Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक
    क्राईम

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    editor deskBy editor deskApril 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यानजीक आज सकाळी भरधाव वेगातील एसटी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात बसमधील एकूण १८ जण जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याहून भुसावळकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस (एमएच-२०, बीएल-३४१२) आज सकाळच्या सुमारास भालगाव फाट्याजवळून जात असताना हा अपघात घडला. बस भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि बस थेट रस्त्यालगतच्या दुभाजकावर आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक आणि राज्य परिवहन महामंडळाचा एक कर्मचारी असे एकूण १८ जण प्रवास करत होते. धडकेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे.

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.  प्राथमिक माहितीनुसार, बसवरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रस्त्याचे सुरू असलेले काम, दुभाजकाची रचना, तसेच चालकांवर असलेला कामाचा ताण या बाबींचाही या अपघातामागे संबंध असू शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

    दरम्यान, अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याने संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडून रोकड लांबविली !

    April 30, 2026

    सोशल मीडियावर पिस्तूल दाखवत दहशत; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.