Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी आज दि.१३ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेसाठी मतदान सुरु असून या दोन्ही मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. यात रावेर लोकसभा मतदार संघ आघाडीवर आहे. 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ -42 .15 % विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे 13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –39.23 % 14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –45.02 % 15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –41.16 % 16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –46.04 % 17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –39.07 % 18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ -43.80 % ▪ 04 रावेर लोकसभा मतदारसंघ -45.26 % विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे 10…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिक सकाळीच मतदान करण्यासाठी मतदार केंद्र गाठत आहे.दुपारी १ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात ३१.७०% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात ३२.०२% मतदान झाले आहे. यामधील जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव विधानसभा मतदारसंघ – 32.22 %, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 34.93 %, अमळनेर विधानसभा मतदारसंघ – 31.62 %, एरंडोल विधानसभा मतदारसंघ – 35.05 %, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – 26.97 %, पाचोरा विधानसभा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दीपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) ही आठ महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार झाली. तर तिचे पती व तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले, तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरपले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जुना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहेत. ते पत्नी दीपाली व तीन वर्षांची मुलगी काव्या हिला घेऊन निमगव्हाण येथे नातेवाइकांकडे भेटण्यासाठी गेले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लग्नाचा पहिला वाढदिवस आणि तसे मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवून सकाळी आनंदात असलेल्या कुणाल प्रकाश सूर्यवंशी (२९, रा. दातर्ती, ता. साक्री, जि. धुळे ह. मु. स्वामी समर्थ कॉलनी, द्वारका नगर परिसर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, १२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कुणाल सूर्यवंशी हा तरुण स्वामी समर्थ कॉलनी येथे आई, वडील, पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीसह राहत होता. तो सिव्हिल इंजिनिअर असून एका सिमेंटच्या कंपनीत तो मार्केटिंग करायचा. १२ मे रोजी त्याच्या लग्नाला एक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील पुरुषोत्तम नगरातील चैतन्य अपार्टमेंट येथील महिलेच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ मे रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता श्रीकांत मंत्री (वय ५५) या ३ मे रोजी सकाळी १० वाजता कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी महिलेचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुपारी…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी ‘मदर्स डे’च्या दिवशीच मुलगा आणि सुनेने मिळून आईचा दगडाने ठेचून खून केला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना एरंडोल येथील केवडीपुरा भागात रविवारी पहाटे घडली. प्लॉट विक्रीच्या वादातून हा प्रकार घडला. मुलगा आणि सुनेस अटक करण्यात आली आहे. विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) (६०) असे या मृत महिलेचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विमलबाई यांच्या घराशेजारी त्यांच्या नावे असलेला प्लॉट मुलगा बापू मोहिते (४०) व सून शिवराबाई मोहिते (३५) यांना विकायचा होता. परंतु यास विमलबाईंचा विरोध होता. त्यामुळे मुलगा आणि सून त्यांना त्रास द्यायचे त्यामुळे विमलबाई ह्या मुसळी (ता. धरणगाव) येथे गेल्या होत्या. समाजातील काही लोकांनी मुलगा व…

Read More

मेष आजचा दिवस खूप खास असेल. कुटुंबात विशेष नातेवाईकाच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्र-परिवारात व्यस्त राहाल. एखादे मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. आज काही नवीन कामे अचानक समोर येऊ शकतात. विचारपूर्वक केलेल्या कृतीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. वाहन व्यवसायात चांगल्या विक्रीतून फायदा होईल, आर्थिक स्थिती मजबूत राहील. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी भगवंताचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करू. आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. घर बांधणीचे काम वेगाने होईल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. आज रस्त्याने चालताना अनोळखी व्यक्तीशी विनाकारण वाद टाळा. यामुळे तुमचा वेळ वाचेल. तुमच्या पद आणि क्षमतेनुसार काम केले…

Read More

जळगाव : विजय पाटील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रावेर मतदार संघात मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात यावर सर्वांचे लक्ष आहे. एकीकडे राजकारणात नवखे असलेले उद्योजक श्रीराम पाटील तर दुसरीकडे मागील दहा वर्षांपासून खासदार असलेल्या एका मोठ्या राजकीय परिवाराच्या सून रक्षा खडसे आहेत. केळी, कापूस ही महत्त्वाची पिके घेणारा रावेर मतदार संघ रेल्वे, ऑर्डीनंस फॅक्टरी यांच्या साठी सुध्दा प्रसिद्ध आहे. मागील दहा वर्षांच्या कालखंडात मतदार संघातून सुरू झालेली हॉर्टीकल्चर ट्रेन बंद झाली, रावेर रेल्वे स्थानकात अनेक गाड्यांचा थांबा बंद झाला, राजधानी होती एक्स्प्रेसला जळगांवला थांबा मिळाला परंतु देशातले मोठे जंक्शन असलेले भुसावळ येथे थांबा नाही, पर्यटन विकासाचा कोट्यवधीचा हरताळा क्लस्टर कागदावर आला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज चॅनलचा लोगो व नाव वापरून एक फेक पोस्ट तयार करण्यात आली. त्यात स्मिताताईंना फोटो व नाव देखील वापरुन खोडसाळपणा करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब निदर्शसनास येताच स्मिताताईंनी तीव्र नाराजी केली. मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला. स्मिताताई म्हणाल्या की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जीवनात पाळणारे आहोत. शिवछत्रपतींच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता. मात्र आता काही विरोधक महिलांच्या नावाने असे प्रकार करुन महिलांचा अपमान करत…

Read More

बीड : वृत्तसंस्था शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे असो की आणखी कोणी पुढे येत असतील, तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. मनोज जरांगे-पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या जिल्ह्यात येऊन जरांगे-पाटलांना भेटलो. त्यांना एक विनंती केली की, या राज्यात कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत येथे प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, फौजिया खान,…

Read More