धरणगाव (जि. जळगाव) – तालुक्यातील श्री क्षेत्र तरडे येथे सोमवार, दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी भव्य पुरस्कार वितरण व महंत दीक्षा प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तानसेन महाराज संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यात महंतश्री १००८ अनंतदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महंत दीक्षा प्रदान करण्यात येणार आहे. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता मिरवणूक व संत स्वागताने होणार असून, त्यानंतर हरिकिर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे. पुढे मुख्य सोहळ्यात…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव लाईव्ह महाराष्ट्र न्युज : लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. या प्रकरणी भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३), व्यवसाय – वनरक्षक (आगार रक्षक चालक), नेमणूक – वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल (जि. जळगाव) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यावल परिसरातील असून ते दोन बोलेरो पिकअप वाहनांद्वारे अंजळे, पाडळसे व आजूबाजूच्या भागात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांच्या वाहनांद्वारे लाकूड वाहतूक सुरू ठेवण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड यांनी तक्रारदारांकडे १०,००० रुपयांची लाच…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जमीन खरेदीची नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून जळगाव तालुक्यातील करंजा सजातील तलाठी अजय बिडवे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने हद्दीत शेती जमीन खरेदी केली होती. त्या खरेदीची नोंद संबंधित क्षेत्रात करण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.याबाबत तक्रारदाराने २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता तलाठी बिडवे यांनी जमीन खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.तक्रारदाराने…
जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून राबवला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र आज काम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब ( साचा )कोसळल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती…
धरणगाव (प्रतिनिधी) – महसूल व वन विभागाच्या दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळात प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनवद बु. येथे शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या…
जळगाव विजय पाटील : जळगाव महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर लागू करण्यात आलेल्या प्रशासकीय राजवटीच्या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांचा सविस्तर आणि लेखापरीक्षित अहवाल श्वेतपत्रिकेच्या स्वरूपात जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी केली आहे. प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासकीय पातळीवर चालविण्यात आला असून या काळात अनेक आर्थिक, प्रशासकीय, धोरणात्मक आणि विकासकामांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा लोकशाही तत्त्वांवर आधारित असल्याने जनतेच्या निधीचा वापर, निर्णय प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी पारदर्शक व उत्तरदायी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीत प्रशासकीय…
धरणगाव, जि. जळगाव : धरणगाव ते एरंडोल दरम्यान हायब्रीड अॅन्युटी पद्धतीअंतर्गत सुरू असलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अपूर्ण सर्विस रोड, नियमित पाणीफवारणीचा अभाव आणि कामातील संथ गती यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संभाव्य अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. सदर मार्गावरील मुख्य रस्त्याबरोबर उभारण्यात येणारे सर्विस रोड अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत. काही भागांत सर्विस रोड तयार करण्यात आले असले तरी ते व्यवस्थित समतल न केल्याने आणि नियमित पाणी न मारल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. दुचाकीस्वार, पादचारी आणि व्यापारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : सोनवद येथे ७ मार्च रोजी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ धरणगाव (जि. जळगाव), दि. १ मार्च : नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१) अंतर्गत सोनवद येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तहसील कार्यालय धरणगाव यांच्या वतीने आयोजित हे शिबिर शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, सोनवद येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.या शिबिरात नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे…
प्रतिनिधी जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये पूर्वीप्रमाणे ‘नगरसेवक डायरी’ योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्या उद्या मा. महापौर यांना सविस्तर निवेदन सादर करणार असून प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारीची जाणीव आणि वॉर्डनिहाय कामांचा स्पष्ट लेखाजोखा नागरिकांसमोर येण्यासाठी ही योजना अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये करण्यात आलेल्या मागणीनुसार २०१३ ते २०१८ या कालावधीत महानगरपालिकेमार्फत ‘नगरसेवक डायरी’ ठेवण्यात येत होती. या डायरीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात होणाऱ्या फवारणी, गटार साफसफाई, रस्ते स्वच्छता आदी कामांची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. काम पूर्ण…
जळगाव प्रतिनिधी :Devagiri Nagari Sahakari Bankच्या चाळीसगाव शाखेतून Umang White Gold Private Limited या कंपनीच्या नावाने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मात्र मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते एनपीए घोषित करण्यात आले. त्यानंतर बँकेने कायदेशीर कारवाई सुरू करत कंपनीशी संबंधित शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा माजी खासदार Unmesh Patil यांची चाळीसगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. या संदर्भात बँक प्रशासनाने आणखी एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. कर्ज थकीत; कारवाईची प्रक्रियाउद्योग कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने कंपनीला अतिरिक्त मुदत दिली होती. तरीही थकबाकी न भरल्याने कायदेशीर पावले उचलण्यात आली. दरम्यान, कंपनीचे संचालक उन्मेश पाटील यांच्यासह संजय…

