नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात हैदराबाद येथील एका 36 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या पतीवर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बकले येथे एका महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला चाकं असलेल्या कचऱ्याच्या डब्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांना ही महिला भारतीय असल्याची ओळख पटली. चैथन्या मधगनी असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. व्हिक्टोरिया पोलिसांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 9 मार्च रोजी दुपारी विन्चेल्सीजवळील बकले येथे एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेचा तपास होमिसाईड…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक असणार असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय रेसकोर्सवरील ३२० एकरावर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली २०० एकर जमीन आणि रेसकोर्सची १२० एकर जमीन अशा ३२० एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाणार असल्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १८ निर्णय घेण्यात आले आहे. बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार (गृहनिर्माण विभाग) बंद…
पारोळा : प्रतिनिधी जळगाव-धुळे महामार्गावरील टोल नाका अज्ञात तोंड बांधून आलेल्या टोळक्यांनी तोडफोड करून पेटवून दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा टोल नाका आजपासून सुरु होणार होता. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात बुरखाधारी तरुण काल मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव-धुळे महामार्गावर चार चाकी वाहनातून येत सब गव्हाण येथील टोलनाका तोडफोड करून पेटून दिल्यानंतर हे तरुण पसार झाले. या घटनेने खळबळ उडाली आहे. हा टोल नाका जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा होता. पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावातील टोल नाका आजपासून सुरु होणार असल्याने आज उद्घाटन…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि चाळीसगाव पोलीसांच्या सतर्कतेने गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात सहा जणांना अटक करण्यात यश आले आहे. यात चाळीसगाव पोलीसांनी केलेल्या कारवाईत चार गावठी पिस्तूल, ५ मॅगझीर, १० जिवंत काडतूसासह १ जणांना अटक केली तर चोपडा पोलीसांनी केलेल्या कारवाईत ९ गावठी पिस्तूल, २ मॅगझीन, २० जिवंत काडतूसासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पेालीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ते मध्यप्रदेश बॉर्डर असलेल्या उमर्टी येथील येथून अवैधरित्या गावठी पिस्तूल विक्री करत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळाली. त्यानुसार पथकाने कृष्णापुर ते…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लंके सध्या पवारांच्या भेटीला पोहचले असून आज ते पक्षात प्रवेश करणार, असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार निलेश लंके निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अहमदनगरमध्ये सध्या निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स लागले असून यावर लंके यांचा…
चोपडा : प्रतिनिधी सातपुडा जंगलात गावठी पिस्तुलांची तस्करी करताना चार जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ९ गावठी पिस्तुले व २० जिवंत काडतुसांसह चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास कृष्णापूर गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींची पोलिसांशी झटापटही झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरजनसिंग प्रकाशसिंग चावला ( २०), मनमितसिंग धृवासिंग बर्नाला (२०, रा. पारउमर्टी ता. वरला, जिल्हा बडवाणी), अलबास दाऊद पिंजारी (२७, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) आणि अर्जुन तिलकराज मलिक (२५, रा. अमृतसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चारही जणांना कृष्णापूर ते उमर्टी या दरम्यान सातपुडा डोंगराळ भागात पकडण्यात आले. त्यावेळी चारही जणांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून…
पारोळा : प्रतिनिधी शहरातील दिल्ली दरवाजा येथील विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८:३०च्या सुमारास दिल्ली दरवाजाजवळ राहात असलेली नम्रता भास्कर फासगे (१६) ही पारोळा येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. सध्या ती परीक्षा देत होती. या युवतीने घरात कोणालाच काहीही न सांगता आपल्या घरातील लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने गळफास तयार करून आत्महत्या केली. परिसरात ही घटना कळताच तिला खाली उतरवून कुटीर रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अलका निरमुळे यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर : प्रतिनिधी शहरातील आठवडी बाजारात दुचाकी लांबविण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कागदपत्रे मागितल्यानंतर त्याच्याकडे मिळून आली नाहीत. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आधीची चोरलेली दुचाकीही काढून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव सायला मानसिंग बारेला (१८) रा. खाऱ्या काकोडा, ता. झिरण्या जि. खरगोन मध्य प्रदेश ह. मू गिट्टी मशीन खदान, उटखेडा रोड, ता. रावेर) असे आहे. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने शहरासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात. बाजारातून मोबाइल, इतर वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दुचाकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शुक्रवारी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील खडका रोड भागात तीन वर्षीय बालकाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली. घटनेमुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या बालकाचा शोध लागला. मिळालेल्या माहितीनुसार, रसलान उर्फ बाब बिहारी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडिल नसरुद्दीन हे खडका रोड येथे मुजम्मिल खान यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास आहे. वरच्या बाजूस घर आणि खाली दुकान आहे. रविवारी सकाळी ११ वाजता देखील तो वडिलांसोबत आला. खडका रोडवरील बिलाल कांडप मशिन या दुकानाबाहेर खेळत होता. याच ठिकाणी ३० फूट खोल व सहा फूट रुंद नाला आहे. अरसलाम हा खेळता खेळता…
धुळे : वृत्तसंस्था काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवार, १२ मार्च रोजी गुजरातमधून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. स्वतः खासदार गांधी हे थेट हेलिकॉप्टरने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता नंदुरबारात दाखल होतील. तेथून ते सी.बी.मैदानावरील सभास्थानी जाणार आहेत. नंदुरबारच्या सभेनंतर दुपारी ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचाकडे रवाना होणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे केंद्रीय व राज्य नेते नंदुरबारात दाखल झाले आहेत. राहुल गांधी हे सुरत येथून हेलिकॉप्टरने नंदुरबारात दाखल झाल्यानंतर त्यांचा ‘रोड शो’ करायचा किंवा कसा, याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे. मंगळवारी साधारणतः दोन वाजता यात्रा व नेते मंडळी ही दोंडाईचाकडे प्रस्थान करतील, अशी माहिती आमदार…

