जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मोहोडी रस्ता ते गुरु पेट्रोल पंप मार्गे पाचोरा रोडवरील मलंग शाह बाबा दर्गा परिसरातील सुमारे ३०० मीटर लांबीच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.नगरसेविका वैशाली पाटील यांनी दिलेल्या निवेदनात संबंधित रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याचे नमूद केले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग परिसरातील नागरिक, व्यापारी, शाळकरी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पाळधी (ता. जळगाव) : येथील स. ना. झवर विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पोषण आहारात अपहार व निष्काळजीपणाचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यालयात अचानक तपासणी केली. यावेळी ऑनलाईन नोंदींमध्ये पोषण आहाराचा साठा शून्य दाखविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शाळेच्या परिसरात पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे धान्य तसेच अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. ऑनलाईन नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने संशय अधिकच बळावला आहे.तपासणीदरम्यान पोषण आहारासाठी वापरल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज :धरणगाव प्रतिनिधीवाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्शवत उपक्रम अयांश ऑटोचे संचालक यश सुनील मंत्री आणि युवा उद्योजक अमोल कासट यांनी राबविला आहे. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या जीपीएस मित्र परिवाराला त्यांनी एकूण ₹1 लाख 71 हजारांची आर्थिक मदत प्रदान केली.यामध्ये यश सुनील मंत्री यांनी ₹71 हजार, तर अमोल कासट यांनी ₹1 लाख रुपयांचे योगदान देत सामाजिक कार्याला बळकटी दिली. ही मदत जीपीएस मित्र परिवाराचे सर्वेसर्वा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मा. प्रतापराव पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.वाढदिवस म्हणजे केवळ केक, डीजे, फ्लेक्स-बॅनर्स आणि पार्ट्यांचा उत्सव नसून तो समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असू शकते, हे…
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव विधान परिषद ची निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहिला तर अनेक नेत्यांचे बेरजेचे राजकारण वजाबाकी झाले असल्याचा इतिहास ताजा आहे. आता होऊ घातलेल्या या निवडणुकीनंतर भाजपाची दिशा कुठल्या नेत्यांची फिरेल हे सांगणे अवघड आहे परंतु राजकीय इतिहास पाहता व नंदू महाजन यांची उमेदवारी म्हणजे भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे.अगदी वीस वर्षांपासून चा राजकीय विधान परिषदेचा इतिहास पाहिला तर या निवडणुकीनंतर नेतृत्व अडचणीत येतं किंवा बदलविले जाते असा राजकीय इतिहास आहे. माजी खासदार ए टी पाटील व माजी आमदार गुरुमक जगवानी यांची 2004 ची निवडणूक झाल्यानंतर तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व बदल झाले होते. त्यानंतर माजी आमदार मनीष…
चिंतामणी मोरया परिसरात तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण धरणगाव | प्रतिनिधीधरणगाव शहरातील चिंतामणी मोरया परिसरात चोरट्यांच्या टोळीची दहशत निर्माण झाली असून तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास चार संशयित चोरटे परिसरात फिरताना दिसून आले. यावेळी एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार येताच तिने तत्काळ आरडा-ओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चोरट्यांनी चिंतामणी मोरया परिसरातील एका बंद घरासह एका छोट्या दुकानाला लक्ष्य केले. बंद घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू हाती…
धरणगाव : ग्रामीण भागात डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती व्हावी आणि गरजू नागरिकांना योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने धरणगाव येथे अनुलोम संस्था आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मोतीबिंदूसह विविध डोळ्यांच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गरजू रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असून, ‘कांताई नेत्र संजीवनी योजना’ अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.तपासणीदरम्यान काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील कांताई नेत्रालयात रेफर करण्यात आले.या शिबिरात…
२० हजारांची लाच घेताना PSI आणि खासगी पंटर रंगेहात जेरबंद भुसावळ : एका गुन्ह्यात अटक न करता केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि त्यांच्या खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. राजू सांगळे असे अटक करण्यात आलेल्या PSIचे नाव असून, सलीम हकीम कुरेशी असे लाच स्वीकारणाऱ्या खासगी पंटरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील तक्रारदाराला संबंधित गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्यासाठी PSI राजू सांगळे यांनी सुरुवातीला…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यातील भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. नव्याने आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत राज्यभरात 53 धाडी टाकून प्रशासनाचा धाक निर्माण केला आहे. या मोहिमेत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 33 जणांना अटक करण्यात आली आहे. पदभार घेताच कडक निर्देश25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत अधिकाऱ्यांना तातडीने विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती…
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : धरणगाव तालुक्यात कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 207/2026 दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2026 कलम 26(1), 27(3), 59 तसेच BNS कलम 274, 275, 123, 318 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांनी फिर्याद दिली असून, सोमनाथ आनंद माळी (वय 32, रा. भवरखेडा ता. धरणगाव) याला आरोपी करण्यात आले आहे.…
धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे, भुसावळ विभाग यांना सविस्तर निवेदन सादर केले. पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. मात्र अनेक महत्त्वाच्या गाड्यांना येथे थांबा नसल्याने प्रवाशांना भुसावळ किंवा जळगाव गाठावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शिक्षण,…

