पालघर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीसोबत विनयभंग व अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पालघर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला हाेता. त्यानंतर तारापूर पोलीसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केली. मिळालेल्या माहितीनूसार एका शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईल मधले अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले. त्याबाबतची तक्रार विद्यार्थिनीने तारापूर पोलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी घटनेचा तपास करीत संबंधित शिक्षकावर कलम 354 सह पाेक्साे कायदा…
Author: editor desk
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढ झाली असून नुकतेच वर्धामध्ये देखील लाच घेताना एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मंजूर विहिरीच्या उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना बोदड येथे ग्रामसेवक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना (वय ४३) असं आरोपी ग्रामसेवीका महिलेचं नाव आहे. देवळी तालुक्यातील बोदड येथील एका शेतकऱ्यास मनरेगाअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झालीये. विहिरीकरिता मंजूर उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेविका अर्चना किसनराव बागडे यांनी तक्रारदार शेतकऱ्यास दोन हजार रुपयांची मागणी केली. त्या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दोन हजारांची लाच…
जळगाव : प्रतीनिधी जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम देत माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकीताई पाटील आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व देवेंद्र मराठे यांचे कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. यानंतर डॉ. उल्हासदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर टिकास्त्र सोडले होते. याप्रसंगी त्यांनी स्पष्टपणे आपली कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. या अनुषंगाने आज मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला. यात डॉ. उल्हासदादा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, देवेंद्र मराठे…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे २ 2.30 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ पहाटेच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. रोहित पवार यांच्या समर्थनात शरद पवार गटाने शक्तीप्रदर्शन केलं आहे. शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जमले आहेत. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. रोहित पवार सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत ईडी कार्यालयात पोहोचणार आहे. रोहित पवार यांची ईडी चौकशी संपेपर्यंत शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून राहणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे स्वत: रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. रोहित पवार यांनीदेखील ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे.
जळगाव : प्रतिनिधी मध्यप्रदेश, गुजरातसह राज्यात विविध ठिकाणी बंद घर फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील जियाऊल्ला खान असदऊल्ला खान (वय ६० रा. नांदुरा जि. बुलढाणा), सैय्यद अफसर सय्यद अजगर (वय २२ रा. पिंप्राळा हुडको) या दोघांच्या रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी पिंप्राळा हुडको परिसरातून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडीटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घरफोडी करणारी टोळी ही सैय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाली.…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या पुष्पा जितेंद्र कोळी (वय २५) या विवाहितेने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या पुष्पा कोळी यांचा तीन वर्षापुर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्या आपल्या आई-वडीलांसोबतच वास्तव्यास होत्या. सोमवार रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी घरातील छताच्या लाकडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना विवाहितेच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच विवाहितेला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन विवाहितेला मृत घोषीत…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील डेअरी भागातील मॉडर्न डेअरीच्या मागे सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोहेकों नितीन वाल्हे, भूषण पाटील, महेंद्र पाटील, पोकाँ भरत गोराळकर, राकेश महाजन, विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे काही लोक घोळका करून पैसे फेकून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना दिसल्याने त्यांच्यावर अचानक छापा टाकून…
मुंबई : वृत्तसंस्था माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी आज केली यावेळी माध्यमांशी बोलत होते. ‘जो राम का नही वो किती काम का नही’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. केली. रामाने त्यांना (उद्धव ठाकरेंना) सद्बुद्धी द्यावी, काँग्रेसला बाळासाहेबांनी विरोध केला त्यांना त्यानी सत्तेत घेतलं. लग्न एकाबरोबर संसार एकाबरोबर आणि हानीमून एकासोबत केलं. सत्तेच्या खूर्चीसाठी आणि अहंकारापोटी ते वागत आहेत त्यामुळे लोकं त्यांना सोडून जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था शहरातील एका परिसरात दोन गटात तुफान राडा झाला असून लाठ्या काठ्यांनी हाणामारी तसेच दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 64 जणांना अटक केली आहे. रस्त्याच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात तब्बल दीड तास दगडफेक सुरू होती, यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी अश्रू -धुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पडेगावमधील आहे. एका घरासमोर 4 मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच…

