Author: editor desk

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. हि घटना नांदेडच्या भोकर तालुक्यात घडली आहे. मुंबई-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे अज्ञात वाहनाची धडक मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ विद्यार्थ्यांना बसली. या धडकेत दोन्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरी भागात अल्पवयीन मुलीवर विनयभंग, अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ५० वर्षीय व्यक्तीने मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग आणि दोन वेळा गैरवर्तन केलं. आपल्या मुलीला झालेला त्रास लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत काकाने तिच्याशी गैरवर्तण केलं. त्यामुळे मुलगी सतत घाबरून राहत होती. काकाने अतिप्रसंग आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याने ती कुणाशीच काही बोलत नव्हती. आपल्या…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यभरात मनोज जरांगे पाटलांच्या सभेनंतर आता ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेचा धडाका सुरु आहे. आता बीडमध्ये आज ओबीसींची जाहीर महाएल्गार सभा होत आहे. या सभेमुळे छगन भुजबळांची तोफ बीडमध्ये धडाडणार असून सभेसाठी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, ओबीसी जयदत्त क्षीरसागर यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांना आयोजकांनी निमंत्रण देखील दिलं आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही जाहीर सभा होत आहे. या सभेची तयारी आता पूर्ण झालीये. जवळपास 40 बाय 80 चे भव्य स्टेज उभारले असून 50 हजार खुर्च्या टाकून मैदान देखील तयार करण्यात आले आहे. तर याच सभास्थळाच्या मैदानाच्या परिसरामध्ये मोठमोठे होर्डिंग…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला २३ डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणखीच आक्रमक झाले आहेत. सरकारने तातडीने आरक्षणावर निर्णय घ्यावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू, असा इशाराच जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नका, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. इतकंच नाही, तर कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारलं देखील आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. २० जानेवारीला मुंबईत ३ कोटींहून अधिक मराठा बांधव धडकणार असल्याचं जरांगे म्हटलं आहे. आरक्षणाशिवाय…

Read More

हावेरी : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या अनेक घटना उजेडात येत असतांना अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला केल्याप्रकरणी पीडित महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने स्वतःचा एक व्हिडीओ जारी केल्यानंतर तो सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, महिला सांगते की, सहा जण जबरदस्तीने हॉटेलच्या खोलीत घुसले आणि आधी मारहाण केली. मग ते तिला जंगलात घेऊन गेले. तेथे सहा आरोपींसोबत आणखी एकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिला कारमध्ये बसवून शहरभर फिरवले. महिलेच्या आरोपांवर पोलिसांनी सांगितले की, त्यांना यापूर्वी बलात्काराची माहिती देण्यात आली नव्हती. हावेरीचे एसपी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील शेरी शिवारातून २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंप व केबल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या साहित्याची किंमत जवळपास तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी सोनाळा येथील २० शेतकऱ्यांकडील कृषी पंप चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर शेरी शिवारातील कृष्णा बोरसे यांच्या शेतातील कृषी पंप व युवराज सोनवणे, दिलीप गोंधनखेडे, ज्ञानेश्वर देशमुख, नाना पाटील, भागवत बनकर, देवीदास पांढरे, शांताराम पाटील, शांताराम सोनवणे, दादाराव सोनवणे यांच्यासह १५ शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या केबल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे आर्थिक…

Read More

बोदवड : प्रतिनिधी पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आत्महत्या केल्याची घटना बोदवड तालुक्यात साळशिंगी येथे घडली. या घटनेमुळे दोन मुले पोरकी झाली आहेत. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साळशिंगी येथील हरतालिका विनोद महाजन (वय ४०) या महिलेने काही ही कारणामुळे चार-पाच दिवसांपूर्वी विष घेतले होते. तिच्यावर जळगाव येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान रविवारी ७ रोजी तिचा मृत्यू झाला. सोमवारी या महिलेचे तिसरे होते. हा कार्यक्रम झाल्यावर या महिलेचा पती विनोद सुभाष महाजन (वय ४५) हा घरी कोणास काहीही न सांगता निघून गेला. यानंतर त्याचा तपास लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी १२ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील एका १०० फुट विहिरीत पुरुष पडल्याचे काही नागरिकांनी शनी पेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत रेस्क्यु पथक तयार करून विहिरीत पडलेल्या इसमाला जिवंत बाहेर काढल्याने परिसरात पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुना खेडी रोड ज्ञानदेव नगर 100 फुटी रोड जवळ एक पुरूष विहीरीत पडल्याची घटना दिनांक ११ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे फोनव्दारे नागरिकांनी कळविले होते. याबाबत शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तात्काळ एक रेस्क्यु पथक तयार करुन त्यात पोउपनि श्री योगेश ढिकले, मुबारक तडवी, सफौ इद्रिस पठाण, पोहेका विजय खैरे, पो.कॉ मुकुंद गंगावणे, नवजीत चौधरी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन झालं. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले कि, भारत लोकशाहीची जननी असून यात तरुणांच मोठं योगदान आहे. देशातील तरुण तरुणींनी यापुढेही लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. या प्रक्रियेत तरुणांचा जेवढा सहभाग जास्त असले तितकं देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधान…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात अनेकवेळा लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक केलीये. तसेच बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केलंय. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलेची 25 दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूती झाली. तिला मुलगा झाला मात्र बाळाचे वजन कमी आणि अशक्त असल्याने त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. याच दरम्यान मालवणी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रसूती झालेल्या महिलेची दिशाभूल…

Read More