जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी केली होती. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार हे निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याने संदर्भात एकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही,…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष नव्हे तर निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी असल्याची तिखट टीका त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर केली आहे. महाराष्ट्रात केवळ तीनच पक्षांची स्थापना झाली. यात जनसंघ, शिवसेना व महाराष्ट्र निर्वाण सेनेचा समावेश आहे, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी मनसेला कोणत्याही स्थितीत यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात केवळ तीनच पक्ष निर्माण झाल्याचे नमूद करत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात पक्षच नसल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही. ती निवडून येणाऱ्या लोकाची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आतापर्यंत हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी तेच निवडून…
जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील आक्रमक असतांना सध्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे. राज्य सरकारने मराठा…
बीड : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना घडत आहे. आता नुकतेच एका अधिकाऱ्याने जीवन संपविल्याची माहिती समोर येत आहे. सुभाष दुधाळ असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी परळी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले. रात्री घटना केव्हा घडली याबाबत माहित नसून सात वाजता पोलिसांना स्टेशन मास्तरने सांगितल्यानंतर मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला आहे. परळी येथील घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गेल्या महिनाभरात तीन अधिकाऱ्यांनी…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर पोलीस ठाण्यात शनिवारी दि. ९ मार्च रोजी सकाळी एका संशयीत आरोपीने पोलीस कोठडीतील शौचालयात गळफास घेत असतांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह इतर अधिकारी यांनी धाव घेतली. यामुळे खळबळ उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील रहिवासी असलेल्या संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत (वय ४९) असे मयताचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील मारवड पो.स्टे.ला दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी चोरीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत यास दि.२ मार्च रोजी ९.४१ वाजता अटक केली होती. गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस…
मुक्ताईनगर : वृत्तसंस्था श्री संत मुक्ताई ह्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा ,मध्यप्रदेशातील लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीला या परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो मैल पायदळ चालून दिंड्यांसह लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येत असतात. त्यानिमित्ताने श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर, मेहुण आणि चांगदेव येथे यात्रा उत्सव भरला जातो सध्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर चांगदेव येथे दाखल झालेले आहेत त्यामुळे टाळ मृदुंगाचा गजर आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष भजन कीर्तनात सर्व परिसर निनादुन गेला आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार…
लातूर : वृत्तसंस्था उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे सखूबाई तुळशीराम वाघमारे (५५) यांचा कोयत्याने खून केल्याची घटना २४ फेब्रुवारीला उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद होता. आरोपी हा मयत महिलेचा लहान मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले असून, आईच्या नावावरील अडीच एकर जमीन वाटून देत नसल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ तुळशीराम वाघमारे (३९) असे आरोपी मुलाचे नाव असून त्याच्या कपाळावर खरचटलेली जखम दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी विचारले असता.पत्नीची बांगडी लागल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या पत्नीला विचारले असता, तिने असे काही घडले नसल्याचे सांगितले. त्यानंतर २९ फेब्रुवारीला नागनाथला ताब्यात घेतले असता, त्याने…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मेहुणबारे पोहरे येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून बकऱ्या चोरणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीची ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मण दशरथ माळी (२२, रा. डामरुण, ता. चाळीसगाव), रोहन उर्फ माऊली ज्ञानेश्वर पवार (२३). राहल रामदास मोरे (२०, दोन्ही रा. पातोंडा, ता. चाळीसगाव), सौरव संतोष मोरे (२१, रा. सांगवी, ता. पाचोरा), दीपक प्रकाश सोनवणे (१९) आणि कपिल अशोक वाघ (२७, दोन्ही रा. पोहरे, ता. चाळीसगाव) यांचा समावेश आहे. पोहरे गावातील मनोज सोनवणे यांच्या गोठ्यातून डिसेंबर महिन्यात नऊ बकऱ्या चोरीस गेल्या होत्या. याबाबत लक्ष्मण माळी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता…
भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळ तापी पुलाच्या अलीकडे मिस्तरी कामासाठी आलेल्या गोजोऱ्याच्या युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश अशोक सोनवणे हा तरुण तापीनगरात कामाला जात असताना यावल रोडवरील गोदामाजवळ गाडीतून धूर निघू लागल्याने त्याने वाहन थांबवले व धुराची पाहणी करीत असताना दुचाकीने पेट घेतला. हे पाहून या तरुणाने रस्त्याच्या कडेला धाव घेतली, तर दुचाकीने पेट घेतल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार सुपडू पाटील व संजय ढाकणे यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या अग्निशमन केंदाच्या बंबाला पाचारण करण्यात आले व आग…
भुसावळ : प्रतिनिधी तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये कुन्हा या गावी एका शेताच्या बाजूला कोंबड्यांच्या झुंजी लावून सट्टा खेळणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंमलदार सूरज पाटील यांनी हा प्रकार सुरु असल्याबाबतची माहिती डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांना दिल्यानंतर ८ रोजी यानुसार हा छापा टाकला. यावेळी कुन्हा शिवारात रईस बागवान यांच्या लिंबूच्या मळ्याशेजारी असलेल्या परिसरात झुडुपांमध्ये १५ ते १६ इसम हे कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर पैशांचा हार- जितचा खेळ खेळताना दिसून आले. यावेळी २००० किमतीचे २ फायटर कोंबडे, ३,६०० रुपये रोख, ६००० किमतीचे ६ मोबाइल फोन व ५,७५,००० किमतीच्या एकूण १४ मोटरसायकली असा एकूण ५,८६,६००चा मुद्देमाल…

