मेष आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. आज तुम्ही आई-वडिलांसोबत मंदिरात दर्शनासाठी जाल. काही लोक आज तुमच्या वागण्याने खूप प्रभावित होऊ शकतात. काही शुभ कार्यात नवीन लोकांची मदत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वासाच्या मदतीने संबंध अधिक दृढ होतील. तुमची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. कार्यालयातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने तुमचा उत्साह वाढेल. मुलांशी संबंधित काही महत्त्वाची कामे आज पूर्ण होऊ शकतात. लव्हमेट्स आज कुठेतरी बाहेर जातील आणि रात्रीच्या जेवणाची योजना देखील करतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. आज तुम्हाला कामात यश मिळेल. आज तुम्हाला काही काम पूर्ण करण्यासाठी नवीन कल्पना येईल.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शेतात जात असताना अंगावर घेतलेली शाल बैलगाडीच्या चाकात अडकून गळफास लागल्याने जानुबाई भायला बारेला (वय ३२, रा. गोंट्या पांचाळ, ता. भगवानपुरा जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. भादली, ता. जळगाव) या शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली येथे राहणाऱ्या जानुबाई बारेला या शनिवारी बैलगाडीने शेतात जात होत्या. त्यावेळी अंगावरील शाल बैलगाडीच्या चाकात अडकली. यात त्यांच्या मानेला गळफास बसला व गळ्यात असलेल्या दागिन्यांमुळे जबर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ाशिराबाद पोलिस घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
जळगाव : प्रतिनिधी घरकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मनीषा श्यामकांत बाविस्कर (३०, रा. श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना श्रीरत्न कॉलनीत शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी.वर्कशॉपमध्ये नोकरीला असलेल्या मनीषा बाविस्कर या शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी घरी काम करत असताना सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यासंदर्भात रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झाल्याने विश्वास संपादन करीत जळगावातील वेळोवेळी अत्याचार महिलेवर करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेने विरोध केल्यानंतरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या दिनेश पांडुरंग चौधरी (रा. सानपाडा) या रेल्वे पोलिसाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला रेल्वेने मुंबईला जात असताना तिची दिनेश चौधरी याच्याशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने संपर्क वाढवला व महिलेचा विश्वास संपादन शारीरिक संबंध केले. १ एप्रिल २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान तो वेळोवळी जळगावला आला व त्याने महिलेच्या घरी केला. जाऊन तिच्यावर…
भुसावळ : प्रतिनिधी सार्वजनिक जागी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा असतानाही गांजा ओढणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिरा हॉलच्या बाजूला गांजा ओढणाऱ्या सलमान शेख सलीम शेख (२०, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात हे.कॉ. भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, खडका रोडवरील ईदगाहनजीक युनूस हमीद शेख (४८, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हा गांजा ओढत असताना कॉन्स्टेबल अमर अढाळे यांनी कारवाई केली तर करीम नूर मोहम्मद शेख (५६, उस्मानिया मशिदीजवळ, भुसावळ) यास गांजा ओढताना हे.कॉ. जावेद हकीम शाह यांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या बदल्या झाल्या नाही, त्या रद्द करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस 7 अधिकाऱ्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यामध्ये तीन पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक व सात पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची धुळे येथे, ज्ञानेश्वर जाधव यांची नाशिक ग्रामीण व शिल्पा पाटील यांचीही नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये योगिता नारखेडे यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये जळगावातील गोपाल देशमुख,…
मेष : गर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये माघ पोर्णिमेनिमित्त देवाला निघालेल्या भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात पलटी झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ महिला आणि काही लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळी डीएम, एसपी…
जळगाव : प्रतिनिधी शहरामध्ये शनिवार दि. २४ रोजी सकाळी एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास केला. गणेश कॉलनी जवळ बजरंग बोगद्यापाशी एका तरुणाला तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसासह् स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. संशयित आरोपी किशोर रामदास कोळी (वय ३० रा. काचन नगर, जळगाव) याच्या ताब्यातून मोटारसायकलच्या शिटखाली…
हिंगोली : वृत्तसंस्था हिंगोली – वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम गावचे रहिवासी आहेत. आज २४, फेब्रुवारी शनिवारचा दिवस असल्याने हे भाविक सिरसम येथून माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र या भीषण अपघातात पाच जणांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.…

