Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना राजस्थानमधील जोधपुर येथून समोर आली आहे. प्रेमामध्ये आडथळा ठरणाऱ्या सासुला तिच्याच सुनेने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तब्बल ८०० सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हत्येचा तपास करण्यात यश आले आहे. सध्या या हत्येच्या बातमीनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.लग्नानंतरही बायकोचं परपुरुषावरचं प्रेम या हत्येला कारणीभूत ठरलंय. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपुकमधील बोरानाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. जिथे (ता.७)मार्च रोजी पीडित महिला संतोष कंवर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये आरोपीने सासूचा गळा दाबून तब्बल ५ वेळा…

Read More

पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे. दरम्यान, मध्यरात्रीच वसंत मोरे यांनी भावनिक पोस्ट केली होती. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी भावनिक पोस्ट वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांनतर आज दुपारी थेट वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील पत्रही त्यांनी पोस्ट केले आहे.…

Read More

हिंगोली : वृत्तसंस्था लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या. अन्यथा, कोट्यवधी मराठ्यांची भावनिक लाट येणार आणि निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के स्वतंत्र आरक्षण हे फसवं असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. मराठा समाजाला मिळालेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. त्यामुळे सरकारने सगेसोयरे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होत असतांना आज देखील राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीने उमेदवार जाहीर केले नाही तर दुसरीकडे महायुतीत असलेल्या भाजपच्या हायकमांडने शिंदें शिवसेनेच्या १२ पैकी ६ खासदारांचे तिकीट कापून नवे उमेदवार द्यावेत, या अटीवर भाजप ठाम आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे कोडे सोडवण्यासाठी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. त्यातमहाराष्ट्रात ३० पेक्षा एकही जागा कमी घ्यायची नाही, असा पुनरुच्चार भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केला. शिंदेसेनेला १२ व अजितदादा गटाला ६ जागा दिल्या जातील. आतापर्यंत भाजपच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला होता. मात्र त्याशिवाय चर्चा पुढे जाणारच नाही असा पवित्रा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA), 2019 देशभरात लागू करण्यात आला आहे. यासंबंधीचे नियम आज अधिसूचित करण्यात आले. CAA पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अनधिकृत गैर-मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देणार आहे. CAA नियम जारी केल्यानंतर, आता केंद्र सरकार 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या अत्याचारित गैर-मुस्लिम स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करेल.डिसेंबर 2019 मध्ये संसदेत मंजूर झाल्यानंतर, या कायद्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकली नाही, कारण त्याच्या अंमलबजावणीचे नियम अधिसूचित होणे बाकी होते, परंतु आता मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीचे कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होणार असून, या घोषणेबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू होणार…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील भोजे येथे एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोजे येथील संदिप श्रीकृष्ण पवार (वय ३५) यांचा १० मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास नविन प्लॉट मधील शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. संदिप पवार यांना तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी संदिप पवार यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत संदिप पवार यांच्या पाश्चात्य आई, वडील, पत्नी, दोन मुलं,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चारा घेऊन येत असताना शेताच्या बंधाऱ्यावरून अचानक बैलगाडी उलटल्याने कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव आनंदा पाटील असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे गौरव हा आई-वडील, भाऊ आणि बहीण यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो म्हसावद गावातील थेपडे विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला. शेतात चारा घेऊन येत असताना दुपारी अडीच वाजता बैलगाडीने शेताच्या बांधावरून येत असताना अचानक बैलगाडी…

Read More

रावेर : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे ब-हाणपूर बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण १२ प्रवासी जखमी झाले, यातील पाचजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास विवरे गावाजवळ घडला, याप्रकरणी निंभोरा पोलिसांत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे – ब-हाणपूर बस (क्र. एमएच ४० वाय १८७) ही ४१ प्रवासी घेऊन विवरे बुद्रुकहून रावेरकडे येत असताना स्मशानभूमीजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एचआर ५५ एक्स २९८३) जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकाच्या मागील बाजूच्या पाच ते सहा खिडक्यांसह बसचा पत्रा चिरला आणि बस रस्त्याच्याखाली उतरली.…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळू शकते. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वजबाबदारी चोख पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुम्हाला खूप उपयोगी पडेल. प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. वृषभ आजचा दिवस चांगला जाईल. आरोग्य चांगल राहील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे नाव काही रचनात्मक कार्यात असेल. प्रसिद्धी मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही नवीन पावले उचलाल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. सकारात्मक विचारांचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा राहणार मेलाणे हा अवैधरित्या साग वृक्ष २७ व इतर प्रजातीचे वृक्ष ३१ असे एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना सदर इसमा विरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मधील राखीव वनात राजेंद्र डोका-या पावरा याने अपप्रवेश करुन अवैधरित्या एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना महिला वनरक्षक यांनी त्यांस मनाई केली असता सदर इसमाने महिला वनरक्षक यांच्या…

Read More