Author: editor desk

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ग्रामीण भागातून अवैध वाहतूक सुरु असतांना नुकतेच नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चंद्रपूर नागपूर मार्गावर गांजाने भरलेला कंटेनर जप्त केला आहे. तब्बाल ५० लाखांच्या गांजा पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज पहाटे चंद्रपूर नागपूर मार्गावरून ट्रक निघाला होता. यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये गांजा लपवून नेत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून ५० लाखांच्या गांजासह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालकाच्या कॅबिनमध्ये वेगळा कप्पा तयार करून हा गांजा लपवून नेला जात होता. आज पहाटेच पोलिसांनी हा ट्रक थांबवत तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका महाविद्यालयाच्या परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.११ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयाच्या परिसरातून या अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना उघड झाल्यानंतर परिवारातील सदस्यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला पंरतु मिळून न आल्याने भडगाव पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मानराज पार्कजवळ परिसरात शतपावली करतांना मोबाईलवर बोलत असलेल्या प्रौढाचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लांबवल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. जिल्हापेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवित लागलीच संशयित गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी (वय १९, रा. शिवकॉलनी) याला अटक केली असून त्याच्या दोघ साथीदारांचा शोध घेत आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहराती मानराज पार्कमधील दौप्रदी नगरात सुमित एकनाथ भामरे (वय ५७) हे वास्तव्यास असून ते जनता बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. दि. १० रोजी बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर भामरे हे फोनवर बोलत शतपावली करण्यासाठी निघाले. अॅक्सीस बँकेकडून ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळ गाडी अडविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चौघांकडून ट्रॅव्हल्स चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना दि. ९ जानेवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कापुर नेथील शेख वसीम (वय २८) ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करतात. दि. ९ जानेवारी रोजी ते (एमएच १९ सीवाय ५२२२) क्रमांकाची ट्रॅव्हल्स घेवून आयएमआर महाविद्यालयाजवळून पुणे जाण्यासाठी निघाले. यावेळी सुनिल जगन तेली, तेजस सुनिल तेली, वरुन सुनिल तेली (सर्व रा. कोल्हे हिल्स) व आकाश संजय पाटील (कोल्हे हिल्स) यांनी चौघांनी शेख वसीम यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे एका ५ वर्षाच्या बालकाच्या डोक्यावरून स्कूल बसचे चाक गेले. या घटनेत बालकाचा जागीच मृत्यू झाला. हर्षद अनिल हातांगळे असे मृत बालकाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेनंतर बालकाचे कुटुंब शाेकसागरात बुडाले. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद याच्या डाेक्यावरुन तब्बल दोन वेळा चाक गेले. त्यातच तो चिरडला गेला. त्यामुळे निष्पाप हर्षदचा जीव गेला. यावेळी घटनास्थऴी माेठा जमाव जमला हाेता. हर्षद हातांगळे याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळताच त्यांच्या पायाखालची वाऴू सरकली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्यात आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान खात्याने देशातील ३१ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवार आणि शनिवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)‌ २०२४-२५ अंतर्गतच्या नियतव्ययात जळगाव जिल्ह्यातील वाढीव निधीच्या मागणीचा सकारात्मक विचार करून‌ वाढ केली जाईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनीपालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिली. जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ च्या प्रारूप आराखड्याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. जळगाव येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड तसेच जिल्हा प्रशासनातील इतर…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील ४ शाळकरी मुलांचा गुरुवारी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अफरोज जावेद शेख (१४), अबरार जावेद शेख (१२) व कुणाल अनिल दळवी (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोन भावंडांपैकी अफरोज मदरशात तर अबरार साईराम इंग्रजी शाळेत शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मुले एकाच भागात राहत असल्याने मित्र होती. गुरुवारी सायंकाळी खेळण्याच्या नादात ते घरातून बाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळानंतर जवळच असलेल्या बनकरवाडी तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे दिसले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  संपूर्ण देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. अयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार असल्याने जळगावातील शानिपेठ परिसरातील संकल्प महिला मंडळातर्फे घरोघर अक्षदा वितरण करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषात अक्षदा आणि माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती. देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा आनंदोत्सव सुरू असून प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. जळगाव शहरातील शनिपेठेत असलेल्या जय श्रीराम मित्र मंडळ आणि संकल्प महिला मंडळातर्फे अयोध्या येथून आलेल्या मंत्रित अक्षदांचे परिसरात वितरण करण्यात आले. मुख्य चौकात माजी होमगार्ड समादेशक रमेश दलाल यांच्या हस्ते…

Read More

चोपडा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावठी पिस्तूलवर मोठी कारवाई सुरु असतांना नुकतेच बोरज अजटी फॉरेस्ट नाक्यासमोर १३ हजर रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुण शुभम प्रकाश सूर्यवंशी याच्याकडे १३ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस घेऊन फोरेश्ट नाक्या समोर आढळून आला. त्याला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. तपास सपोनि शेषराव नितनवरे करीत आहे.

Read More