Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज  : जळगाव विधान परिषद ची निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहिला तर अनेक नेत्यांचे  बेरजेचे राजकारण वजाबाकी झाले असल्याचा इतिहास ताजा आहे. आता होऊ घातलेल्या या निवडणुकीनंतर भाजपाची दिशा कुठल्या नेत्यांची फिरेल हे सांगणे अवघड आहे परंतु राजकीय इतिहास पाहता व नंदू महाजन यांची उमेदवारी म्हणजे भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे.अगदी वीस वर्षांपासून चा राजकीय विधान परिषदेचा इतिहास पाहिला तर या निवडणुकीनंतर नेतृत्व अडचणीत येतं किंवा बदलविले जाते असा राजकीय इतिहास आहे. माजी खासदार ए टी पाटील व माजी आमदार  गुरुमक जगवानी  यांची 2004 ची निवडणूक झाल्यानंतर तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व बदल झाले होते. त्यानंतर माजी आमदार मनीष…

Read More

चिंतामणी मोरया परिसरात तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण धरणगाव | प्रतिनिधीधरणगाव शहरातील चिंतामणी मोरया परिसरात चोरट्यांच्या टोळीची दहशत निर्माण झाली असून तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास चार संशयित चोरटे परिसरात फिरताना दिसून आले. यावेळी एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार येताच तिने तत्काळ आरडा-ओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चोरट्यांनी चिंतामणी मोरया परिसरातील एका बंद घरासह एका छोट्या दुकानाला लक्ष्य केले. बंद घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू हाती…

Read More

धरणगाव : ग्रामीण भागात डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती व्हावी आणि गरजू नागरिकांना योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने धरणगाव येथे अनुलोम संस्था आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मोतीबिंदूसह विविध डोळ्यांच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गरजू रुग्णांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असून, ‘कांताई नेत्र संजीवनी योजना’ अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.तपासणीदरम्यान काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील कांताई नेत्रालयात रेफर करण्यात आले.या शिबिरात…

Read More

२० हजारांची लाच घेताना PSI आणि खासगी पंटर रंगेहात जेरबंद भुसावळ : एका गुन्ह्यात अटक न करता केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि त्यांच्या खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. राजू सांगळे असे अटक करण्यात आलेल्या PSIचे नाव असून, सलीम हकीम कुरेशी असे लाच स्वीकारणाऱ्या खासगी पंटरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील तक्रारदाराला संबंधित गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्यासाठी PSI राजू सांगळे यांनी सुरुवातीला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यातील भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. नव्याने आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत राज्यभरात 53 धाडी टाकून प्रशासनाचा धाक निर्माण केला आहे. या मोहिमेत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 33 जणांना अटक करण्यात आली आहे. पदभार घेताच कडक निर्देश25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत अधिकाऱ्यांना तातडीने विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती…

Read More

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : धरणगाव तालुक्यात कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 207/2026 दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2026 कलम 26(1), 27(3), 59 तसेच BNS कलम 274, 275, 123, 318 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांनी फिर्याद दिली असून, सोमनाथ आनंद माळी (वय 32, रा. भवरखेडा ता. धरणगाव) याला आरोपी करण्यात आले आहे.…

Read More

धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे, भुसावळ विभाग यांना सविस्तर निवेदन सादर केले. पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि रुग्ण मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. मात्र अनेक महत्त्वाच्या गाड्यांना येथे थांबा नसल्याने प्रवाशांना भुसावळ किंवा जळगाव गाठावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शिक्षण,…

Read More

विजय पाटील जळगाव : जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका माजी खासदारांच्या जवळच्या नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून, या कारवाईमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला आज सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडूनही यासंदर्भात अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसल्याने उत्सुकता अधिक वाढली आहे.दरम्यान, संबंधित व्यक्तीचा राजकीय क्षेत्राशी जवळचा संबंध असल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. काही वेळातच या घटनेची माहिती जिल्ह्यात वेगाने पसरली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव : धरणगाव तालुक्यातील अहिरे येथे दळणवळणाची साधने सोईस्कर व्हावे यासाठी सात कोटी रुपये मंजूर करून पूल बांधण्यात आला मस्त वाल ठेकेदाराने हा निकृष्ट केला असून ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांना तुमच्याकडून काही होणार नाही पीडब्ल्यूडी चे अधिकारी हप्ते घेऊन  मोकळे झाले आहे त्यामुळे हा मस्तवाल ठेकेदार अक्षर शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा करताना दिसत आहे. अहिरे येथील ग्रामस्थांनी काम बंद केले असून या पुलाचे काम निकृष्ट झाल्याचे नॉन टेक्निकल माणूस सुद्धा सांगू शकतो परंतु पीडब्ल्यूडी चे अधिकारी हे ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन बिल काढण्यास तयारीत आहेत काही बिल देखील निघालेले आहेत. पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना केवळ पैसा दिसतो…

Read More

जळगाव, दि. २५ (जिमाका ) : जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सून काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव तसेच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आगामी मान्सूनपूर्व व मान्सून काळात विविध पातळीवर करावयाची पूर्वतयारी आणि विभागनिहाय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते वाहतूक अडथळे, पाणी साचणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा…

Read More