Author: editor desk

नवी मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणातून अनेक हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथून समोर आली आहे. महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता. यातूनत त्याने तिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अमित रवींद्र कौर ( वय 35)असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला एका खासगी बँकेच्या मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तर शोएब शेख (24) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. दोघांची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. अमित कौरचा काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील व्ही सेंक्टरमधील सानप पॉलीमर कंपनीसमोर केमीकल पावडर भरलेल्या आयशर ट्रकच्या कॅबीनमध्ये अचानक आग लागल्याची घटना बुधवारी १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. ही आग नेमकी कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही, परंतू ट्रकच्या कॅबिनमधील सामान जळून मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव औद्योगीक वसाहत मधील व्ही सेक्टरमधील सानप पॉलीमर इंडस्ट्रीजसमोर आयशर ट्रक क्रमांक (केए ५१ सी ५४९९) हा पार्कींगला लावलेला होता. बुधवारी १० जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ट्रक चालक कुमार परमसेवम रा. सेलम, तामिलनाडू हा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या राजधानीत अनेक गुन्हेगारी घटना घडत असतात, अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणाची क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणावर कुत्रा सोडला होता. नंतर शॉलने त्याचा गळा आवळून चाकूने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. क्रूरतेनं तरुणाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समयपूर येथे गुरप्रीत आपल्या कुटुंबासह राहत होता. आई, बाबा, मोठा भाऊ आणि दोन बहिणी असं सुंदर कुटुंब कायम हसत खेळत आयुष्य जगत होतं. मात्र मुलाच्या निधनामुळे आता त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी गुरप्रीत आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात वाहतूक पोलीसासोबत हुज्जत घालण्याच्या घटना नेहमीच चर्चेत येत असतांना नुकतेच कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका मद्यधुंद तरुणाने पोलिसाशी हुज्जत घालत शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे शिविगाळ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने सांगितलं असून याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला होता. तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवलं . कागदपत्रांची तपासणी करत या तरुणाने मद्यप्राशन केल्याचं लक्षात आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेथ एनलायझरने तपासणी सुरू केली. यावेळी या तरुणाने व त्याच्यासोबत…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे क्रिकेट खेळत असताना २९ वर्षीय तरुणाच्या छातीत कळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. यात महेश पांडुरंग बर्डे (वय २९) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी गावाजवळच्या मैदानात महेश व त्यांचे काही मित्र क्रिकेट खेळत होते. मात्र, अचानक महेशच्या छातीत दुखू लागल्याने मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात महावितरणचे कंत्राटी वायरमन असलेले प्रशांत विकास जगताप (वय ३३)  याने तब्बल १ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांवच्या पथकाने भेट दिली होती. या भेटीनंतर त्यांना आता ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था मुंबई- जालना ताशी १०० कि.मी.च्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका बोगीत अचानक सायरन वाजू लागतो आणि काही अंतरावर जाऊन ही रेल्वे उभी राहते. आगीच्या भीतीने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडते; परंतु हा सगळा प्रकार सिगारेटच्या धुरामुळे झाल्याचे स्पष्ट होते आणि प्रवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात. नाशिक रेल्वे स्टेशन काही अंतरावर असताना मंगळवारी दुपारी ४:३० च्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून रवाना झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. तोच सी-५ या बोगीतील सायरन जोरजोराने वाजू लागला. तिकीट निरीक्षक, रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीत येऊन विचारपूस केली. काहीही माहिती मिळत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तेव्हा एका प्रवाशाने…

Read More

पारोळा : प्रतिनिधी येथील न्यायालयाने विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारास एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. हा गुन्हा २०१७मध्ये झाला होता, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी भिला चव्हाण (३८, दळवेल तांडा) याने एका महिलेचा विनयभंग केला होता. त्या गुन्ह्याची सुनावणी न्यायमूर्ती एम. एस. काझी यांच्यासमोर पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. पी. बी. मगर यांनी युक्तिवाद केला, गुन्ह्याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण शिंदे यांनी केला होता.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना पक्षातील आमदारांवर उद्या सुनावणी होणार आहे. या आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीव आणि लक्षद्वीप या पर्यटन स्थळांची जोरदार चर्चा होत आहे. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने हे प्रकरण चांगलेच पेटले. यादरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. फडणवीसांनी हे मालदीव नव्हे म्हणत कोकणातील फोटो शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये भारतीय…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील ठाकरे गट अनेक अडचणीत असतांना पुन्हा एकदा ठाकरे गटाचे तालुकाध्यक्षाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुकाध्यक्षाच्या पराक्रमामुळे कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या अस्मितेला धक्का लागला आहे. एक लाखाला तीन लाख रुपये बनवून नोटा छापून देण्याचा प्रकार तालुकाध्यक्षांने सुरू केला होता. या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) हा आहे. त्याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाखाची रोकड आणि नोटा…

Read More