Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी सकाळी साडे नऊ वाजता गंगा पूजा केली आणि क्रूझने नमो घाटावर पोहोचले असता काशीतील कोतवाल नावाच्या कालभैरव मंदिरात दर्शन घेतले आणि आरती केली. त्यानंतर पंतप्रधानांनी वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथही उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत. चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे, असं यावेळी जरांगे यांनी सांगितले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. दहा टक्के आरक्षण दिलं ते कुणाच्याही नाही. यामुळे मुलांचा वाटोळे झालं आहे. 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत काल दुपारी 3 वाजेपर्यंत ऊन आणि मोकळं आभाळ असलेलं वातावरण होतं. पण अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसापेक्षा वारे प्रचंड वेगाने वाहू लागले. या वाऱ्याचा वेळ तासी 40 ते 50 किमी असा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान मुंबईतील दोन ठिकाणी तर मोठमोठ्या होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्या. आधी वडाळा येथील श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय. अतिशय चित्तथरारक अशी ही घटना आहे. या घटनेत कुणी जखमी झालं आहे का, कितपत नुकसान झालंय, याबाबतची सविस्तर मााहिती अद्याप समजू शकलेलं नाही. पण या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून शहर वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. नवरा-बायकोच्या भांडणाचा राग शहरावर काढण्याचा प्रकार घडला आहे. पत्नीच्या प्रेमात पडलेल्या या व्यक्तीने बायको नांदण्यासाठी येत नसल्यामुळे पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मिळालेल्या या धमकीमुळे पुणे पोलिसांना जोरदार धक्का बसला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पुणे शहरात मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. यापूर्वी कोयता गँगने पुणे शहरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता गोळीबारच्या घटना मागील महिन्यात चार वेळा घडल्या. गुन्हेगारीप्रमाणे कौटुंबिक वाद आणि कलहसुद्धा समोर येत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने समोर आलेला खड्डा चुकविताना आपल्याला कट मारल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी जुनेद अख्तर गंभीर खान (२४, रा. आझादनगर) या तरुणाला पाठलाग करून बेदम मारहाण केली. त्याला रोडवर खाली पाडून दगडाने व चाकूने वार केल्याने तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. ही घटना शनिवार, ११ मे रोजी रात्री फातेमा नगर ते सुप्रीम कॉलनीदरम्यान घडली. याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, ११ मे रोजी रात्री मनियार सलमान खान अब्दुल गफ्फार (२५, रा. उस्मानिया पार्क), इकरामोद्दीन अमिनोद्दीन शेख व…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिनावल येथे ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडणीचे काम करीत असताना ट्रॅक्टर मागे आले. यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे नाव यशवंत हेमचंद्र धांडे (५७) असे आहे. चिनावल येथे कुटुंबासह राहत होते. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी नांगरणी, रोटा करण्याचे काम सुरू जाते. रात्री शेतात रोटा करण्यासाठी जायचे असल्याने रविवारी सायंकाळी ते खळ्यात ट्रॅक्टरला जोडणी करीत होते. दरम्यान, ट्रॅक्टर सुरू असल्याने ते मागे आले. ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने यशवंत धांडे गंभीर जखमी झाले. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना फैजपूर येथे खासगी रुग्णालयात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५७.७०, तर रावेरसाठी ६३.५७ टक्के मतदान झाले. अंतिम टक्केवारीत यात आणखी काही वाढ होऊ शकते. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. एरंडोलमध्ये मतदानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध तर दारूच्या नशेत आढळणाऱ्या मलकापूर मतदार केंद्र प्रमुखाविरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील रामदेववाही येथे दुचाकीवरील चारजणांना भरधाव कारने उडविल्याच्या घटनेनंतर आरोपींवर गंभीर कारवाई न झाल्याने त्याचे पडसाद जामनेर, चाळीसगाव व जळगाव तालुक्यात उमटले आहेत. रामदेववाडीतील बंजारा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकल्याची बातमी कळताच या दोन्ही मतदारसंघांतील बहुतांशी समाजबांधवांनी मतदानाकडे पाठ दाखविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान अंतिम टप्प्यात आले आहे. मेहरूण भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी मदत केली. मेहरूण भागातील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, स्वामी समर्थ चौक भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर जाऊन वृद्ध व दिव्यांग मतदारांना ने आण करण्यासाठी मदत केली. यामध्ये फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत, ऋषी राजपूत, आकाश तोमर, मयुर डांगे, संकेत म्हस्कर, चेतन राजपूत, राहुल राजपूत, नकुल निकम आदींनी मदत केली.

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. आज तुम्हाला काही मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. आज विद्यार्थी काही महत्त्वाचे प्रॅक्टिकल पूर्ण करण्यात व्यस्त राहतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही निरोगी रहाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे तुमच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. कोणतेही प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत भविष्याचा विचार कराल. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील ९ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान होत आहे. पश्चिम बंगालमधील बोलपूर येथे मतदानाच्या एक दिवस आधी रात्री उशिरा एका TMC कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. टीएमसीने सीपीआय(एम) समर्थकांवर बॉम्बस्फोटांचा आरोप केला आहे. दुर्गापूरमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. बीरभूममध्ये भाजपने टीएमसी समर्थकांवर स्टॉलची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, बिहारच्या मुंगेरमध्ये मतदानापूर्वी एका पोलिंग एजंटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंगेरमध्येच मतदानादरम्यान स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.…

Read More