प्रजासत्ताक दिनी महिला कर्मचाऱ्याचा ठाम पवित्रा नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला. ध्वजवंदनानंतर झालेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी कार्यक्रमस्थळीच तीव्र आक्षेप घेतला. या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात संविधानाचा उल्लेख करताना बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, असा आरोप माधवी जाधव यांनी केला. “संविधान ज्यांच्यामुळे घडलं, त्यांचंच नाव वगळणं ही फार मोठी चूक आहे. संविधानाशी थेट संबंध नसलेल्यांची नावं घेतली गेली,…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
विजय पाटील जळगाव : जळगाव शहर महापालिकेत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत सत्ता अधिक भक्कम केली आहे. मात्र, या विजयासोबतच पक्षांतर्गत सामाजिक समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहराचे आमदार लेवा समाजाचे आहेत, तसेच महापालिकेतही सर्वाधिक नगरसेवक लेवा समाजाचे असल्याने भाजपात लेवा समाजाला झुकते माप दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे मराठा समाज राजकीयदृष्ट्या मागे पडत असल्याची भावना काही स्तरांतून व्यक्त होत आहे. हीच राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी भाजपकडून महापौर पद मराठा समाजाला देण्याची रणनीती आखली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः ओबीसी प्रवर्गातील मराठा चेहऱ्याला महापौर पदासाठी संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता…
विजय पाटील : जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, महापालिकेच्या प्रतोदपदी भाजपाचे नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली असून, उपगटनेतेपदी अनुभवी नगरसेवक नितीन बरडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे तब्बल 46 नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांमध्ये गटनेते व प्रतोद निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.नाशिकमध्ये गटनिर्णय, विभागीय आयुक्तांकडे नोंदणीभाजपाच्या गटनोंदणीसाठी सर्व नगरसेवक बुधवारी नाशिक येथे रवाना…
परिसरात शोककळा; आज सायंकाळी अंत्ययात्रा धरणगाव | प्रतिनिधीतर्डे येथील रहिवासी श्री. हिलाल हरचंद पाटील यांचे मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 3 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तर्डे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. स्व. हिलाल हरचंद पाटील हे शांत, मनमिळावू व सामाजिक स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पुत्र श्री. नंदलाल हिलाल पाटील व श्री. दीपक हिलाल पाटील तसेच आप्तेष्ट, नातेवाईक असा मोठा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 3 वाजता, राहत्या घरापासून निघणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर मोठा…
जळगाव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. चौधरी यांच्यावर दरोडा तसेच अॅट्रोसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि परिस्थिती चिघळली. याच घटनेनंतर रात्री संतप्त जमावाने शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिस…
धरणगाव | प्रतिनिधी“गावचा विकास हाच आमचा ओळख” या ब्रीदवाक्याला अनुसरून धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या भूमिपूजन सोहळ्यात तालुक्यातील सोनवद, अहीरे बु., चामगांव, बाभुळगाव आदी गावांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, ग्रामपंचायत कार्यालये, समाजमंदिरे, स्मशानभूमी रस्ते, गटारे, पथदीप व इतर मूलभूत सुविधांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरीया कार्यक्रमांतर्गत विविध गावांमध्ये सुमारे १ कोटी १५ लाखांपासून ते ९ कोटी रुपयांपर्यंत अंदाजित खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यामध्ये ग्रामांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण,स्मशानभूमी व…
लाईव्ह महाराष्ट्र विजय पाटील : १६ जानेवारी – जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश मिळाले असून या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेशदादा चव्हाण व शहराचे आमदार राजुमामा भोळे या जोडगोळीच्या माध्यमातून करण्यात आलेले अचूक नियोजन निर्णायक ठरले आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वी जिल्हा दूध संघात सत्तांतर घडवत भाजपाची सत्ता प्रस्थापित करणे तसेच जिल्हा बँक नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळवून दिलेले यश, या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव | प्रतिनिधीजळगाव तालुक्यातील भोलाणे गावातील बस स्थानकाजवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाळू सदाशिव कोळी (वय 38) यांचा निर्मम खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खुनामागे त्यांच्याच जवळच्या मित्राचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत असलेल्या बाळू सदाशिव कोळी यांना जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणात आकाश नामक यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन पंचनामा केला आहे.दरम्यान, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून आरोपीची चौकशी…
जळगाव / नवी दिल्ली | १३ जानेवारी २०२६ —“अनेर नदी आमची माता आहे, मात्र आज याच नदीवरील पूल प्रशासकीय अनास्थेमुळे आमच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे,” अशी आर्त हाक चोपडा तालुक्यातील दगडी बु॥. येथील रहिवासी व दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणारे गौरव संजय पाटील यांनी दिली. आपल्या परिसरातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी पुकारलेला कायदेशीर लढा अखेर यशस्वी ठरला असून, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) जळगाव जिल्हा प्रशासनाला आठ आठवड्यांच्या आत अनेर नदीवरील धोकादायक पुलाचा प्रश्न निकाली काढण्याचे कडक आदेश दिले आहेत. चोपडा तालुक्यातील मोहीदे आणि शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावांना जोडणारा अनेर नदीवरील हा पूल गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे.…
धरणगाव नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी विनय उर्फ पप्पू भावे यांची निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच धरणगाव शहराची नगरपालिका निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत पप्पू भावे यांच्या सौभाग्यवती वैशाली विनय भावे या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या उमेदवार होत्या. मात्र, त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही नेतृत्व आणि कार्याचा योग्य सन्मान राखत, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विनय उर्फ पप्पू भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली. या निर्णयामुळे भावे यांना योग्य तो न्याय मिळाल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे. “गड आला पण सिंह गेला” असे म्हणत असतानाच, आता पप्पू भावे यांची पुन्हा एकदा नगरपालिकेत धडाकेबाज एन्ट्री झाली…

