विजय पाटील जळगाव : अनेक वर्षांपासून पाळधी ते जळगाव हा रस्ता दर्जेदार आणि सुरक्षित व्हावा, अशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची अपेक्षा होती. शासनाने तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे, तडे आणि पावसाचे तळे निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांच्या मते, अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या लालसेमुळे आणि ठेकेदाराच्या मस्तवालपणामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनला आहे. निविदा मंजूर करताना देखभाल आणि दुरुस्तीची अट असतानाही संबंधित ठेकेदाराला कोणतीही नोटीस दिली जात नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांनी हात काळे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूर मतदारसंघासाठी पोटनिवडणूकही होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील रिक्त जागा भरल्या जाणार असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दोन अडीच वर्षांपासून अनेक जागा रिक्तराज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे अनेक मतदारसंघातील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ…
धरणगाव तालुक्यातील चमगांव येथील सौ. वैशाली ललित सावंत यांचे शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच चमगांव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या श्री. नारायण शेनू सावंत यांच्या सुनबाई तर श्री. ललित नारायण सावंत यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, कुटुंबीय व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून, चमगांव ता. धरणगाव येथून निघणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, अनेकांनी सावंत परिवाराच्या दुःखात सहभाग नोंदविला आहे.
धरणगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून गुरुजींच्या पवित्र नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच शिक्षकाने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नराधम शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी १० वाजता तिला झाडू मारण्याच्या बहाण्याने वर्गात बोलावून घेत असे. शाळा रिकामी असल्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यावर अत्याचार करायचा. इतकेच नव्हे…
जळगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती असलेल्या एम. जे. कॉलेज परिसरात आज पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तीन कॅफेंवर अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, इतर कॅफे चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिसरातील काही कॅफेंमध्ये नियमबाह्य प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आणि संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी विशेष पथक तयार केले होते.या पथकामध्ये पोलीस कर्मचारी आवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल ठाकूर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेले ‘दामिनी पथक’ देखील या…
धरणगाव (जि. जळगाव) – तालुक्यातील श्री क्षेत्र तरडे येथे सोमवार, दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी भव्य पुरस्कार वितरण व महंत दीक्षा प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तानसेन महाराज संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यात महंतश्री १००८ अनंतदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महंत दीक्षा प्रदान करण्यात येणार आहे. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता मिरवणूक व संत स्वागताने होणार असून, त्यानंतर हरिकिर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे. पुढे मुख्य सोहळ्यात…
जळगाव लाईव्ह महाराष्ट्र न्युज : लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. या प्रकरणी भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३), व्यवसाय – वनरक्षक (आगार रक्षक चालक), नेमणूक – वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल (जि. जळगाव) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यावल परिसरातील असून ते दोन बोलेरो पिकअप वाहनांद्वारे अंजळे, पाडळसे व आजूबाजूच्या भागात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांच्या वाहनांद्वारे लाकूड वाहतूक सुरू ठेवण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड यांनी तक्रारदारांकडे १०,००० रुपयांची लाच…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जमीन खरेदीची नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून जळगाव तालुक्यातील करंजा सजातील तलाठी अजय बिडवे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने हद्दीत शेती जमीन खरेदी केली होती. त्या खरेदीची नोंद संबंधित क्षेत्रात करण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.याबाबत तक्रारदाराने २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता तलाठी बिडवे यांनी जमीन खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.तक्रारदाराने…
जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून राबवला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र आज काम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब ( साचा )कोसळल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती…
धरणगाव (प्रतिनिधी) – महसूल व वन विभागाच्या दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळात प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनवद बु. येथे शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या…

