मेष दिवसाची सुरुवात उत्तम राहील. तुम्ही लोकांशी संपर्क साधाल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. घरातील काही शुभ कार्यही पूर्ण होतील. यावेळी लोककल्याणाच्या कामाकडे तुमचा कल वाढेल. वृषभ रखडलेल्या कामांना गती मिळेल. आपला हेतू साध्य करण्यासाठी थोडेसे स्वार्थी असणे आवश्यक आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतीही खरेदी-विक्री योजना आखली जात असेल, तर ती अंमलात आणण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे. कुटुंबात आणि समाजात योग्य मान-सन्मान मिळेल. मिथुन मालमत्तेशी संबंधित खरेदी-विक्रीच्या बाबतीत यश मिळेल. व्यावहारिक विचार ठेवल्यास कोणताही निर्णय घेण्यास मदत होईल. प्रिय मित्राचे घरी आगमन होईल आणि कुटुंबासोबत मनोरंजक सहलीचीही शक्यता आहे. कर्क स्वभावाने भावनिक असणे आणि इतरांबद्दल सहानुभूती बाळगणे हा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर दुकानासह वाशिंग सेंटर दुकानाला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले. मनपाच्या ७ बंबानी ही आग आटोक्यात आणली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा रा. शिवधाम मंदीर, जळगाव याचे विल्स फर्निचर दुकान आहे. याठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट, देव्हारा , खुर्ची, कपाट आदि साहित्य बनविले जाते. दुकानाच्या बाजूला देवकिरण विलास पाटील रा. निवृत्ती नगर, जळगाव याचे कार वाशिंग सेंटर आहे. रविवारी १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता फर्निचर दुकानाला…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सीएम निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाहीर प्रवेश सोहळा रात्री 8 वाजता पार पडणार आहे. रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतयांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन, रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचंही संजय राऊतांनी…
जळगाव : प्रतिनिधी तरुणाने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी पहाटे तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील अशोक नगर परिसरातील रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दोन दिवसांपासून तो कुठ्ल्यातरी तणावात असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री घरातील स्वयंपाक घरात दरवाजा बंद करून झोक्याच्या दोरीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शितल…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघाताची मालिका सुरु असतांना दि.६ मार्च रोजी जळगावकडून शिरसोलीकडे जात असलेल्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने चंद्रकांत शंकर बोरनारे (४९, रा. रामेश्वर कॉलनी) हे जखमी झाले, ही घटना ६ मार्च रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास रायसोनी महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेले चंद्रकांत बोरनारे हे ६ मार्च रोजी रात्री बारा वाजेच्या दुचाकीने (एमएच १९-डीपी ५४२९) जळगावकडून शिरसोलीकडे जात होते. रायसोनी महाविद्यालयासमोर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने (एमएच १९-बीवाय २७२०) बोरनारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बोरनारे हे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातून हद्दपार असतानाही सुरा घेऊन फिरणाऱ्या आशुतोष उर्फ आशू सुरेश मोरे (२३, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आशुतोष मोरे याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. तो रामेश्वर कॉलनी परिसरात सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, साई मुंढे यांनी ८ रोजी रात्री मेहरुण तलाव जवळील बांधाजवळून आशुतोषला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक लोखंडी सुरा सापडला. पोलिसांनी तो जप्त केला.
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाळा येथील शेतमजूर महिलांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली, या अपघातात नऊ महिला जखमी झाल्या. त्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. चार महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळा येथील शेतमजूर महिला तालुक्यातील शेवगा, चिखली येथे हरभरा काढणीसाठी गेल्या होत्या. या महिला दुपारी रिक्षा क्रमांक एम. एच.३०, एल. १३५५ ने परतत होत्या. त्यावेळी नाडगाव रस्त्यावर खासगी हॉस्पिटलजवळ दुपारी तीन वाजता रिक्षाचालक अजय शिवाजी सोनवणे (रा. माळेगाव) याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा दोन वेळा उलटली. यात क्षमतेपेक्षा…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. फैजपूरच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांच्या खासगी वाहनाला डंपरची धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केला. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११:३० वाजता हिंगोणा शिवारातील पेट्रोल पंपासमोर घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालकास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सुरेश कोळी (३०, रा. डांभुर्णी, ता. यावल), असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. यावल रोडवर अवैध वाळ वाहतक होत असल्याची माहिती अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली. यानंतर त्यांच्या पथकाने यावलहून फैजपूरकडे जाणाऱ्या वाळू इंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपर भरधाव वेगाने पुढे गेला. यानंतर पोलिस…
मेष आजचा तुमचा दिवस उत्तम जाईल. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य आज तंदुरुस्त राहील. या राशीच्या अविवाहित महिलांना आज चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी विशेष संवाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदाची परिस्थिती राहील. वृषभ आज कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आज ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास पाहून बॉस तुमच्यावर खूश होतील. तुम्हाला काही चांगली बातमीही मिळू शकेल. पूर्वी केलेल्या कामाचे चांगले परिणाम होतील. आज तुम्हाला एखाद्या कामात मित्राची विशेष मदत मिळेल. अचानक आर्थिक लाभ होईल. मिथुन अनेक दिवसांपासून तुमच्या प्रगतीत आलेले अडथळे आज दूर होतील. अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण…
धरणगाव – प्रतिनिधी धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर असून येथिल बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आलेल्या ठिकाणी आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी भव्य दिव्य उपजिल्हा रूग्णालय उभारले जावे यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून पालकमंत्री एवढ्यावरच न थांबता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामाच्या 40 कोटीच्याअंदाजपत्रकास व आराखड्यानां मान्यता मिळाली आहे. या उपजिल्हा रुग्णालयाचे मान्यतेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करून…

