मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कोरोनाच्या जेएन.१ या नव्या विषाणूने शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. आता ठाण्यात रविवारी जेएन.१ व्हायरसचे ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक महिलेसह ४ पुरुषांचा समावेश आहे. एकाचवेळी शहरात ५ नवे रुग्ण आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शहरातील कोरोना तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यात जेएन.१ विषाणूचे तब्बल ९ रुग्ण आढळून आले आहेत. नव्या बाधित रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत ०२, पुणे जिल्हा…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था जेवण तयार न केल्याने पत्नीला बेदम मारहाण कारून तिचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय ४२, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) हे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तानाजी शिवाजी कांबळे (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय १९) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. तानाजीला दारूचे व्यसन आहे. तो शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. जेवण तयार न झाल्याने तो पत्नी मधुरा यांच्यावर चिडला. त्याने रागाच्या भरात मधुरा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगरातील एक ३८ वर्षीय मजूर आठवडाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे घेण्यासाठी जातांना रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (वय ३८) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात रविंद्र मिस्तरी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते इमारतींना रंग देण्याचे काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. आठवडाभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला घेण्यासाठी ते हरिविठ्ठल नगरातून खंडेराव नगरकडे जात होते. त्या वेळी विश्वकर्मा मंदिरानजीक रेल्वे रुळ ओलांडतांना रविंद्र मिस्तरी…
जळगाव : प्रतिनिधी जीवनात प्रयत्नांत यश असते. समाजाप्रती पूर्वीच्या गुरुजी विषयी असलेली प्रतिमा शिक्षकांनी जोपासावी. अवगत असलेले गुण विद्यार्थ्यांनी जोपासून विविध नैपुण्य प्राप्त करून आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील सर हे होते. शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे येथील स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा येथे जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन पालक मंत्री ना गुलाबराव…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला आहे. जगतारसिंग बिक्करसिंग बिलींग (वय ४५), रा. वरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथे जगतारसिंग उर्फ तारा बिक्करसिंग बिलींग हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शनिवार, २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने मोटार सायकल क्र. एमएच १९, डीयू -१२१८ याचेवर मागे पत्नी बसुन घरी जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येर्णाया खासगी बस क्रमांक एम.एच.४० ए.टी.०२८९ ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नी जखमी झाली या दोघांना १०८…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असतांना जेएन.1 (JN.1) या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केलेय. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध…
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना याचा फटका आता शिंदे गटाच्या मंत्र्यांना बसला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन गाड्या एकमेकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून ज्योतिबाला जात असताना तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला आहे. पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी येथे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यात एक जण जखमी झाला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशभरा मनोज जरांगे पाटलांचे नाव चर्चेत आले आहे. मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे अ्न वेळ प्रसंगी सरकारला झुकवणारे आंदोलक… ही ओळख त्यांनी निर्माण केली असून आज मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले. मनोज जरांगे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात दिसले. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले. बॉलिंग आणि बॅटिंग करताना जरांगे या व्हीडीओमध्ये दिसत आहेत. जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आरक्षणसाठी लढा…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून कॉंग्रेसला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा शुक्रवारी २२ डिसेंबर निकाल लागला. या प्रकरणात कोर्टाने राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुनील केदार यांना २ वर्षांपेक्षा अधिक…
बारामती : प्रतिनिधी येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदांनींचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक छाब्रिया देखील उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान संस्थेने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. तसेच पुढे जाण्यासाठी हे बदल स्वीकारण्यास तयार असणारा गट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी…

