Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोदी सरकारची मोठी कारवाई : ‘या’ संघटनेवर घातली बंदी !
    क्राईम

    मोदी सरकारची मोठी कारवाई : ‘या’ संघटनेवर घातली बंदी !

    editor deskBy editor deskDecember 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील मोदी सरकारने वर्षाच्या शेवटच्या दिवशी जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी विचारधारेच्या संघटनेवर एक मोठी कारवाई केली आहे. जम्मू कश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुरियत’ या संघटनेवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट पोस्ट करत माहिती दिली आहे. मोदी सरकारने UAPA अंतर्गत ही कारवाई केली आहे.

    मोदी सरकारने गेल्या वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनेवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. फुटीरतावादी विचार पेरण्याचे आरोप ‘तहरीक-ए-हुरियत’ या संघटनेवर होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर ‘एक्स’ अकाऊंटवरून या संघनेवर केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. मोदी सरकारने ‘तहरीक-ए-हुरियत’वर UAPA अंतर्गत कारवाई करत बेकायदेशीर संघटना घोषित केली आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की, ‘तहरीक-ए-हुरियत’ जम्मू-काश्मीरमधील हे संघटन भारतात फुटीरतावादी विचार पेरत होते. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन देणे आणि भारताविरोधी प्रचार केल्याचा आरोप संघटनेवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘झिरो टॉलरेंट पॉलिसी’ अंतर्गत भारतविरोधी कारवाई असणाऱ्या व्यक्ती आणि संघटनेवर कारवाई केली जाईल’.
    ‘तहरीक-ए-हुरियत’, जम्मू आणि काश्मीर हे सय्यद अली शाह गिलानी यांनी स्थापन केलेली फुटीरतवादी संघटना आहे. गिलानीने ७ ऑगस्ट २००४ साली या संघटनेची स्थापन केली आहे. अशा संघटनांना UAPA अंतर्गत केंद्र सरकार ‘बेकायदेशीर’ किंवा ‘दहशतवादी’ घोषित करू शकते. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ४३ संघटनांना दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. यात काही खलिस्तानी, लश्कर-ए-तोएबा,जैश-ए-मोहम्मद, लिट्टे आणि अलकायदा सारख्या ४३ संघटनांचा सामावेश आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शरद पवारांच्या आमदारांचे बंधू भाजपात दाखल !

    November 16, 2025

    महाविकास आघाडी फुटली : कॉँग्रेस लढणार स्वबळावर !

    November 16, 2025

    विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या; खान्देशात घडली धक्कादायक घटना !

    November 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.