जळगाव : प्रतिनिधी हरिविठ्ठलनगर भागातील रहिवासी असलेल्या गोपाल राजू भोई (वय ३२) या युवकाचा बुधवारी रात्री वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगर भागात गोपाल राजू भोई हा युवक आपले दोन भाऊ व आईसमवेत वास्तव्यास होता. तसेच ठेकेदारीचा व्यवसाय करत होता. बुधवारी रात्री जेवण करून घराबाहेर निघाला होता. गुरुवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गोपालचा मृतदेह सावखेडा शिवारातील रेल्वेलाइनलगत आढळून आला. पोलिसांना आधार कार्डद्वारे गोपालची ओळख कळली. या ठिकाणी गोपालची दुचाकीदेखील आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून गोपालचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोमध्ये गुरूवारी पहाटे भयानक अपघात झाला. या अपघातात १२ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, नातेवाईकांच्या किंचाळ्यांनी अवघा परिसर सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये गुरूवारी पहाटे ट्रक आणि टेंम्पोमध्ये मोठा अपघात झाला. शाहंजहापूर भागातील दमगडा गावचे काही लोक गंगेत स्नान करण्यासाठी ऑटोने फरुखाबाद येथील पांचाळ घाटाकडे रिक्षामधून जात होते. यावेळी बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंज येथील सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या ऑटोला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला.…
मुंबई : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या २० तारखेपासून मुंबईकडे धाव घेत असतांना आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्कसाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील यांच्या मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून सध्या ते लोणावळ्यात आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडून मनोज…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात झालेल्या चोरीचा छडा जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने लावला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा चौकशी करीत गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी तपास लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भाऊसाहेब राऊत विद्यालयात दिनांक १९ जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 05:20 ते दि. 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान क्रिडा दालनाच्या रुमचा कडी कोंडा तोडून त्यातील पाच नग सिलींग फॅन व एक नग ताशा असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला होता. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण सुका तायडे यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दि. 23 जानेवारी 2024 रोजी या चोरीच्या घटनेप्रकरणी फिर्याद…
जळगाव : प्रतिनिधी मी पण येथेच राहतो म्हणत विवाहितेची वाद घालून विवाहितेच्या डोक्यात फरशी मारली. यामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी योगेश कौतिक पाटील (रा. पाथरी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगरात भावना योगेश पाटील (वय २८) या विवाहिता वास्तव्यास आहे. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विवाहिता या घरी असतांना योगेश कौतिक पाटील हे महिलेच्या घरी गेले, त्यांनी महिलेला मी पण येथेच राहतो म्हणत वाद घालू लागला, महिलेने त्याला विरोध केला असता, योगेश पाटील याने महिलेचे केस धरू। तीला जमिनीवर आपटले, तसेच सोबत आणलेल्या फरशीचा तुकडा महिलेच्या डोक्यात हाणून त्यांना…
जळगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावरील स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार करुन त्यावर मुलीचा चेहरा लावून अधिल फोटो व्हायरल केले. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावात ४८ वर्षीय शेतकरी वास्तव्यास आहे. दि.७ जानेवारी ते दि. २३ जानेवारी पर्यंत अज्ञात इसमाने त्या शेतकऱ्याच्या मुलीच्या नावाने स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार केले. त्यावर मुलीचा चेहरा असलेला अश्लील फोटो तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करीत तीची बदनामी केली. हा प्रकार उघडकीस येताच शेतकऱ्याने सायबर पोलिसात तक्रार दिली, त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव भागातील कोल्हे वाड्यात एका परिचारिकेच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि काही रक्कम जळून खाक झाल्याची ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. सकाळच्या वेळी घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुने जळगाव भागातील कोल्हे वाड्यातील शीतल मराठे यांच्या घराला आग लागल्याचे कळताच, माजी नगरसेवक कमलाकर बनसोडे यांनी गल्लीतील लोकांसोबत आग विझविण्यासाठी धाव घेतली. गल्ली अरुंद असल्याने अग्निशमन विभागाचे वाहन या भागात येऊ शकत नसल्याने, स्थानिक नागरिकांनी बादलीने पाणी टाकत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत घरातील बरेच साहित्य आगीत जळून खाक झाले होते. यावेळी अग्निशमन दलाचे…
अमळनेर – प्रतिनिधी तालुक्यातील निम येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले जात असून नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी त्याठिकाणी दाखल झाले आहेत. या कृषिदूतांमध्ये भावेश अनिल सावंत ,प्रल्हाद अशोक आवारे, यश मोतीलाल माळी ,भावेश अरून पाटील ,मनीष अरून पाटील ह्यांचा समावेश असून त्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले. सरपंच भगवान भिल, उपसरपंच राजेंद्र चौधरी, ग्रामसेवक – जगदीश पाटील,शेतकरी महेश पाटील, स्वप्नील पाटील, घनश्याम पाटील, प्रताप पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले. कृषिदूतांनी पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परीक्षण, कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेतीविषयक…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – शिरसोली रस्त्यावरील एका मॉलमध्ये ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशयावरून झालेल्या वादातून, मॉलवर एका गटाकडून दगडफेक झाल्याची घटना बुधवारी संध्या. ७.३० वाजेच्या सुमारास घडली, या वादामुळे शिरसोली रस्त्यालगत काही काळ तणाव निर्माण झाला होता. रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.२४ रोजी संध्या. ७.१५ वाजता एका मॉलमध्ये एक शासकीय कर्मचारी पत्नी व मुलीसोबत खरेदी करत असताना, त्याच वेळी काही मुली आपल्या आईसोबत खरेदी करत होत्या. समोरच्या ग्राहकाने मुलीकडे पाहिले या संशयावरून संबधित मुलीने त्या पुरुष ग्राहकाला विचारणा केली. त्यातून वाद व दगडफेक झाली. या घटनेत एक पोलिस जखमी झाला.
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भर रस्त्यात गळा चिरून एक युवकाची हत्या करण्यात आली असून रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आहे. पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये. मिळालेल्या माहितीनुसार, आंबा चोंढी फाट्याजवळ ही घटना घडली आहे. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी येथे धाव घेतली. राहुल गवळी रा. जुनोना असं खून झालेल्या मयत तरुणाचं नाव आहे. खूनाचे कारण अद्याप आस्पष्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायरान जमिनीच्या कारणावरून दोन गटात तेढ निर्माण होऊन तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत एका तरुणावर वार करण्यात आला.…

