॉपवर पुलाच्या भिंतीला टँकर धडकल्यामुळे लक्ष्मण वाडले यांना मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. हा अपघात पाहून गावकऱ्यांसह रामजी ऑइल मिलच्या कामगारांनी टँकरजवळ धाव घेवून लक्ष्मण वाडले यांना तात्काळ गाडीतून बाहेर काढले आणि खाजगी गाडीने जळगाव…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील किनोद या गावात मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांना अश्विनी विशाल चौधरी (वय २४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे पती पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर उघडकीस आली. पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह बघताच त्यांनी आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील किनोद येथे अश्विनी चौधरी या विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या कुटुबियांसोबत जेवण केल्यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अश्विनी यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती विशाल चौधरी पाणी पिण्यासाठी उठले व…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील मारवड रस्त्यावर प्रताप महाविद्यालयाजवळ दि. ३० रोजी दुपारी १ च्या सुमारास एसटी व दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील पिंपळे रोड भागातील वामन नगरातील रहिवासी प्रीतम गजमल शिंदे (४९) हे ३० रोजी नेहमीप्रमाणे दुचाकीने शेतीच्या कामानिमित्त बोरगाव येथे जाण्यास निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास धार रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ अमळनेर-तांदळी एसटी बसची (क्रमांक एमएच ४०-एन ९०८२) धडक बसल्याने डोक्यास, तोंडास मार लागला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुकुंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पवन नगरातील ४५ वर्षीय धर्मा किसन गवळी हे माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी रेल्वेने निघालेले असतांना ते रेल्वेतून पडल्याने ठार झाल्याची घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रजापतनगरनजीक असलेल्या रेल्वे रुळाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगचे काम करणारे धर्मा गवळी यांच्या पत्नी खंडवा येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी गवळी हे सकाळी रेल्वेने जायला निघाले.प्रजापतनगरनजीक रेल्वे रुळावर खांब क्रमांक ४२१/२बी ते ४२१/४बी दरम्यान ते रेल्वेतून खाली पडले. नागरिकांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. गवळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयताच्या खिशात रेल्वेचे तिकीटही आढळून आल्याची…
जळगाव : प्रतिनिधी शहरात वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वीच अतिउत्साही लोकांनी एक दिवसाआधीच ३१ डिसेंबरचा आनंद घेत असतांना चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने भर रत्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स चारचाकीने उडवीत तीन दुचाकी व एका चारचाकीला जबर धडक दिली आहे. यात एका पत्रकारचे परिवार थोडक्यात बचावले आहे. यानंतर पोलिसांनी या चारचाकी चालकाला घेवून जिल्हा पेठ पोलिसात आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे जात असतांना रात्री ९ वाजेच्या सुमारास बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक प्रेमराज सुभाषराव वाघ हा मद्यधुंद अवस्थेत असतांना आकाशवाणी चौक परिसरातील बॅरिकेड्स चारचाकीने उडवत तीन दुचाकींसह एका चारचाकीला धडक…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यात शनिवारी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली असून या दोघांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात (आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. उद्यापासून नवीन वर्ष सुरु होत असल्याने आता जनतेला नव्या वर्षात काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाधित रुग्ण ३५ ते ३७ वयोगटातील महिला असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहे. त्यांचे नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यापासून चाचण्या वाढवल्या असून दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील बेळी गावातील सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानातील भगवान श्री कुंडलेश्वर गोशाळेत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजूमामा भोळे यांनी भेट देत गोशाळेची पाहणी करीत दर्शन देखील घेतले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी प.पु.भरत महाराज बेळीकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ.राजूमामा भोळे यांच्या संयुक्त विद्यमाने ६० लाख रुपयांचा निधी सभामंडपासाठी तर सरक्षण भिंतीसाठी ४० लाख, पेव्हर ब्लॉकसाठी ३० लाख तर पुलासाठी ३० लाखांचा निधी देण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून भविष्यात ब दर्जाचे तीर्थक्षेत्र मिळवून…
कोल्हापूर : वृत्तसंस्था देशभरातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विधवा महिलावर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतांना एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका विधवा महिलेने शरीर संबंधास नकार दिल्याने त्या महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह उसाच्या फडात पेटवून दिल्याची घटना कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेची हत्या झाल्याची ही घटना घडली आहे. विधवा महिला हत्या प्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला आजरा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. ती आईसोबत भादवन येथे राहते. भादवन ते भादवनवाडी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात नव्या वर्षात प्रत्येक हिंदूचे स्वप्न साकार होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी उत्तर प्रदेशच्या अयोध्या रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केलं. तसेच यावेळी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याच लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. ‘२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा’, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की,’राममय अयोध्या धाममध्ये आज विविध विकास योजनेचा लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमाचा अभिमान वाटत आहेत. आता संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत. यामुळे अयोध्यावासीतील लोकांमध्ये उत्साह निर्माण…

