सहा दिवसांच्या संसारावर काळाचा घाला… माहेरी निघालेल्या नववधूचा भीषण अपघातात मृत्यू; आनंदाचे घर क्षणात शोकसागरातजळगाव | प्रतिनिधीहातावरील मेंदीचा रंग अजूनही फिका झाला नव्हता… लग्नातील मंगलाष्टकांचे स्वर कानात घुमत होते… नव्या संसाराची असंख्य स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी आलेली नववधू माहेरी जाण्यासाठी निघाली; पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अवघ्या सहा दिवसांच्या संसारावर काळाने घाला घालत २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मृत नवविवाहितेचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे आहे. त्यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज भुसावळ शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे भुसावळ, जामनेर, अमळनेर आणि चोपडा परिसरातील मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.२३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ येथील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंगमधून सुमारे १५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी विजय जगन्नाथ खडके यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.तपासादरम्यान डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेनवाल आणि पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली.…
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्षांपासून होमगार्ड अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे रवींद्र पाटील यांना चेहऱ्याच्या उजव्या बाजूला कॅन्सरचे निदान झाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी माणुसकीचा आदर्श जपत त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.यावेळी पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी स्वखर्चातून एकत्रितपणे ₹२५ हजारांची आर्थिक मदत उपचारासाठी रवींद्र पाटील यांना सुपूर्द केली.रवींद्र पाटील यांनी चोपडा शहरात अनेक वर्षे विविध सण-उत्सव, विशेषतः गणेशोत्सव, विविध मिरवणुका तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या बंदोबस्तात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या या निष्ठावान सेवेची दखल घेत…
सेल्फी काढताना घडली शोकांतिका; एकाला वाचवताना तिघांचाही जीव गेलाअमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली.मृत मुलांमध्ये मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिघेही खदाण परिसरात गेले असता सेल्फी काढताना एका मुलाचा तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.घटनेची माहिती मिळताच पोलीस व नागरिकांनी धाव घेतली. देवळी येथील दीपक मोरे यांनी पाण्यात उतरून तिघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला…
चार वर्षे सलग १००% निधी खर्चाची परंपरा कायम; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दर्जेदार नियोजन व वेळेत कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देशविजय पाटील : जळगावजळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन आणि विकासकामांची वेळेत अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबईहून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला संबोधित करताना, जळगाव जिल्ह्याने सलग चार वर्षे जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी खर्च करून राज्यात आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.बैठकीत सन २०२५-२६ मधील ₹८३४.६२ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली. तसेच सन २०२६-२७ साठी ₹९००.०५ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा…
धरण ७४.४८ टक्क्यांवर; ४९ हजार ५८२ क्युसेकने तापीत विसर्ग सुरू, प्रशासनाचा सतर्कतेचा इशाराविजय पाटील :जळगाव | प्रतिनिधी :जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. परिणामी, आज (रविवार) सकाळी १० वाजेच्या अहवालानुसार धरणाचे २२ वक्राकार दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात ४९ हजार ५८२ क्युसेक (१४०४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने हायअलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.गेल्या काही तासांत धरण परिसरात २८ मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील एकूण पाऊस ७६ मिमी झाला आहे. तर पाणलोट क्षेत्रात झालेल्या…
विजय पाटील: जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृत तरुणाचे नाव मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे आहे. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करतात. मुस्तकीमच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जोशीपेठ येथील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. यावेळी मुस्तकीम इलेक्ट्रिक वायर जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. त्याच्यासोबत…
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष सत्कार मुंबई | प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शनिवारी (४ जुलै) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित दिलीपराव निकम यांना प्रतिष्ठेचा ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान करून राज्यस्तरीय गौरव करण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, प्रभावी युवा नेतृत्व आणि सहकार चळवळीच्या बळकटीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत निकम यांचा सन्मान करण्यात आला.या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री रवींद्र चव्हाण, बबनराव (बाबासाहेब) पाटील, उदय सामंत, आशीष शेलार, मंगल प्रभात…
आयुक्त ॲक्शन मोडवर; तक्रारीची दखल घेत तातडीने अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील मेहरूण सर्वे नं. ४९०/१ ते ४०६, ४०७ मार्गे जाणारा मोहाडी रोड ते शिरसोली मुख्य शिवरस्ता अखेर नव्याने करण्यात येणार आहे. प्रभागातील चारही नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, तसेच विद्यार्थी, शालेय बस, पालक, मजूर, नोकरदार, व्यापारी आणि दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टा महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.या मागणीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना ऑन-द-स्पॉट पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे…
चोपडा | प्रतिनिधीजळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चोपडा शहर पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित कार अडवून तपासणी केली असता आरोपींकडून गावठी कट्टा व मॅगझिनसह इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी…

