Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवी मुंबई सज्ज : मराठा आंदोलकांसाठी भोजनाची व्यवस्था
    राजकारण

    नवी मुंबई सज्ज : मराठा आंदोलकांसाठी भोजनाची व्यवस्था

    editor deskBy editor deskJanuary 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलक मनोज जरांगे पाटील दि.२० रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. २५ जानेवारी रोजी मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलक मराठा बांधवांचे २५ जानेवारी रोजी दुपारचे जेवण पनवेल येथे होईल. पनवेलमध्ये तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

    या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेतल्या जात आहेत. १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलाव याची व्यवस्था केली जाणार आहे. घराघरांतून भाकऱ्या तयार केल्या जाणार आहेत. स्वयंसेवकांमार्फत जेवण वितरीत केलं जाणार आहे.

    लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या वाकसई गावातील दोनशे एकर मैदानावर आजपासून तयारी सुरू करण्यात येत आहे. तब्बल वीस जेसीबीच्या सहाय्याने मैदान सपाटीकरणाचं काम सुरू केलं आहे. तर सर्व मराठा बांधवांच्या जेवणाची सोय ही मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात असणारे प्रत्येक मराठा कुटुंब करणार आहे.

    पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मातोरी प्रवास केला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी २१ जानेवारीला मातोरी ते करंजी बाराबाभळी प्रवास करणारेत. मातोरीतून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम / जेवण व जेवण असेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.