Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. याप्रकरणी वसीम खान कय्युब खान (वय २५) या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुभाष चौकातील मंदिराजवळ १३ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत भिक मागत होती. त्यावेळी संशयित वसीम खान कय्युब खान हा मुलील (एमएच १९ ईएच ५४३१) दुचाकीवरुन जळगाव ते भुसावळ मार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील एका शेतात घेऊन गेला आणि त्याठिकाणी वसीम खान याने मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्या वेळी त्यांनी शनिपेठ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात कामनिमित्त बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवल्याची घटना समता नगरात घडली होती. चोरी करणाऱ्या प्रकाश श्रावण सुरवाडे (वय १८) व दीपक सुभाष भांडारकर (वय २१, दोघ रा. समतानगर) या संशयितांना अवघ्या तीन तासात रामानंद नगर पोलिसांनी जेरबंद केले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरमधील रहिवासी प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय ४०) या शनिवारी कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ७१ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्टया असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चालकाला पैसे खाली पडल्याचे सांगत त्याचे लक्ष विचलित करून कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप लहान मुलाच्या मदतीने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवार, ५ जानेवारी रोजी रात्री दाणाबाजारातील एका सुका मेव्याच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी शनिवार, ६ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्राने नवीन दुकान सुरू केले म्हणून दर्शन ईश्वर चोरडिया (२४, रा. नवीन बसस्थानक जवळ) हे तेथे भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लॅपटॉपची बॅग चालकाच्या बाजूच्या सीटवर ठेवली व दुकानात गेले. कारजवळ तीनजण आले व बसस्थानक कोठे आहे, असे कारमध्ये बसलेल्या चालकाला विचारले. त्याने पत्ता सांगितला व त्याचवेळी तुमचे पैसे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील श्रीहरीनगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून दहा लाखांची रोकड लांबवली. ही घटना भरदिवसा रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. भुसावळ शहरातील श्रीहरीनगरातील श्रीसत्य अपार्टमेंट समोरील घरमालक मुकेशकुमार कुमावत (वय ४५) हे साइटवर मार्बल फिटिंगच्या कामाला गेले होते. तर दुपारी त्यांच्या पत्नी भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. चोरट्याने ही संधी साधत दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व हॉलमध्ये ठेवलेल्या पलंगातील तब्बल दहा लाखांची रोकड घेऊन पोबरा केला. अर्ध्या तासाने कुमावत यांच्या पत्नी घरी परतल्यावर चोरीचा उलगडा झाला. सुदैवाने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने सुरक्षित राहिले. दरम्यान, माहिती मिळताच बाजारपेठ…

Read More

वर्धा : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात पोलीस विभाग अनेक तरुणांना नाशेपासून रोखत असतांना नुकतेच एक खळबळजनक घटना राज्यात उघडकीस आली आहे. अमली पदार्थाची विक्री करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात. वर्धामधील हिंगणघाट येथे एकाने गांजा या अंमलीपदार्थची झाडे चक्क घराच्या छतावर लावलीत. झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला अटक केलीये. तसेच गांजाची दोन ते अडीच फूट उंचीची ४२ झाडं जप्त केलीत. हिंगणघाट पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून आकीब (३१) रा. जगन्नाथ वॉर्ड हिंगणघाट, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आकीब याने घराच्या छतावर गांजा अमली पदार्थाचे हिरवे, ओले अशी दोन ते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था स्वायत्त संस्था या स्वतंत्रपणे काम करत असतात. माझ्यावर देखील अनेक वेळा कारवाई झाली; परंतु त्यातून समोर काहीच आले नाही. रोहितवर झालेल्या कारवाईवरून त्याने मांडलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला तो इतका मोठा नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार मोशी येथे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामती अॅग्रो कंपनीवरील ईडीच्या छाप्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आठ दिवसांपूर्वी दिल्लीला कोण गेले होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून विचारले असता अजित पवार म्हणाले, कोण, कधी आणि कुठे गेला होता, याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा संख्या वाढताना असतांना आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. त्यात कोरोनच्या नव्या व्हेरिएंट JN.1मुळे देखील धोका वाढला आहे. त्यात मुंबईत मागील वर्षभरातील पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत एका ५२ वर्षीय व्यक्तीचा ५ जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. मुंबईत शेवटचा कोविड मृत्यू ९ ऑगस्ट २०२३ रोजी झाला होता. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पाच दिवस ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची तक्रार होती. रुग्णालयात दाखल करण्याच्या २४ तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात ६ जानेवारी रोजी कोरोनाच्या १५४ नव्या रुग्णांची भर पडलीय. १७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील लोंढवे गावात एका हॉटेलमध्ये दि.६ रोजी सायंकाळी पाणी मागण्याच्या कारणावरून दोघांनी हॉटेल मालक, वेटरसह चार जणांवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात हॉटेल मालक मनोहर काशीनाथ पाटील, पवन संतोष धनगर, योगेश पाटील, काळू भिल अशी जखमींची नावे आहेत.चौघांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात मनोहर पाटील याला पोटावर वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोंढवे येथील सर्वज्ञ हॉटेलमध्ये जानवे येथील अजय मंगल पारधी व जगन्नाथ शामराव पारधी हे दोघे जेवायला गेले होते. पाणी मागण्यावरून त्यांचा वेटरशी वाद झाला आणि दोघांनी चाकूने वार सुरू केला. ही भानगड आवरायला आलेल्या मालकावर…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय तरुणीला एकाने जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला तर त्यानंतर पिडीतेला किनगाव येथे घेवून जात अत्याचार करीत तेथेच सोडून दिले. याठिकाणी तरुणी एकटीच असल्याने दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असतासंना संशयित गफूर गबू तडवी याने दि. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पिडीतेचा घरात शिरला. त्याने पिडीतेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सात वर्षांपूर्वी एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केल्यानंतरही पुन्हा दहशत निर्माण करत गुन्हे करणाऱ्या आकाश भास्कर विश्वे (३४, रा. भगवा चौक सुप्रीम कॉलनी) याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून पुन्हा हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी काढले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आकाश विश्वे याची प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर २०१४ पासून आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे २०१६ मध्ये एक वर्षाकरिता हद्दपार केले होते. तरीदेखील त्याने दहशत निर्माण करत गुन्हे करणे सुरूच ठेवले. म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी देत दोन वर्षांसाठी हद्दपार…

Read More