सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून भाजपा–शिवसेना युती सरकारने विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार, उपाध्यक्ष कैलास पाटील, सुरेश पवार तसेच बांभोरीचे सरपंच सचिन भाऊ बिराडे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व सरपंचांच्या वतीने आभार मानले. त्यांनी सांगितले की, ग्रामविकासाची कामे अर्धवट राहू नयेत आणि प्रशासनात सातत्य राहावे यासाठी परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याबाबत सर्व पदाधिकारी व सरपंचांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्युज वृत्तसंस्था : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात लग्नसमारंभादरम्यान झालेल्या भीषण हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाहसोहळा सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. साखरपुड्यापूर्वी साक्री व सोनगड येथून आलेल्या काही नातेवाईकांमध्ये जुन्या वादावरून बाचाबाची झाली. सोशल मीडियावर प्रसारित आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ यावरून आधीपासून तणाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाद चिघळल्याने काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत देवेंद्र…
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगरपालिका येथे प्रभाग क्रमांक १३ मधील वाढत्या तक्रारींवर अखेर बुधवारी (१८ रोजी) महापौर दालनात विशेष आढावा बैठक पार पडली. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य, पाणीपुरवठा आणि पथदिवे विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नगरसेविका सुरेखा तायडे यांनी घंटागाडी व्यवस्थापनातील गोंधळ मांडत, “घंटागाडीचे चालक कोण? त्यांचे निश्चित मार्ग कोणते? याची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्यावी. अनेक भागांत सफाई कामगार नियमित येत नाहीत,” अशी तक्रार केली.वैशाली पाटील यांनी गटारींच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत, “गटारी साफ केल्या जात नाहीत. काढलेला कचरा…
जळगाव शहरातील Deokar College of Pharmacy येथे शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय श्याम प्रभाकर पाटील या विद्यार्थ्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कॉलेजमध्ये कथित मारहाण आणि सार्वजनिक अपमान झाल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी कॉलेजचे प्राचार्य योगेश पवार यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेमुळे श्याम मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. १४ फेब्रुवारी रोजी श्यामने आपल्या वडिलांना आणि काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून…
विजय पाटील : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमळनेर आणि चोपडा परिसरात मोठी कारवाई करत अवैध बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल ३ लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जवखेडे-मांडळ रोडवरील एका विहिरीजवळ सापळा रचण्यात आला. अवैध मद्याची वाहतूक करताना भावलाल सुकदेव पारवे (रा. नवलनगर, धुळे) याला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर अमळनेर येथील धुळे रोडवरील आर. के. नगर भागात राहणाऱ्या दिनेश प्रभाकर खंबायत याच्या घरावर रात्री २१:१० वाजता छापा टाकण्यात आला. तेव्हा तो घरातच बनावट देशी-विदेशी मद्य तयार करताना रंगेहात…
बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गतीपाळधी/धरणगाव प्रतिनिधी | दि. 13 फेब्रुवारी – मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची गती कायम ठेवून नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.शासनाच्या…
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; ममुराबाद-म्हसावद परिसरात खळबळ जळगाव प्रतिनिधी : वाळू वाहतूक करणारा डंपर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथील तलाठी आणि म्हसावद येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई दि. ११ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात सापळा रचून करण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांमध्ये सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४), तलाठी, सजा ममुराबाद (वर्ग-३) आणि अभिजित नामदेव येवले (वय ३९), मंडळ अधिकारी, सजा म्हसावद (वर्ग-३) यांचा समावेश आहे. डंपर पकडला… आणि फोनवरून सुटला तक्रारदार हे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर असताना…
धरणगाव प्रतिनिधी धरणगाव येथील श्री भोलेसरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही भव्य शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक उत्सवाबाबत गावात आणि परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री निमित्त भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, या मिरवणुकीत सुमारे 20 ते 21 आकर्षक झाक्या (देखावे) सादर करण्यात येणार आहेत. विविध धार्मिक आणि पौराणिक संकल्पनांवर आधारित झाक्यांमध्ये भुतों की बारात, कालीमाता, बाबा बर्फानी, महाकाल आदी देखावे विशेष आकर्षण ठरणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणूक रामदेवजी बाबा नगर येथून प्रारंभ होऊन नियोजित मार्गाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करणार आहे. डमरू-ताशांचा…
महानगरपालिकेवर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासक राज सुरू असल्याने शहरातील विविध प्रभागांमधील नागरी प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून प्रभाग क्र. १३ मधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी प्रभागातील वाढत्या नागरी समस्यांबाबत महापौरांकडे लेखी निवेदन सादर करत तातडीची संयुक्त बैठक बोलावण्याची ठाम मागणी केली आहे. निवेदनात नगरसेविका पाटील यांनी प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेची बिकट अवस्था स्पष्टपणे मांडली आहे. सफाई कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, घंटागाड्यांची कमतरता तसेच आवश्यक वाहने उपलब्ध नसल्यामुळे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अनेक भागांमध्ये नियमित स्वच्छता…
पिके उद्ध्वस्त, आदेश तत्काळ ; प्रतापराव पाटील प्रशासनाच्या रिंगणात धरणगाव तालुक्यात मंगळवार, दिनांक 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस व जोरदार वादळाने हजेरी लावली. या अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील मका, ज्वारी व गहू पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके पूर्णतः आडवी पडल्याने शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल ठरली आहे. अनेक शेतांमध्ये वादळाच्या तीव्रतेमुळे पिके जमीनदोस्त झाली असून काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून पुढील आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे…

